गावागावातुन
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.

मंचर प्रतिनिधी
पारगाव (का) पोलीस स्टेशन हद्दीमधुन दिनांक १४/०७/२०२४ रोजी बाळासाहेब लालजी बढेकर रा. धामणी ता. आंबेगाव जि. पुणे यांची जारकरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे येथील कांदयाच्या चाळीतील सुमारे ३६,०००/- रू किंमतीचे कांदे चोरीस गेले होते त्या अनुषंगाने पारगाव का पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ११५/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात पारगाव का पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे व पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग यांना सदर गुन्हयाचे तपास कामी आदेश दिले होते.या गुन्ह्याचा तपास करत असतात या गुन्ह्यातील चार आरोपींना पकडण्यात पारगाव पोलिसांना यश आले आहे.
दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हा घडले ठिकाणचे तसेच आजुबाजुचे परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करीत असताना मौजे जारकरवाडी येथील सी.सी.टी. व्ही फुटेज मध्ये एक संशयीत पिकअप आढळून आली होती. सदर पिकअपचा शोधा घेत असताना. बाळासाहेब केरू सुक्रे यांच्या कांदयाच्या पिशव्या हया चोरीस गेल्याचे समजले त्या अनुषंगाने मौजे खडकवाडी ग्रामपंचायत येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर फुटेज मध्ये एक पांढ-या रंगाची पिकअप नं एम. एच. १२ एम. व्ही १३८० यामुधन अज्ञात ४ ते ५ इसमांनी दुकांनाबाहेर ठेवलेल्या कांदयाच्या पिशव्या ह्या नेल्याचे दिसुन आले. त्या अनपुषंगाने लोणी येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर आरोपी हे मौजे लोणी येथे दिसुन आले त्या अनुषंगाने सदर पिकअप व आरोपी यांचा शोधा घेत असताना सदरचे आरोपी हे पुन्हा चोरीच्या उद्देशाने मौजे लोणी येथे आल्याची गोपनीय माहीती मिळाली असता. तेथील ग्रामसुक्षा दलाचे जवान यांच्या मदतीने सदरचे आरोपी व पिकअप ही ताब्यात घेतली. सदर आरोपी यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अनिकेत शिवराम चव्हाण वय. २१ वर्षे मुळ रा. बारामती सध्या रा. पनवेल २) सुनिल दिनकर चव्हाण वय. १९ वर्षे मुळ रा. परभणी सध्या रा. पनवेल ३) दिपक श्रावण राठोड मुळ रा. परभणी सध्या रा. पनवेल ४) हसरत अली सयद अली अनसारी वय. २० वर्षे मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. पनवेल असे असल्याचे सांगीतले
वरील चारही आरोपी याचीकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबत कबुली दिली असुन सदर गुन्हामध्ये वर नमुद आरोपी यांना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आरोपीतांकडे अजुन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत पुन्हा त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी मौजे लाखणगाव येथुन विहीरीच्या प्लेटा चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील प्लेटा व कांदा विक्रीतुन मिळालेले एकुण २७,०००/-रू हस्तगत करण्यात आले असुन सदर आरोपींनी पारगाव का पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साो, पुणे ग्रामीण, मा.अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साो पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे साो खेडे विभाग खेड, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (का) पोलीस स्टेशन, पो. हवा. दत्तात्रय जढर, पो. हवा देवानंद किर्वे, पो.ना.शांताराम सांगडे, पो. कॉ.संजय साळवे, पो.कॉ.मंगेश अभंग पो.कॉ.चंद्रकांत गव्हाणे, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आकाश खंडागळे, विशाल वाळुंज, संतोष वांळुज यांनी केली असुन चारही आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत.
गावागावातुन
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील १५० महिलांनी घेतला सहलीचा आनंद.

निरगुडसर-पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांच्या एक दिवशी कोकण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 150 महिलांनी सहलीत भाग घेऊन अलिबाग येथील समुद्रकिनारा व इतर पर्यटन स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घेतला.
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांसाठी अनिलभाऊ वाळूंज मित्र मंडळाच्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील महिलांना शेतीच्या कामातून थोडासा वेळ मिळून सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.अलिबाग या ठिकाणी समुद्रकिनारी आणि इतर पर्यटन स्थळांना या महिलांनी भेट दिली.या सहलीच्या निमित्ताने महिलांना कामातून बाहेर पडून आनंद घेता आला यावेळी तीन बसमधून 150 महिलांनी या सहलीत सहभाग घेतला होता.महिलांच्या संपूर्ण सहलीची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर ,महेंद्र पोखरकर, सोमनाथ वाळुंज संतोष वाळुंज अमोल वाळुंज, संदीप घोलप, नानाभाऊ पोखरकर, अमित दौंड प्रकाश दौंड,निलेश मांजरे , नवनाथ मखर ,शुभम वाळुंज चंद्रकांत विरकर.यांनी पाहिली.पोंदेवाडी येथील ग्रामस्थांसाठी दरवर्षी अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात.याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी यावेळी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंकिता वाळुंज यांनी दिली.
गावागावातुन
काठापूरचा शेतकर्याचा मुलगा झाला फौजदार

मंचर- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील अनिकेत सुशिला चंद्रकांत करंडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवित फौजदार पदाला गवसणी घातली. तो गावातील पहिला पुरुष अधिकारी तर गावातील दुसरा अधिकारी ठरला आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिकेत करंडे याने ग्रामीण भागात राहून जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव, तर पुढे मेकॅनिकल इंजिनियर च शिक्षण व्ही आय.टी.पुणे येथुन पुर्ण केले.शिक्षण पुर्ण झाल्यावर अनेक कंपण्यांमध्ये कामाची संधी असतानाही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन अधिकारी होण्याची ईच्छा असल्याने त्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. होता. कोणत्याही संस्थेत अभ्यास न करत स्वताहाच अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत यश मिळवले.अनेकांनी नोकरी कर नोकरीची चांगली संधी आहे. या अवघड परीक्षा देऊ नको अपयश येण्याची जास्त शक्यता आहे.असे सांगितले. परंतु आपल्या ध्येयावर ठाम राहुन त्याने हे यश मिळवले आहे.

