Connect with us

गावागावातुन

गणेशनगर मेंगडेवाडी येथील नवसाला पावणारा स्वयंभू श्री गणेश

Published

on

शब्दांकन -पत्रकार श्री.ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या मंचर शिरूर मार्गावर मंचर पासून पूर्वेला असलेल्या बारा किलोमीटरच्या अंतरावर साधारणपणे दोन हजार लोकवस्तीचे अतिशय सुंदर व छोटेसे खेडे मेंगडेवाडी . ( गणेशनगर )
. या गावात असलेल्या गणपतीच्या मंदिरातील स्वयंभू श्री गणेश मूर्तीमुळे मेंगडेवाडी गणेशनगर हे छोटेसे गाव आंबेगाव तालुक्यासह महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे या गावात श्री गणेश चतुर्थी व श्री गणेश जयंतीला भव्य गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवले जातात त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला प्रवचन भजन पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक गणेश भक्त गणेशनगर, मेंगडेवाडी येथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात . तसेच नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असलेले मेंगडेवाडी गावातील नागरिक तरुण गणेशोत्सवाला दरवर्षी गावी येऊन श्री गणेशाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात.

‘ प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गावात घरोघरी श्री गणेशाची पूजा करून उपवास धरला जातो . तसेच या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळ देखील वाटप केला जातो दरवर्षी होणाऱ्या गणेश देवाच्या कार्यक्रमात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांच्याकडून प्रबोधन केले जाते .तसेच आठ दिवस पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते अंगारकी चतुर्थीला कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते ही सर्व व्यवस्था समस्त ग्रामस्थ गणेशनगर मेंगडेवाडी व श्री गणेश देवस्थानच्या माध्यमातून केली जाते


नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती
या स्वयंभू गणपती पुढे मनातील मनोकामना सांगितल्यास हा गणपती ती मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी असते . गणेशोत्सवाच्या काळात येथील एकाही घरी गणपतीची प्रतिष्ठापना केलीजात नाही त्यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना या गावातून पुढे उदयास आली.


आख्यायिका

मेंगडेवाडी येथीलजुने जाणते वयोवृद्ध भक्त सांगतात की हे मंदिर प्रथम कोणी व केव्हा बांधलेले आहे हे सांगता येणे कठीण आहे मात्र जुन्या पिढीतील लोकांच्या म्हणण्यानुसार तुळजापूर येथील कदमांची पाटी असलेले काही कदम मंडळी उपजविका करण्यासाठी निरगुडसर या गावी आले ते निरगुडसर येथे वास्तव्य करीत होते त्यावेळी गावचा बराचसा परिसर उजाड माळरान होता गावच्या उत्तरेस घोड नदी तर दक्षिणेस गण्या डोंगर अशी निसर्गरम्य डोंगराची उंच माळराने होती या डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरात शेती जिरायत असल्यामुळे माळरानावर जनावरे शेळ्या जाण्यासाठी कदम मंडळी जात होती या छोट्याशा डोंगरावर एक गणेशाचे छोटे खानी कवलारूमंदिर होते त्या मंदिरात एक शेंदूर लावलेला दगड होता लोक त्याला मनोभावेगणपती म्हणून पुजत होते . कदम हे मेंढ्यांचा व्यवसाय करत. मेंढपाळ असून मेंढ्यांचा व्यवसाय करीत आहेत पुढे मेंडक्यांची वाडी म्हणजेच मेंगडेवाडी असाशब्दप्रयोग रूढ झाला. कदम यांनी आपले आडनाव बदलून मेंगडे हे आडनाव धारण केले . काही काळानंतर डोंगरावर जाता येईना तेव्हा त्यांच्या पूजा अर्चेत खंड पडू लागला तेव्हा गणेशाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तुम्ही जवळच्या अंतरावर जाऊन तेथे जमीन खोदा म्हणजे मी सापडेल जमीन खोदली असता तेथे स्वयंभू गणेशाची मूर्ती मिळाली . तिची प्रतिष्ठापना केली हेच ते गणेशनगर मेंगडेवाडी . आजूबाजूच्या परिसरातून तरुण आबाल वृद्ध या गणेशाचे दर्शन घेण्यास येतात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून या ठिकाणी अतिशय भव्य असा मंडप उभारलेला आहे या मंडपात तीन ते चार हजार लोक एका वेळेला बसू शकतात या भागात येण्यासाठी रस्ते अतिशय चांगले आहेत दळवणाच्या सोयी अतिशय चांगल्या आहेत तरीही पूर्व भागात असल्याने हे स्थान दुर्लक्षित आहे एसटी महामंडळाच्या एसटी बस नसल्याने या ठिकाणी सामान्य भाविकांना येताना त्रास होतो .मात्र लोकप्रतिनिधींचे बारकाईने लक्ष या तीर्थक्षेत्रावर आहे लोकप्रतिनिधींच्या भरीव विकास निधीमुळे या भागाचा कायापालट झालेला आहे .

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.

Published

on

मंचर-

भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.

उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.

भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अ‍ॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading
Advertisement

Trending