गावागावातुन
आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/10/1001325191-1000x570.jpg&description=आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/10/1001325191-1000x570.jpg&description=आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर प्रतिनिधी
मला येथील जनतेने 1990 साली वयाच्या 34 व्या वर्षी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली .त्यावेळी परिस्थिती अवघड होती. तालुक्यातील अनेक लोक तालुक्याबाहेर रोजगार मिळवण्यासाठी जात होते. आज परिस्थिती बदलली आहे शिरूर तालुक्याला सगळ्या नद्यांवरील धरणांचे पाणी येत आहे .शिरूर तालुका बागायती झाला त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका बागायती झाला आंबेगाव शिरूर तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर येथे झालेली प्रगती लक्षात येते.येथे झालेला बदल दिसून येतो पाण्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यात सुबत्ता आली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या.असे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.
मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी शिरूर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे निरीक्षक अतुल ब्रह्मभट्ट ,पोपटराव गावडे,पुर्वाताई वळसे पाटील,देवेंद्र शहा,बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील,जयसिंग एरंडे उपस्थित होते.

निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेले पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल.
डिंभे धरणाचे भूमिपूजन 1978 साली झाले परंतु 2000 सालापर्यंत पाणी मिळाले नव्हते. 90 साली आमदार झाल्यानंतर अधीकचा निधी आणून डिंभे धरणाचे काम पूर्ण केले. त्याचप्रमाणे कुकडी प्रकल्पा अंतर्गत 65 बंधारे आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यात उभे केले. अजूनही सातगाव पठार, आदिवासी भाग व शिरूर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी पोहचवायचे आहे.ही गावे बागायती करायची आहेत. कुकडीची तिसरी मान्यता झाली तेव्हा 65 बंधारे एकदाच भरायचे नियोजन होते.परंतु आपण या निर्णयात बदल केला आणि 65 बंधारे या प्रकल्पांतर्गत आणले.डिंभे धरणाला बोगदा पाडून धरणातील पाणी पलीकडच्या बाजूला न्यायचे होते असे झाले असते तर तीन महिन्यात धरण रिकामे झाले असते. आणि पुन्हा एकदा आंबेगाव शिरूर तालुका हा दुष्काळी झाला असता. माळीनची दुर्घटना झाली त्यानंतर नवीन गाव वसवले तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आसाणे या ठिकाणी तलाव बांधुन त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.थिटेवाडी बंदरातील गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. कळमोडी चे काम लवकर पूर्णत्वास येईल आणि त्या माध्यमातून शिरूर खेड आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बागायती होतील मोठ्या प्रमाणावर इमारती आपण तालुक्यात बांधल्या.आपला भीमाशंकर कारखाना उत्तम सुरू आहे .शेजारील कारखाना बंद पडला पण त्यावर कोणी बोलत नाही आपण 3200 रुपये बाजार भाव दिला.आपण अनेक सरकारी शाळा वसतिगृह इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केला त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातून आपण शिक्षणाचे काम करत आहोत इंजिनिअरिंग महाविद्याल सुरु केले.
आरोग्य सेवेसाठी पहिले तीस बेडचे मंचर या ठिकाणी हॉस्पिटल सुरु केली त्यानंतर 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय केले त्यासाठी देवेंद्र शहा अध्यक्ष असलेल्या पांजरपोळ ट्रस्टची जागा त्यांनी सरकारला दिली. तांबडेमळा या ठिकाणी 100 बेडच्या नवीन हॉस्पिटलचे काम सुरू आहे .त्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आपण देत आहोत .
भीमाशंकर तिर्थक्षेत्रासाठी 148 कोटीचा आराखडा मंजूर आहे. परंतु तेथे वनविभाग व इतर कायदे अडचणीमुळे थोडी अडचण आहे .पण यावरही मार्ग काढून हा विकासाचा आराखडा पुर्ण करु.अनेक देवस्थानांना आपण चांगल्या प्रकारे निधी दिला आहे. मंचर येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधली घोडेगाव तहसील कार्यालय इमारत बांधली ,कोर्टाची इमारत बांधली. पंचायत समिती कार्यालयाची इमारत बांधली. मंचर व घोडेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस वसाहत बांधली .भोरवाडी या ठिकाणी एसटी डेपो सुरू केला नवीन बस स्थानक मंचर या ठिकाणी आपल्याला करावयाचे आहे. मंचर ग्रामपंचायत ची नगरपंचायत केली.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणला मी अजित दादा पवार यांच्याकडून निधी आणला व मंचरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. तालुक्यात अष्टविनायक महामार्ग व बेल्हा जेजुरी महामार्ग उभे केले. तसेच नवीन अवसरी फाटा पारगाव ,टाकळी हाजी ,मलठण गणेगाव खालसा, शिक्रापूर असा नवीन रस्ता मंजूर आहे त्यासाठी 416 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
विजेच्या बाबतीत अनेक कामे केली पाण्यासाठी आपण 135 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 63069 महिलांना व शिरूर तालुक्यातील 37390 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. बळीराजा योजनेतून 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज देण्याचे काम आपण केल.असे वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणाव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश स्वामी थोरात यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार अंकीत जाधव यांनी मानले
गावागावातुन
पोंदेवाडी येथील मखर पडवळवस्ती रस्ता खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने केला दुरुस्त.
मंचर-
मागील अनेक दिवसापासून आंबेगाव तालुका चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक गावचे रस्ते खराब झाले असून.पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील मखर पडवळवस्ती हा रस्ता खराब झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे मागणी स्थानिक ग्रामस्थ करत होते.या माघनी नुसार खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला असून त्यामुळे मखर पोखरकरवस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना होणारा अडथळा दूर झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आंबेगाव तालुक्यातही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.पोंदेवाडी गावातही या पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत.पोंदेवाडी येथील मखरवस्ती पडवळवस्ती हा रस्ता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. हा रस्ता मातीचा असल्याने यावर खड्डे पडले होते तसेच पाणीही साचले होते.त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होत होता. म्हणून येथील नागरिकांनी सदर रस्त्याची बाबत अडचण खरेदी विक्री संघाचे माझी अध्यक्ष अनिल वाळूंज यांना सांगितली.

सध्या राज्यातील एकुण ग्रामपंचायी पैकी अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असल्याने अनेक विकास कामे करण्यासाठी वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने जवळपास दीड लाख रुपये खर्च करून ट्रॅक्टर डंपर जेसीबीच्या साह्याने रस्ता दुरुस्त केला. त्यामुळे येथील नागरिकांनी जाणे येण्याची सोय झाली असून नागरिकांनी रस्ता दुरुस्त झाल्याने दोन्ही व्यक्तींचे आभार मानले आहे.
गावागावातुन
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू होणार.माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.
मंचर-
- आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार आहे. या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, याबाबतचे पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे. अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बाजार समितीमध्ये नियमित शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या तरतुदीनुसार पूर्वमान्यता देण्यात आली आहे.
सर्व अटी व शर्तींची पूर्तता झाल्यानंतर योजनेला अंतिम मान्यता देण्याबाबतचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 135 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप.
मंचर-
पोंदेवाडी ता आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात व पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले, यावेळी दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,आनंदा पोंदे,निलेश मांजरे,अशोक दुगड,शिवराम पोखरकर,शिक्षक अनिल गावडे,आप्पासाहेब इखे,अर्जुन महाराज वाळुंज यांसह ग्रामस्थ तसेच दोन्हीही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
