गावागावातुन
भीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या ११,३८,४९६ मे.टन ऊसास रु.१७५/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ३६ हजार सोमवार (२९ सप्टेंबर) रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ११,३८,४९६ मे. टन ऊसासाठी रु. ३,२९०/- प्रती मे.टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. यापूर्वी एफ.आर.पी.प्रमाणे अदा केलेला रु. ३,०८०/- प्रती मे. टन वजा जाता रु. २१०/- प्रती मे.टन शिल्लक राहत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार शिक्षण संस्था निधी रु.१०/- प्रती मे. टन व भाग विकास निधी रु.२५/- प्रती मे. टन वजा जाता उर्वरित रक्कम रु. १७५/- प्रती मे. टनाप्रमाणे होणारी रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ३६ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दिपावलीपूर्वी शेतक-यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असून रब्बी हंगामाची सोसायटी रक्कम भरणा करण्यास मदत होणार आहे.

कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे. याशिवाय वाढीव रक्कम कपाती वजा जाता रु. १७५/- प्रती मे. टन अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेली आहे. लवकरच साखर वाटप देखील केले जाणार आहे. गाळप हंगाम २०२५-२६ करीता ऊस गाळपाची तयारी झालेली असून त्यामध्ये मशिनरीचे संपूर्ण ओव्हरऑयलिंग पूर्ण झालेले असून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून अॅडव्हान्स अदा केलेला आहे. संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

गावागावातुन
भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.
मंचर-
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.
मंचर-
भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.
उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.
भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.
मंचर-
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन2 years agoविठू माऊली
