Customize Consent Preferences

We use cookies to help you navigate efficiently and perform certain functions. You will find detailed information about all cookies under each consent category below.

The cookies that are categorized as "Necessary" are stored on your browser as they are essential for enabling the basic functionalities of the site. ... 

Always Active

Necessary cookies are required to enable the basic features of this site, such as providing secure log-in or adjusting your consent preferences. These cookies do not store any personally identifiable data.

No cookies to display.

Functional cookies help perform certain functionalities like sharing the content of the website on social media platforms, collecting feedback, and other third-party features.

No cookies to display.

Analytical cookies are used to understand how visitors interact with the website. These cookies help provide information on metrics such as the number of visitors, bounce rate, traffic source, etc.

No cookies to display.

Performance cookies are used to understand and analyze the key performance indexes of the website which helps in delivering a better user experience for the visitors.

No cookies to display.

Advertisement cookies are used to provide visitors with customized advertisements based on the pages you visited previously and to analyze the effectiveness of the ad campaigns.

No cookies to display.

Connect with us

राजकीय

माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे दोन ते अडिच कोटी महिलांना होनार लाभ.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Published

on

मंचर प्रतिनिधी

माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. येथील लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा विश्वास आहे.दोन ते अडीच कोटी महिला भगिनींना या योजनेचा फायदा होणार आहे.ही योजना महिलांना सबल आणि सक्षम करण्यासाठी सुरू राहील. आंबेगाव शिरुरला दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व मिळाले आहे.ते विधिमंडळात अतिशय यशस्वी जबाबदारी पार पाडतात असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.

मंचर (तालुका आंबेगाव ) या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित दादा पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेश घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा,भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील,पुर्वा वळसे पाटील,विष्णुकाका हिंगे,अंकीत जाधव,निलेश थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित दादा पवार म्हणाले की 34 वर्षात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगावचा कायापालट झाला आहे.त्यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध संस्था उभ्या राहिल्या आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरित प्रश्न सोडवले जातील.कळमोडीचे, म्हाळसाकांत ,शिरूर तालुक्यातील बारा गावांसाठी पाणी योजना होईल. आदिवासी भागातील गावांसाठी ही पाणी योजना करण्यात येईल .डिंभे चा बोगदा जुन्नर आंबेगावच्या हिताचे जे असेल त्यानुसार केला जाईल. सध्या आम्ही फक्त विकासाच बोलायचं ठरवलं आहे.विरोधक काही म्हणतात परंतु काही म्हणून प्रश्न सुटत नाही. एखादा कार्यकर्ता सर्व गुणसंपन्न होण्यासाठी 25 ते 30 वर्षे काम करावे लागते. आम्ही ते केलं शिव, शाहू, फुले विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही चाललो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संविधान बदलणार अशा वावड्या उठवल्या परंतु तसं नाही संविधान बदलल जानार नाही. मोदी साहेब संविधानाचा आदर करतात .चुकीची माहिती पसरवून गैरसमज निर्माण केला जातो. मी शब्दाचा पक्का आहे .जे झालं ते झालं इथून पुढे आपण सर्वांनी आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभ राहिले पाहिजे हि विनंती करतो.महिलांचे खूप मोठे प्रेम आम्हा सर्वांना मिळत आहे. महिला बालकल्यान मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी पैशाची मागणी केल्यानंतर सक्षग हजार कोटीच्या फाईलवर सही करून ते पैसे वर्ग केले. एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यावर पैसे गेले आहेत .रक्षाबंधन आधी दीड कोटी महिलांच्या खात्यावर सन्मान निधी हस्तांतरीत होईल.शेतकऱ्यांनसाठी साडेसात एचपी मोटर पर्यंत लाईट बिल माफ केले आहे व ते इथून पुढे माफ केले जाईल. पुढच्या सात ते आठ महिन्यात दिवसा विज देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .माघेल त्याला सोलर पंप दिला जाईल. आंबेगाव शिरुर चे नेतृत्व सक्षम आहे. राज्यातील सर्वाधिक लीड एक नंबरच लीड या निवडणुकीत आपण वळसे पाटलांना दिले पाहिजे असे यावेळी अजित दादा पवार म्हणाले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.

