गावागावातुन
आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.

मंचर प्रतिनिधी
मला येथील जनतेने 1990 साली वयाच्या 34 व्या वर्षी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली .त्यावेळी परिस्थिती अवघड होती. तालुक्यातील अनेक लोक तालुक्याबाहेर रोजगार मिळवण्यासाठी जात होते. आज परिस्थिती बदलली आहे शिरूर तालुक्याला सगळ्या नद्यांवरील धरणांचे पाणी येत आहे .शिरूर तालुका बागायती झाला त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका बागायती झाला आंबेगाव शिरूर तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर येथे झालेली प्रगती लक्षात येते.येथे झालेला बदल दिसून येतो पाण्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यात सुबत्ता आली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या.असे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.
मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी शिरूर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे निरीक्षक अतुल ब्रह्मभट्ट ,पोपटराव गावडे,पुर्वाताई वळसे पाटील,देवेंद्र शहा,बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील,जयसिंग एरंडे उपस्थित होते.

निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेले पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल.
डिंभे धरणाचे भूमिपूजन 1978 साली झाले परंतु 2000 सालापर्यंत पाणी मिळाले नव्हते. 90 साली आमदार झाल्यानंतर अधीकचा निधी आणून डिंभे धरणाचे काम पूर्ण केले. त्याचप्रमाणे कुकडी प्रकल्पा अंतर्गत 65 बंधारे आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यात उभे केले. अजूनही सातगाव पठार, आदिवासी भाग व शिरूर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी पोहचवायचे आहे.ही गावे बागायती करायची आहेत. कुकडीची तिसरी मान्यता झाली तेव्हा 65 बंधारे एकदाच भरायचे नियोजन होते.परंतु आपण या निर्णयात बदल केला आणि 65 बंधारे या प्रकल्पांतर्गत आणले.डिंभे धरणाला बोगदा पाडून धरणातील पाणी पलीकडच्या बाजूला न्यायचे होते असे झाले असते तर तीन महिन्यात धरण रिकामे झाले असते. आणि पुन्हा एकदा आंबेगाव शिरूर तालुका हा दुष्काळी झाला असता. माळीनची दुर्घटना झाली त्यानंतर नवीन गाव वसवले तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आसाणे या ठिकाणी तलाव बांधुन त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.थिटेवाडी बंदरातील गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. कळमोडी चे काम लवकर पूर्णत्वास येईल आणि त्या माध्यमातून शिरूर खेड आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बागायती होतील मोठ्या प्रमाणावर इमारती आपण तालुक्यात बांधल्या.आपला भीमाशंकर कारखाना उत्तम सुरू आहे .शेजारील कारखाना बंद पडला पण त्यावर कोणी बोलत नाही आपण 3200 रुपये बाजार भाव दिला.आपण अनेक सरकारी शाळा वसतिगृह इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केला त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातून आपण शिक्षणाचे काम करत आहोत इंजिनिअरिंग महाविद्याल सुरु केले.
आरोग्य सेवेसाठी पहिले तीस बेडचे मंचर या ठिकाणी हॉस्पिटल सुरु केली त्यानंतर 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय केले त्यासाठी देवेंद्र शहा अध्यक्ष असलेल्या पांजरपोळ ट्रस्टची जागा त्यांनी सरकारला दिली. तांबडेमळा या ठिकाणी 100 बेडच्या नवीन हॉस्पिटलचे काम सुरू आहे .त्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आपण देत आहोत .
भीमाशंकर तिर्थक्षेत्रासाठी 148 कोटीचा आराखडा मंजूर आहे. परंतु तेथे वनविभाग व इतर कायदे अडचणीमुळे थोडी अडचण आहे .पण यावरही मार्ग काढून हा विकासाचा आराखडा पुर्ण करु.अनेक देवस्थानांना आपण चांगल्या प्रकारे निधी दिला आहे. मंचर येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधली घोडेगाव तहसील कार्यालय इमारत बांधली ,कोर्टाची इमारत बांधली. पंचायत समिती कार्यालयाची इमारत बांधली. मंचर व घोडेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस वसाहत बांधली .भोरवाडी या ठिकाणी एसटी डेपो सुरू केला नवीन बस स्थानक मंचर या ठिकाणी आपल्याला करावयाचे आहे. मंचर ग्रामपंचायत ची नगरपंचायत केली.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणला मी अजित दादा पवार यांच्याकडून निधी आणला व मंचरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. तालुक्यात अष्टविनायक महामार्ग व बेल्हा जेजुरी महामार्ग उभे केले. तसेच नवीन अवसरी फाटा पारगाव ,टाकळी हाजी ,मलठण गणेगाव खालसा, शिक्रापूर असा नवीन रस्ता मंजूर आहे त्यासाठी 416 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
विजेच्या बाबतीत अनेक कामे केली पाण्यासाठी आपण 135 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 63069 महिलांना व शिरूर तालुक्यातील 37390 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. बळीराजा योजनेतून 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज देण्याचे काम आपण केल.असे वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणाव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश स्वामी थोरात यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार अंकीत जाधव यांनी मानले
गावागावातुन
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील १५० महिलांनी घेतला सहलीचा आनंद.

