गावागावातुन
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/04/1001879895-1000x600.jpg&description=वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/04/1001879895-1000x600.jpg&description=वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर-
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासुन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातही पाऊस हुलकावणी देत होता.परंतु आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

गावागावातुन
पोंदेवाडीत शेतकरी बचत गटाला कृषी विभागाच्या वतीने संकरित बाजरीचे बी बियाण्याचे वाटप.
मंचर-
पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील शेतकरी बचत गटाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग घोडेगाव, यांच्या वतीने संकरित हायब्रीड बाजरीचे बी बियाण्याचे वाटप पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते व सहाय्यक कृषी अधिकारी विकास गवई,प्रवीण मिरके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी पहाडदरा,वाळुंजनगर शिरदाळे,खडकवाडी,लोणी,रानमळा मांदळेवाडी वडगावपीर पोंदेवाडी या गावांमध्ये बाजरीच्या बी बियाण्याचे वाटप करण्यात आले.पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले.यावेळी ७५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दिड किलो याप्रमाणे बाजरी बियाणे देण्यात आले.यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, अर्जुन महाराज वाळुंज, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर ,राहुल घोलप, स्वामी घोलप, मंगल जाधव ,पुष्पा लंके यांसह स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
नुकताच पूर्व भागामध्ये पावस चांगला झाल्यामुळे, सदर बियाण्यांचे पेरणी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

गावागावातुन
पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला.

मंचर –
सध्या पावसाने ओढ दिली असून. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज रोडेवाडी पोंदेवाडी लाखनगाव सविंदणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन पावसाला असंच सर्वत्र वर्षाव व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रोडेवाडी फाटा पोंदेवाडी लाखनगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून.असाच पाऊस अनेक ठिकाणी पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मागे अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पडणारे ऊन.त्याचप्रमाणे जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने उभी पिके जळु लागली होती. नदी व कालव्याचे पाणी सुद्धा बंद केल्याने शेती संकटात आली होता.
अशा परिस्थितीत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज झालेल्या पावसाने रोडेवाडी पोंदेवाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून असाच जोरदार पाऊस महाराष्ट्रात बरसावा अशी अपेक्षा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी व्यक्त केली.

गावागावातुन
लाखनगाव येथील आरोग्य केंद्र लवकर सुरू होनार पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज प्रयत्नांना यश.
मंचर –
लाखनगाव ता.आंबेगाव या ठिकाणी गेली अनेक दिवस किरकोळ काम रखडल्याने सुरु न झालेले आरोग्य केंद्र लवकर सुरू व्हावे ही मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी लावुन धरल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद चे डेप्युटी इंजिनिअर परदेशी साहेब जोशी साहेब यांनी आरोग्य उपकेंद्राला भेट दिली देऊन उपकेंद्राची पाहणी केली व सदरचे उपकेंद्र हे पंधरा दिवसात लोकांसाठी सुरू होईल अशी माहिती दिली.

लाखनगाव ता.आंबेगाव येथे माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपयांचे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले होते,या आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे परंतु काही किरकोळ काम बाकी आहे,सदर ठेकेदाराने शिरूर माघील अनेक दिवसांपासून काम करण्यास टाळाटाळ करत आहे,या गोष्टीचा स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांनी गेल्या महिन्याभरात तीन वेळा सदर उपकेंद्राला भेट दिली व त्या संदर्भात आदरणीय दिलीप वळसे पाटील व विवेक वळसे पाटील यांना सदरचा विषय सांगितल्यानंतर पुढील कार्यवाही होऊन बांधकाम विभाग जिल्हा परिषद चे डेप्युटी इंजिनिअर परदेशी साहेब व जोशी साहेब अंकिता वाळुंज यांनी स्थानिक ग्रामस्थान समवेत या आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन संपूर्ण उपकेंद्राची पाहणी केली व सदरचे उपकेंद्राचे राहीलेले काम पंधरा दिवसां पुर्ण होईल अशी माहिती दिली.त्यामुळे पंधरा दिवसांनंतर स्थानिक जनतेसाठी या आरोग्य उपकेंद्राचा लाभ होईल.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व विवेक वळसे पाटील व अंकिता वाळुंज यांचे आभार मानले.

-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन9 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