Published

on

मंचर प्रतिनिधी

मला येथील जनतेने 1990 साली वयाच्या 34 व्या वर्षी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली .त्यावेळी परिस्थिती अवघड होती. तालुक्यातील अनेक लोक तालुक्याबाहेर रोजगार मिळवण्यासाठी जात होते. आज परिस्थिती बदलली आहे शिरूर तालुक्याला सगळ्या नद्यांवरील धरणांचे पाणी येत आहे .शिरूर तालुका बागायती झाला त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका बागायती झाला आंबेगाव शिरूर तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर येथे झालेली प्रगती लक्षात येते.येथे झालेला बदल दिसून येतो पाण्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यात सुबत्ता आली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या.असे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.

मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी शिरूर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे निरीक्षक अतुल ब्रह्मभट्ट ,पोपटराव गावडे,पुर्वाताई वळसे पाटील,देवेंद्र शहा,बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील,जयसिंग एरंडे उपस्थित होते.


निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेले पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल.

डिंभे धरणाचे भूमिपूजन 1978 साली झाले परंतु 2000 सालापर्यंत पाणी मिळाले नव्हते. 90 साली आमदार झाल्यानंतर अधीकचा निधी आणून डिंभे धरणाचे काम पूर्ण केले. त्याचप्रमाणे कुकडी प्रकल्पा अंतर्गत 65 बंधारे आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यात उभे केले. अजूनही सातगाव पठार, आदिवासी भाग व शिरूर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी पोहचवायचे आहे.ही गावे बागायती करायची आहेत. कुकडीची तिसरी मान्यता झाली तेव्हा 65 बंधारे एकदाच भरायचे नियोजन होते.परंतु आपण या निर्णयात बदल केला आणि 65 बंधारे या प्रकल्पांतर्गत आणले.डिंभे धरणाला बोगदा पाडून धरणातील पाणी पलीकडच्या बाजूला न्यायचे होते असे झाले असते तर तीन महिन्यात धरण रिकामे झाले असते. आणि पुन्हा एकदा आंबेगाव शिरूर तालुका हा दुष्काळी झाला असता. माळीनची दुर्घटना झाली त्यानंतर नवीन गाव वसवले तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आसाणे या ठिकाणी तलाव बांधुन त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.थिटेवाडी बंदरातील गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. कळमोडी चे काम लवकर पूर्णत्वास येईल आणि त्या माध्यमातून शिरूर खेड आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बागायती होतील मोठ्या प्रमाणावर इमारती आपण तालुक्यात बांधल्या.आपला भीमाशंकर कारखाना उत्तम सुरू आहे .शेजारील कारखाना बंद पडला पण त्यावर कोणी बोलत नाही आपण 3200 रुपये बाजार भाव दिला.आपण अनेक सरकारी शाळा वसतिगृह इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केला त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातून आपण शिक्षणाचे काम करत आहोत इंजिनिअरिंग महाविद्याल सुरु केले.
आरोग्य सेवेसाठी पहिले तीस बेडचे मंचर या ठिकाणी हॉस्पिटल सुरु केली त्यानंतर 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय केले त्यासाठी देवेंद्र शहा अध्यक्ष असलेल्या पांजरपोळ ट्रस्टची जागा त्यांनी सरकारला दिली. तांबडेमळा या ठिकाणी 100 बेडच्या नवीन हॉस्पिटलचे काम सुरू आहे .त्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आपण देत आहोत .
भीमाशंकर तिर्थक्षेत्रासाठी 148 कोटीचा आराखडा मंजूर आहे. परंतु तेथे वनविभाग व इतर कायदे अडचणीमुळे थोडी अडचण आहे .पण यावरही मार्ग काढून हा विकासाचा आराखडा पुर्ण करु.अनेक देवस्थानांना आपण चांगल्या प्रकारे निधी दिला आहे. मंचर येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधली घोडेगाव तहसील कार्यालय इमारत बांधली ,कोर्टाची इमारत बांधली. पंचायत समिती कार्यालयाची इमारत बांधली. मंचर व घोडेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस वसाहत बांधली .भोरवाडी या ठिकाणी एसटी डेपो सुरू केला नवीन बस स्थानक मंचर या ठिकाणी आपल्याला करावयाचे आहे. मंचर ग्रामपंचायत ची नगरपंचायत केली.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणला मी अजित दादा पवार यांच्याकडून निधी आणला व मंचरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. तालुक्यात अष्टविनायक महामार्ग व बेल्हा जेजुरी महामार्ग उभे केले. तसेच नवीन अवसरी फाटा पारगाव ,टाकळी हाजी ,मलठण गणेगाव खालसा, शिक्रापूर असा नवीन रस्ता मंजूर आहे त्यासाठी 416 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
विजेच्या बाबतीत अनेक कामे केली पाण्यासाठी आपण 135 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 63069 महिलांना व शिरूर तालुक्यातील 37390 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. बळीराजा योजनेतून 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज देण्याचे काम आपण केल.असे वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणाव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश स्वामी थोरात यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार अंकीत जाधव यांनी मानले

