Connect with us

सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

‌मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.


लाखनगाव धरमवस्ती येथील शेतकरी विक्रम राजाराम धरम यांनी दहा हजार पक्षांची २५० फुट लांबीचे पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम पुर्ण होऊन लोखंडी सांगाडा उभा केला होता तर भिंतीचे प्लास्टर व पत्रे बसविण्याचे काम बाकी होते. पण अवकाळी पावसाने व वार्याने दोन्ही भिंती पडल्याने ७०हजार ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.या पोल्ट्री शेडसाठी विविध कार्यकारी सोसायटीने वित्तीय पुरवठा केला होता. परंतु व्यवसाय सुरू होण्या आधीच नुकसान झाले आहे.


सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची शाश्वती राहिली नसताना अनेक तरुण हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत परंतु या अवकाळी संकटाचा सामना या तरुणांना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीतच व्यवसाय उभे करतानाही येणार्या संकटांमुळे तरुण वर्गा पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.


आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी मनोज रोडे पाटील यांनी केली आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

पोंदेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा.संदीप पोखरकर यांची मागणी.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पहाटेच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून. या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी पोंदेवाडी चे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.


‌‌ सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्या वारंवार पहावयास मिळत आहे.सध्या ऊस हा डोक्यापेक्षा जास्त उंचीचा झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा बिबट्याने आपला मोर्चा उसाच्या परिसरात वळवल्याचे दिसुन येते.

पोंदेवाडी येथील रोडेवस्ती या ठिकाणी आनंदा बबन पोंदे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने पहाटेच्या वेळी हल्ला करून त्याला ठार केले.सदर वासरू बांधलेले असल्याने बिबट्याला ते वासरू घेऊन जाता आले नाही. त्यामुळे त्याच ठिकाणी वासराचा फडशा पाडला.पहाटे चारच्या दरम्यान आनंदा पोंदे हे जागे झाले असता वासरू व्यवस्थित बसले होते. परंतु सकाळी पाहिले असता वासराला बिबट्याने ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी संपर्क साधुन मृत वासराचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

रोडेवस्ती येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.रात्री नऊच्या दरम्यान बिबट्या या परिसरात दिसून आला होता.त्यामुळे हा बिबट्या या ठिकाणी स्थायिक असून दोन बिबटे जोडीने फिरत असल्याचे या बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा अशी माघणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडी येथील मखर पडवळवस्ती रस्ता खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने केला दुरुस्त.

Published

on

मंचर-

मागील अनेक दिवसापासून आंबेगाव तालुका चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक गावचे रस्ते खराब झाले असून.पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील मखर पडवळवस्ती हा रस्ता खराब झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे मागणी स्थानिक ग्रामस्थ करत होते.या माघनी नुसार खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला असून त्यामुळे मखर पोखरकरवस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना होणारा अडथळा दूर झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आंबेगाव तालुक्यातही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.पोंदेवाडी गावातही या पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत.पोंदेवाडी येथील मखरवस्ती पडवळवस्ती हा रस्ता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. हा रस्ता मातीचा असल्याने यावर खड्डे पडले होते तसेच पाणीही साचले होते.त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होत होता. म्हणून येथील नागरिकांनी सदर रस्त्याची बाबत अडचण खरेदी विक्री संघाचे माझी अध्यक्ष अनिल वाळूंज यांना सांगितली.

सध्या राज्यातील एकुण ग्रामपंचायी पैकी अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असल्याने अनेक विकास कामे करण्यासाठी वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने जवळपास दीड लाख रुपये खर्च करून ट्रॅक्टर डंपर जेसीबीच्या साह्याने रस्ता दुरुस्त केला. त्यामुळे येथील नागरिकांनी जाणे येण्याची सोय झाली असून नागरिकांनी रस्ता दुरुस्त झाल्याने दोन्ही व्यक्तींचे आभार मानले आहे.

Continue Reading

मनोरंजन

मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांचे भव्य स्मारक उभारणार: आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा.

Published

on

मंचर –
मराठी साहित्यविश्वाचा मानबिंदू आणि ज्येष्ठ कवयित्री कै. शांताबाई शेळके यांच्या स्मृती जपणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेल्या मंचर येथील ऐतिहासिक वाड्याच्या जागी त्यांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

​गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंचर येथील शांताबाई शेळके यांचा ऐतिहासिक वाडा अंशतः कोसळला. या घटनेवर दुःख व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ही केवळ एका जुन्या वास्तूची पडझड नसून मराठी साहित्याच्या एका जिवंत स्मृतीला बसलेला आघात आहे. आंबेगावच्या संस्कारांनी शांताबाईंच्या संवेदनशील मनाला आकार दिला आणि याच मातीतून मराठी साहित्याला असंख्य अजरामर कविता व गीतांची देणगी मिळाली.”



​शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करताना वळसे पाटील भावुक झाले. “महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शांताबाई माझ्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या अध्यापनातील साधेपणा, साहित्यावरील नितांत प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे हा वाडा कोसळल्याचे वृत्त समजताच मन हेलावून गेले,” असे त्यांनी सांगितले.

​पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्मृती
​यापूर्वीही अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रेक्षकगृहाला शांताबाई शेळके यांचे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. आता त्याच भावनेला पुढे नेत, वाड्याच्या जागेवर स्मारकाची उभारणी करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

​”हे स्मारक केवळ दगड-विटांची वास्तू नसेल, तर मराठी साहित्याला आयुष्यभर समृद्ध करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली असेल. शांताबाईंचा शब्दवारसा आणि आंबेगावशी असलेले त्यांचे अतूट नातं पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62