त्याला पी.एस.आय.विक्रम कर्डीले यांचे मार्गदर्शन मिळाले. शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनिकेतची आई सुशिला व वडील चंद्रकांत करंडे शेती करुन आपले कुटुंब चालवत आहेत. त्याने मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक आहे.
गावागावातुन
जुन्नर तालुक्यात ‘अफार्म’तर्फे कृषि मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन

जुन्नर -जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात अफार्मने नुकताच महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. Indigo CSR अनुदानित व अफार्म, पुणे संचलित ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प-टप्पा २ अंतर्गत ‘अल्पखर्चिक सेंद्रिय शेती तंत्रज्ञान’ मार्गदर्शन सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. जुन्नर तालुक्यातील इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु. या गावांत सन २०२४ ते २०२७ या कालावधीमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. इंगळून, ता. जुन्नर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त महिला, मुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हक्कदर्शिका म्हणून काम करत असलेल्या नयना उघडे (घंगाळदरे) आणि प्रेरणासखी म्हणून काम करत असलेल्या स्वाती घोरपडे (खानगाव) या लाभार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अफार्म-इंडिगो प्रकल्पामुळे महिलांची चूल-मूल ही मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची उद्योजगतेची मानसिकता घडत असल्याचे या दोन्ही महिलांच्या मनोगतातून समोर आले.

डॉ. सुधा कोठारी, अध्यक्ष-चैतन्य संस्था, खेड आणि कार्यकारी समिती सदस्य, अफार्म या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, “महिला शेतकरी तसेच महिला ग्रामसंघ, महिला उत्पादक गट यांनी गेल्या काही वर्षांत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. महिलांच्या विविध स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणासाठी अफार्मच्या या प्रकल्पाने मोठा हातभार लावला आहे. स्थानिक पातळीवरील लोकांचा पाठींबा, इच्छशक्ती तसेच आपले नियोजन कौशल्य याविषयी प्रचंड उपयोगाला येते याची या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे.”

सौ. निवेदिता शेटे (शास्त्रज्ञ-कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव) या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सबलीकरण हे सर्व येते. प्रत्येक महिलेला जर तिच्या अंगभूत कलागुणांची जाणीव जर झाली तर त्याचा व्यावसायिक अंगाने उपयोग नक्कीच करता येईल. त्यासाठी आपल्याला संवाद साधण्याचे, माहिती देण्याचे कौशल्य नक्कीच आत्मसात करावे लागेल. निरोगी जीवनासाठी प्रत्येक महिलेने एक गुंठ्याची का होईना पोषण बाग विकसित करावी आणि त्यामार्गे आपल्या शरीरातील पोषकमूल्ये जर कमी असतील तर त्यावर सुद्धा लक्ष देऊन आपली पोषक शक्ती वाढवावी लागेल. पोषणबागेमुळे आजारपण कमी होते आणि बचत सुद्धा होते.”
मनीषा घोगरे, (समुपदेशक जुन्नर पोलीस स्थानक) यांनी ग्रामीण भागात आत्महत्या, बालविवाह, विविध गंभीर आजार, तसेच लहान-तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. या सर्व समस्यांबरोबरच मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

प्रगतीशील शेतकरी उत्तम जाधव यांनी सेंद्रिय शेतीवर उत्तम सादरीकरण केले. वेगवेगळ्या स्थानिक वनस्पती उदा. कडुनिंब, सीताफळ, धोत्रा, गुळवेल, करंज, बेलफळ यासह अनेक सेंद्रिय नैसर्गिक वस्तूंचा वापर करून कीटकनाशके कशी तयार करता येतील यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून उपयुक्त सूचना दिल्या. आजच्या काळात कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सेंद्रिय अन्नाचा वापर आपल्या आहारात वाढवणे अत्यंत गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. सेंद्रिय शेतीमुळे शेतमालाची उत्पादकता वाढते तसेच मातीची सुपीकता वाढते हे त्यांनी समजावून सांगितले.
यावेळी डॉ. सुनिल भंडलकर (पशूधन विकास अधिकारी, जुन्नर), श्री. अनंता मस्करे (IBFM-प्रमुख, चैतन्य संस्था), इंगळूनच्या महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि महिला ग्रामसंघ समिती (इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु.) हे सर्व उपस्थित होते. यावेळी येथे झालेल्या प्रदर्शनात शिवली, भिवाडे, इंगनूळ, आळेफाटा येथून या ठिकाणी महिला उद्योजगांचे धान्य-तांदूळ, वॉलपीस, कपडे, कोंबडी-गावरान अंडे, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, जनावरांचे औषधे बद्दल स्टॉल मांडण्यात आले होते. अफार्मचे श्री. सावता दुधाळ (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर श्री. हनुमंत दुधाने यांनी आभार प्रदर्शन केले. ओंकार फरतारे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष मेहनत घेतली.
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन9 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली
-
सामाजिक1 year ago
शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.