शेतीशिवार
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले अनेक गावांंतील शेतीपिकांना होनार फायदा.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/02/1000432118.jpg&description=डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले अनेक गावांंतील शेतीपिकांना होनार फायदा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/02/1000432118.jpg&description=डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले अनेक गावांंतील शेतीपिकांना होनार फायदा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर प्रतिनिधी
डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु जलाशयातून) उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे आंबेगाव-शिरूर तालुक्यातील सुमारे ६० गावातील शेतीपिकांना फायदा होणार आहे. पाण्याचे आवर्तन अंदाजे एक महिना चालणार आहे. आंबेगाव, शिरूर, तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेटसावू लागला होता.याबाबत उजव्या कालव्या लगत असलेल्या शेतकऱ्यांकडून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत होती.तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते. या संदर्भात आज पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डिंभे धरण तसेच घोड व मीना शाखा कालव्यात उन्हाळी हंगामातील पिकाच्या सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सद्या डिंभे धरणात ६४.६४ टक्के पाणीसाठा असुन उजव्या कालव्याला शनिवारी (ता. २४ ) रोजी १२ वाजता पाणी सोडण्यात आलेअसल्याचे शासकीय उपविभागीय अभियंता दत्ता कोकणे यांनी सांगितले.या पाण्यामुळे आंबेगाव तालुक्यातील नारोडी, लांडेवाडी, मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी व शिरूर तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, सोनसांगवी इत्यादी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे.पाण्याचे आवर्तन अंदाजे जवळपास ३० दिवसांहून अधिक चालणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. तीव्र उन्हामुळे विहीर आणि पाझर तलावातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले होते. त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळात पाणी सोडल्याने शेतीपिकांना दिलासा मिळणार आहे. कालव्यात पाणी नसल्याने अनेक शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती मात्र आता पाणी आल्याने शेती पिकाचा जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.
गावागावातुन
भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.

मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
क्षक्षक्षकारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरु केले आहेत. ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणा-या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच येणारा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

– दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ,नुकसानग्रस्त गावांना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांची भेट, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन.
मंचर-
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल पावसाने झोडपले अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,स.पो.नी.सचिन कांडगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बाजार समिती सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.
शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
गावागावातुन
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.
निरगुडसर-
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासुन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातही पाऊस हुलकावणी देत होता.परंतु आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन7 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