निरगुडसर-पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांच्या एक दिवशी कोकण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 150 महिलांनी सहलीत भाग घेऊन अलिबाग येथील समुद्रकिनारा व इतर पर्यटन स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घेतला.
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांसाठी अनिलभाऊ वाळूंज मित्र मंडळाच्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील महिलांना शेतीच्या कामातून थोडासा वेळ मिळून सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.अलिबाग या ठिकाणी समुद्रकिनारी आणि इतर पर्यटन स्थळांना या महिलांनी भेट दिली.या सहलीच्या निमित्ताने महिलांना कामातून बाहेर पडून आनंद घेता आला यावेळी तीन बसमधून 150 महिलांनी या सहलीत सहभाग घेतला होता.महिलांच्या संपूर्ण सहलीची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर ,महेंद्र पोखरकर, सोमनाथ वाळुंज संतोष वाळुंज अमोल वाळुंज, संदीप घोलप, नानाभाऊ पोखरकर, अमित दौंड प्रकाश दौंड,निलेश मांजरे , नवनाथ मखर ,शुभम वाळुंज चंद्रकांत विरकर.यांनी पाहिली.पोंदेवाडी येथील ग्रामस्थांसाठी दरवर्षी अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात.याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी यावेळी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंकिता वाळुंज यांनी दिली.
गावागावातुन
काठापूरचा शेतकर्याचा मुलगा झाला फौजदार

मंचर- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील अनिकेत सुशिला चंद्रकांत करंडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवित फौजदार पदाला गवसणी घातली. तो गावातील पहिला पुरुष अधिकारी तर गावातील दुसरा अधिकारी ठरला आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिकेत करंडे याने ग्रामीण भागात राहून जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव, तर पुढे मेकॅनिकल इंजिनियर च शिक्षण व्ही आय.टी.पुणे येथुन पुर्ण केले.शिक्षण पुर्ण झाल्यावर अनेक कंपण्यांमध्ये कामाची संधी असतानाही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन अधिकारी होण्याची ईच्छा असल्याने त्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. होता. कोणत्याही संस्थेत अभ्यास न करत स्वताहाच अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत यश मिळवले.अनेकांनी नोकरी कर नोकरीची चांगली संधी आहे. या अवघड परीक्षा देऊ नको अपयश येण्याची जास्त शक्यता आहे.असे सांगितले. परंतु आपल्या ध्येयावर ठाम राहुन त्याने हे यश मिळवले आहे.

त्याला पी.एस.आय.विक्रम कर्डीले यांचे मार्गदर्शन मिळाले. शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनिकेतची आई सुशिला व वडील चंद्रकांत करंडे शेती करुन आपले कुटुंब चालवत आहेत. त्याने मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक आहे.
गावागावातुन
जुन्नर तालुक्यात ‘अफार्म’तर्फे कृषि मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन

जुन्नर -जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात अफार्मने नुकताच महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. Indigo CSR अनुदानित व अफार्म, पुणे संचलित ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प-टप्पा २ अंतर्गत ‘अल्पखर्चिक सेंद्रिय शेती तंत्रज्ञान’ मार्गदर्शन सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. जुन्नर तालुक्यातील इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु. या गावांत सन २०२४ ते २०२७ या कालावधीमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. इंगळून, ता. जुन्नर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त महिला, मुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हक्कदर्शिका म्हणून काम करत असलेल्या नयना उघडे (घंगाळदरे) आणि प्रेरणासखी म्हणून काम करत असलेल्या स्वाती घोरपडे (खानगाव) या लाभार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अफार्म-इंडिगो प्रकल्पामुळे महिलांची चूल-मूल ही मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची उद्योजगतेची मानसिकता घडत असल्याचे या दोन्ही महिलांच्या मनोगतातून समोर आले.

डॉ. सुधा कोठारी, अध्यक्ष-चैतन्य संस्था, खेड आणि कार्यकारी समिती सदस्य, अफार्म या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, “महिला शेतकरी तसेच महिला ग्रामसंघ, महिला उत्पादक गट यांनी गेल्या काही वर्षांत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. महिलांच्या विविध स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणासाठी अफार्मच्या या प्रकल्पाने मोठा हातभार लावला आहे. स्थानिक पातळीवरील लोकांचा पाठींबा, इच्छशक्ती तसेच आपले नियोजन कौशल्य याविषयी प्रचंड उपयोगाला येते याची या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे.”

सौ. निवेदिता शेटे (शास्त्रज्ञ-कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव) या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सबलीकरण हे सर्व येते. प्रत्येक महिलेला जर तिच्या अंगभूत कलागुणांची जाणीव जर झाली तर त्याचा व्यावसायिक अंगाने उपयोग नक्कीच करता येईल. त्यासाठी आपल्याला संवाद साधण्याचे, माहिती देण्याचे कौशल्य नक्कीच आत्मसात करावे लागेल. निरोगी जीवनासाठी प्रत्येक महिलेने एक गुंठ्याची का होईना पोषण बाग विकसित करावी आणि त्यामार्गे आपल्या शरीरातील पोषकमूल्ये जर कमी असतील तर त्यावर सुद्धा लक्ष देऊन आपली पोषक शक्ती वाढवावी लागेल. पोषणबागेमुळे आजारपण कमी होते आणि बचत सुद्धा होते.”
मनीषा घोगरे, (समुपदेशक जुन्नर पोलीस स्थानक) यांनी ग्रामीण भागात आत्महत्या, बालविवाह, विविध गंभीर आजार, तसेच लहान-तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. या सर्व समस्यांबरोबरच मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

प्रगतीशील शेतकरी उत्तम जाधव यांनी सेंद्रिय शेतीवर उत्तम सादरीकरण केले. वेगवेगळ्या स्थानिक वनस्पती उदा. कडुनिंब, सीताफळ, धोत्रा, गुळवेल, करंज, बेलफळ यासह अनेक सेंद्रिय नैसर्गिक वस्तूंचा वापर करून कीटकनाशके कशी तयार करता येतील यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून उपयुक्त सूचना दिल्या. आजच्या काळात कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सेंद्रिय अन्नाचा वापर आपल्या आहारात वाढवणे अत्यंत गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. सेंद्रिय शेतीमुळे शेतमालाची उत्पादकता वाढते तसेच मातीची सुपीकता वाढते हे त्यांनी समजावून सांगितले.
यावेळी डॉ. सुनिल भंडलकर (पशूधन विकास अधिकारी, जुन्नर), श्री. अनंता मस्करे (IBFM-प्रमुख, चैतन्य संस्था), इंगळूनच्या महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि महिला ग्रामसंघ समिती (इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु.) हे सर्व उपस्थित होते. यावेळी येथे झालेल्या प्रदर्शनात शिवली, भिवाडे, इंगनूळ, आळेफाटा येथून या ठिकाणी महिला उद्योजगांचे धान्य-तांदूळ, वॉलपीस, कपडे, कोंबडी-गावरान अंडे, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, जनावरांचे औषधे बद्दल स्टॉल मांडण्यात आले होते. अफार्मचे श्री. सावता दुधाळ (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर श्री. हनुमंत दुधाने यांनी आभार प्रदर्शन केले. ओंकार फरतारे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष मेहनत घेतली.
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन9 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली