Connect with us

गावागावातुन

ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आंबेगाव तालुक्यातील धामणी खिंड.

Published

on


शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड – गावडेवाडी


सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यावर असणारी हिरवीगार झाडी, डिंभे उजव्या कालव्याचा दुथडी भरुन वाहणारा पाट, हिरवीगार वाऱ्यावर डोलणारी शेती, आणि मधूनच मनमोहक मोर व लांडोरीचे बागडणे या गोष्टी मनाला आकर्षित करतात .
हे दृश्य आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मंचर पासून पूर्वेला अगदी १५ कि . मी असलेल्या धामणी खिंडीचे . या धामणी खिंडीत श्री संत ज्ञानोबा राय व त्यांच्यासह चार भावंडांनी पैठण वरून शुद्धिपत्र घेऊन जाताना मुक्काम केला असल्याची आख्यायिका सांगितली जाते .तेव्हापासून या स्थळाला एक पवित्र रूप आले आहे येथील धामणी, शिरदाळे, पहाडदरा व बढेकर मळा,जारकरवाडी व पंचक्रोशीतील भाविकांनी ग्राम सहभागातून व लोकवर्गणीतून येथे मोठे व आकर्षक मंदिर उभारले आहे या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर माऊली तसेच या चार भावंडांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती बसविल्या आहेत व ज्या शिळेवर माऊली बसले होते त्या शिळेचीही स्थापना केली आहे . या मंदिरात दरवर्षी आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो यामध्ये येथील बढेकर मळ्याचा संयोजनात मोठा सहभाग असतो. सप्ताहाच्या शेवटी शेवटच्या दिवशी येथे तिखट व गोड डाळीची चविष्ट कढई भरून आमटी बनवली जाते ग्रामस्थ घरटी पाच ते दहा बाजरीच्या भाकरी आणतात व असा चविष्टआमटीचा प्रसाद घेऊनअसा आगळावेगळा गोपाळकाला येथे साजरा केला जातो .


या ठिकाणी सकाळच्या प्रहरी थव्याथव्याने या मंदिर परिसरात मोर बागडताना दिसतात या मोरांना येथील पुजारी मल्हारी रोडे हे नित्यनेमाने धान्य खायला टाकतात . त्यामुळे हे मोर माणसाळलेले आहेत .आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधीतून दोन मोठे भव्य मंडप या परिसरात उभारून या स्थळाचा कायापालट केला आहे त्यामुळे भाविकांचे व पर्यटकांचे मन येथे रमते या भागातील रस्ते चकचकीत डांबरी असल्याने भाविकांचा व पर्यटकांचा प्रवास सुखावह होतो . या मंदिराचे व येथील स्थळाचे पावित्र्य रहावे म्हणून येथील ग्रामस्थ सतत प्रयत्नशील आहेत कुणीही यावे व या पवित्र स्थळी लीन व्हावे येथील निसर्गाचा व पावित्र्याचा लाभ घ्यावा असेच हे ठिकाण आहे

धामणी खिंड आम्हा ग्रामस्थांचे अस्मितेचे ठिकाण आहे माऊलींच्या पदस्पर्श व निसर्ग सौंदर्य व मोरांचे बागडणे हे आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे या भागातील व पंचक्रोशीतील सामाजिक संस्थांनी या बागडणाऱ्या मोरांसाठी चाऱ्या पाण्याची व धान्याची सोय करायला हवी-
रेश्मा अजित बोऱ्हाडे . लोकनियुक्त सरपंच धामणी यांनी सांगितले.


येथील जंगलात विविध प्रकारचे वन्य प्राणी वावरत आहेत या वन्य प्राण्यांसाठी वन विभागाने पानवठे उभारले असून त्यात टँकरने नेहमीपाणी सोडले जाते येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही असे वर्तन ठेवावे असे स्मिता राजहंस . वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांनी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.

Published

on

मंचर-

भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.

उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.

भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अ‍ॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading
Advertisement

Trending