Connect with us

शेतीशिवार

भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर.

Published

on

मंचर-

       दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२६-२७ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी २५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली. 
      याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, ऊस लागवडीसाठी २५ मे २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम. ०२६५ व दि.२५ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.८६०३२ उस लागवडीस व नोंदीस परवानगी दिलेली आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत व्हि.एस.आय. ०८००५ ऊस लागवडीस, दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत  एम.एस.१०००१, फुले ९०५७ ऊस लागवडीस तसेच दि.१ जून २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत  को.व्हि.एस.आय.१८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम.११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. 

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि.२५ मे २०२६ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि. २५ जून २०२६ पर्यंत कधीही लागवड केलेल्या ऊस रोपांची ऊस नोंद दि. २५ मे २०२६ नोंद तारीख राहील. त्यानंतर रोपांपासून ऊस लागवड केलेल्या उसाची नोंद १ महिना अगोदर केली जाईल व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतक-यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० या उधारीने / रोखीने राबविणेत येणा-या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशक बी.व्ही.एम., ई.पी.एन. इ.चा पुरवठा करण्यात येईल, हंगामवार ऊस पिक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेणेत यावा. ऊस पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतक-यांनी आपले प्रवेश शुल्क रु.१००/- डिसेंबर २०२६ अखेर भरुन नाव नोंदणी करावी.
एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतक-यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे माहे जून २०२६ अखेर खरेदी केले जाणार असून शेतक-यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक कीड नियंत्रण करावे.


तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतक-यांनी ऊसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू होणार.माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.

Published

on

मंचर-

  • आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार आहे. या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, याबाबतचे पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे. अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बाजार समितीमध्ये नियमित शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या तरतुदीनुसार पूर्वमान्यता देण्यात आली आहे.

सर्व अटी व शर्तींची पूर्तता झाल्यानंतर योजनेला अंतिम मान्यता देण्याबाबतचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

Continue Reading

शेतीशिवार

भीमाशंकरकडून खोडवा उस अनुदानाची रक्कम बॅंकेत वर्ग.

Published

on

मंचर-

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक आ.दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या.

मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या खोडवा उसास रु.१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अनुदान देण्याचे ठरलेनुसार १ लाख ८ हजार ७०२ मे.टनास रक्कम रु. १ कोटी ८ लाख ४० हजार ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


कारखान्याने यापुर्वी गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी.प्रमाणे रु. ३२७३/- प्रती मे.टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. तसेच जाहीर केल्याप्रमाणे सन २०२५-२६ गाळप हंगामात गाळपास आलेल्या खोडवा ऊसाकरीता रु. १००/- प्रति मे.टन अनुदानाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे सभासद व ऊस उत्पादकांना ऊस लागवड व मशागतीस मदत होणार असून ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२६-२७ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

Published

on

मंचर –

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62