Connect with us

गावागावातुन

आदर्शगाव गावडेवाडीचे दक्षिण मुखी हनुमान मंदिर

Published

on

शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड पत्रकार गावडेवाडी.

गावडेवाडी फाट्यावर आल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन डेरेदार भाविकांचे स्वागत करणारे वटवृक्ष, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी, गावात पोहोचल्यावर कोकणातील जांभ्या दगडाने उभारलेले प्रवेशद्वार, डाव्या बाजूला आकर्षित हिरकणी माध्यमिक विद्यालय ,उजव्या बाजूला येणारा जाणाऱ्यांचे स्वागत करणारी गावची ग्रामपंचायत ,त्याचप्रमाणे जि .प .ची मराठी शाळा शेतात डोलणाऱ्या फळांच्या बागा व गावच्या सीमेवर असणारे हनुमानाचे टुमदार मंदिर हे सुंदर दृश्य आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्श गाव गावडेवाडीचे.

पुण्यापासून अवघ्या ६५ कि .मी . अंतरावर व मंचर पासून अवघ्या पाच ते सात किमी अंतरावर पूर्वेला आदर्शगाव गावडेवाडी हे टुमदार खेडे वसलेले आहे याच गावात सीमेवर दक्षिण मुखी हनुमंताचे जागृत देवस्थान आहे दक्षिण मुखी असल्याने हे अतिशय जागृत देवस्थान आहे त्यामुळे गावकऱ्यांची त्याच्यावर अपार श्रद्धा आहे गावडेवाडीच्या पूर्वजांनी गावच्या सिमेवर हे चौपाखी मंदिर कौलारू मंदिर उभारले मात्र काळाच्या ओघात ते मंदिर जुने झाले होते गावातील साई युवक क्रीडा मंडळाचे व साई युवा फंडाचे तरुण एकत्र येऊन त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले गावचे प्रवेशद्वार जसे कोकणातील जांभ्या दगडाचे आहे तसेच आपल्या दक्षिणमुखी हनुमंत रायांचे मंदिरही कोकणातील लाल जांभ्या दगडांचे असावे असा विचार सर्वांनी मांडला. पुणे मुंबईत असलेले व गावच्या पंचक्रोशीतून ग्रामस्थांची संमती मिळाली व अल्पावधीतच हे हनुमंत रायांचे आकर्षक चौपाखी जुने स्वरूप जराही न बदलता मनमोहक मंदिर उभे राहिले या मंदिरासाठी साई युवक क्रीडा मंडळाने तनाने मनाने धनाने अहोरात्र कष्ट घेतले. हा हनुमंत राया दक्षिणमुखी असल्याने तो संकटात धावतो व पावतो अशी श्रद्धा असल्याने राज्यभरातून भाविकांची येथे सतत वर्दळ असते. आलेल्या प्रत्येक भाविकाला आपण कोकणात आलो आहोत असा भास होतो. या जागृत हनुमंत राया पुढे नतमस्तक होतो. इकडे येणारे रस्ते अतिशय गडबडीत आहेत हे रस्ते चकचकीत डांबरी व्हावेत व एसटी महामंडळाच्या मंचर आगाराने प्रत्येक तासाला येथे एसटी बस सुरू करावी एवढी माफक अपेक्षा येतील ग्रामस्थांची आहे.

आदर्श गाव गावडेवाडीतील दक्षिण मुखी जागृत हनुमान ही आमची अस्मिता आहे हनुमान व मंदिर हे आमच्या गावाचे वैभव आहे या मंदिराचे पावित्र्य व जाग्रुकता टिकावी म्हणून आमच्या गावातील अबाल वृद्ध सदैव प्रयत्नशील असतात .या हनुमंतरायांची नित्यनेमाने पूजाअर्चा होते असे
विजय धोंडीबा गावडे.सरपंच आदर्शगाव गावडेवाडी
.

मी एका साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे मात्र या हनुमंतावर अपार श्रद्धा . चिकाटी जिद्द नियमित पूजा आरती यामुळे मला बळ मिळाले आहे हनुमंतांच्या श्रद्धेमुळे मी व माझी मुले उद्योजक म्हणून नावारुपास आलो आहोत ही सर्व या दक्षिणमुखी हनुमंतरायाची कृपा आहे असे
दिलीप दत्तात्रय शिंदे ग्रामस्थ व भाविक आदर्शगाव गावडेवाडी
.


आदर्श गाव गावडेवाडी येथील नवयुवक क्रीडा मंडळ व साई युवक क्रीडा मंडळ व साई युवा फंड मुंबई यांच्या अथक प्रयत्नाने व अतिशय कष्टाने हे हनुमान रायाचे मंदिर आम्ही उभारले आहे यासाठी मोठा खर्च झाला आहे परंतु गावडेवाडी ग्रामस्थ पुणे मुंबई ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे होऊ शकले आहे हनुमंत राया वरची अपार श्रद्धा व दक्षिण मुख असलेले मंदिर यामुळे सर्व हे सिद्धीला गेलेले आहे
जयंत नामदेव गावडे
अध्यक्ष साई युवक क्रीडा मंडळ
व मुख्य प्रवर्तक दक्षिण मुखी हनुमान मंदिर आदर्श ग्राम गावडेवाडी

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.

Published

on

मंचर-

भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.

उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.

भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अ‍ॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading
Advertisement

Trending