Continue Reading

राजकीय

लाडकी बहिण योजनेचा आनंद बहिनींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.माघील वर्षभरात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.

Published

on

मंचर प्रतिनिधी

मागील वर्षभराच्या कालखंडामध्ये या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला आणि हीच भूमिका या सरकारची आहे. लाडकी बहिण योजनेचा आनंद बहिणींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे आयोजित जनसंकल्प अभियान यात्रे प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेश घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा ,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील, पुर्वा वळसे पाटील, विष्णुकाका हींगे,अंकीत जाधव,यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. चक्रीवादळ अतिवृष्टी च्या वेळी सरकारच्या वतीने मदत केली जात आहे .खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील हिरडा विकासासाठी 15 कोटी रुपये दिले आहेत. मागील 35 वर्षे मला विधिमंडळात पाठवले त्या माध्यमातून मी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा या पुणे मुंबईच्या रुग्णालयाच्या तोडीची आहे. नवीन 100 बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. शिक्षणासाठी हायस्कूल, वस्तीगृह, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग ,आश्रम शाळा सुरू केल्या.अवसरीच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग च्या माध्यमातून अनेक तरुण इंजिनियर तालुक्यात निर्माण झाले. पुढच्या पाच वर्षात एकच काम करायचे आहे आंबेगाव जुन्नर शिरूर मध्ये 65 केटी बंधारे आहेत हे तीन वेळा भरले जातात. आणि त्यातून शेतकरी समृद्ध झाला आहे. यासाठी पाणी आरक्षित करायचे आहे .कळमजाई ,बोरघर, फुलवडे साठी लिफ्ट पाणी योजना .लोणी धामणीसाठी म्हाळसाकांत.शिरुरच्या पाबळ केंदुर परिसरातील 12 गावांसाठी पाणी योजना ,सातगाव पठार साठी कळमोडी या योजना पूर्ण करायच्या आहेत.
विधानसभा ताकतीने लढवायची व जिंकायची आहे .काही लोक बदनामी करतात खोटे बोलतात त्याला मी उत्तर देऊ इच्छित नाही. माझी मुलगी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही म्हणून मलाच उभे राहावे लागेल असे यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुकच्या उपसरपंचपदी दादाभाऊ गायकवाड यांची निवड

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे

काठापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच निवडणूकीत दादाभाऊ गायकवाड यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडील काठापूर बुद्रुक येथे उपसरपंच पदाची निवडनुक नुकतीच पार पडली यावेळी दादाभाऊ गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अशोक करंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. सुवर्णा गोसावी ग्रामसेवक यांनी सचिव म्हणून सभेचे कामकाज पाहिले. यावेळी माझी उपसरपंच विशाल करंडे,पप्पू खुडे,ग्रामपंचायत सदस्य पुनम करंडे, अर्चना जाधव ,शोभा जोरी, सुनीता मैड,विलास सोनार,दत्ता शितोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्यावर दादाभाऊ गायकवाड त्यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

Continue Reading
Advertisement

Trending