सामाजिक
शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.

निरगुडसर प्रतिनिधी-( राजु देवडे)
शिरदाळे ( ता . आंबेगाव ) येथील शिरदाळे धामणी घाटात ( दि.४ ) मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात बचावले.
गुळणी ( ता.खेड ) येथून बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती समजत आहे.साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास बटाट्याने भरलेला टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला.यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक, वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले अशी माहिती नजीक राहायला असणारे धामणी येथील बाळासाहेब बोऱ्हाडे,विक्रम बोऱ्हाडे,सीमा बोऱ्हाडे यांनी दिली.
गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात असून शिरदाळे ग्रामपंचायत,धामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून आता पुन्हा दोनही ग्रामपंचायच्या वतीने सबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार असून कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
मध्यरात्रीच्या वेळ असताना देखील अपघाताची माहिती सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांना समजताच त्यांचे पती अजित बोऱ्हाडे घटनास्थळी लगेच दाखल होऊन त्यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी पारगाव येथे दवाखान्यात दाखल केले. त्यातील एकाला गंभीर दुखापत असून दोघांना किरकोळ दुखापत आहे.परंतु वारंवार अपघात होत असताना संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून त्वरित काम चालू करावे अशी मागणी शिरदाळे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.
या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुलं,महिला मजूर,शेतकरी यांची कायच वर्दळ या रस्त्याला असते आम्ही दोनही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे.अशी माघणी रेश्मा बोऱ्हाडे सरपंच धामणी यांनी केली आहे.
गावागावातुन
जुन्नर तालुक्यात ‘अफार्म’तर्फे कृषि मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन

जुन्नर -जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात अफार्मने नुकताच महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. Indigo CSR अनुदानित व अफार्म, पुणे संचलित ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प-टप्पा २ अंतर्गत ‘अल्पखर्चिक सेंद्रिय शेती तंत्रज्ञान’ मार्गदर्शन सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. जुन्नर तालुक्यातील इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु. या गावांत सन २०२४ ते २०२७ या कालावधीमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. इंगळून, ता. जुन्नर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त महिला, मुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हक्कदर्शिका म्हणून काम करत असलेल्या नयना उघडे (घंगाळदरे) आणि प्रेरणासखी म्हणून काम करत असलेल्या स्वाती घोरपडे (खानगाव) या लाभार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अफार्म-इंडिगो प्रकल्पामुळे महिलांची चूल-मूल ही मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची उद्योजगतेची मानसिकता घडत असल्याचे या दोन्ही महिलांच्या मनोगतातून समोर आले.

डॉ. सुधा कोठारी, अध्यक्ष-चैतन्य संस्था, खेड आणि कार्यकारी समिती सदस्य, अफार्म या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, “महिला शेतकरी तसेच महिला ग्रामसंघ, महिला उत्पादक गट यांनी गेल्या काही वर्षांत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. महिलांच्या विविध स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणासाठी अफार्मच्या या प्रकल्पाने मोठा हातभार लावला आहे. स्थानिक पातळीवरील लोकांचा पाठींबा, इच्छशक्ती तसेच आपले नियोजन कौशल्य याविषयी प्रचंड उपयोगाला येते याची या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे.”

सौ. निवेदिता शेटे (शास्त्रज्ञ-कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव) या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सबलीकरण हे सर्व येते. प्रत्येक महिलेला जर तिच्या अंगभूत कलागुणांची जाणीव जर झाली तर त्याचा व्यावसायिक अंगाने उपयोग नक्कीच करता येईल. त्यासाठी आपल्याला संवाद साधण्याचे, माहिती देण्याचे कौशल्य नक्कीच आत्मसात करावे लागेल. निरोगी जीवनासाठी प्रत्येक महिलेने एक गुंठ्याची का होईना पोषण बाग विकसित करावी आणि त्यामार्गे आपल्या शरीरातील पोषकमूल्ये जर कमी असतील तर त्यावर सुद्धा लक्ष देऊन आपली पोषक शक्ती वाढवावी लागेल. पोषणबागेमुळे आजारपण कमी होते आणि बचत सुद्धा होते.”
मनीषा घोगरे, (समुपदेशक जुन्नर पोलीस स्थानक) यांनी ग्रामीण भागात आत्महत्या, बालविवाह, विविध गंभीर आजार, तसेच लहान-तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. या सर्व समस्यांबरोबरच मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

प्रगतीशील शेतकरी उत्तम जाधव यांनी सेंद्रिय शेतीवर उत्तम सादरीकरण केले. वेगवेगळ्या स्थानिक वनस्पती उदा. कडुनिंब, सीताफळ, धोत्रा, गुळवेल, करंज, बेलफळ यासह अनेक सेंद्रिय नैसर्गिक वस्तूंचा वापर करून कीटकनाशके कशी तयार करता येतील यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून उपयुक्त सूचना दिल्या. आजच्या काळात कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सेंद्रिय अन्नाचा वापर आपल्या आहारात वाढवणे अत्यंत गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. सेंद्रिय शेतीमुळे शेतमालाची उत्पादकता वाढते तसेच मातीची सुपीकता वाढते हे त्यांनी समजावून सांगितले.
यावेळी डॉ. सुनिल भंडलकर (पशूधन विकास अधिकारी, जुन्नर), श्री. अनंता मस्करे (IBFM-प्रमुख, चैतन्य संस्था), इंगळूनच्या महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि महिला ग्रामसंघ समिती (इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु.) हे सर्व उपस्थित होते. यावेळी येथे झालेल्या प्रदर्शनात शिवली, भिवाडे, इंगनूळ, आळेफाटा येथून या ठिकाणी महिला उद्योजगांचे धान्य-तांदूळ, वॉलपीस, कपडे, कोंबडी-गावरान अंडे, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, जनावरांचे औषधे बद्दल स्टॉल मांडण्यात आले होते. अफार्मचे श्री. सावता दुधाळ (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर श्री. हनुमंत दुधाने यांनी आभार प्रदर्शन केले. ओंकार फरतारे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष मेहनत घेतली.
गावागावातुन
जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व साईप्रेम ग्राम विकास संस्था यवतमाळ अंतर्गत अवसरी खुर्द येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण नुकतेच संपन्न.

मंचर- जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व साई प्रेम ग्राम विकास संस्था यवतमाळ अंतर्गत अवसरी खुर्द येथे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

यावेळी प्रशिक्षणाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा अधिकारी श्री.के.व्ही. डांगळे, प्रवीण प्रशिक्षिका जया माने व माधवी देशपांडे उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमेच्या पूजनाने प्रशिक्षनास सुरुवात झाली उद्घाटन कार्यक्रमात 37 गावचे पाणी गुणवत्तेसाठी 72 महिला उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना श्री.के.व्ही. डांगळे यांनी पाणी शुद्धतेवर सखोल मार्गदर्शन केले जया माने यांनी पाणी गुणवत्ता परीक्षण कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले माधवी देशपांडे यांनी पाणी काटकसर व पुनर्वापर पाणी अंदाजपत्रक या विषयावर मार्गदर्शन केले.
गावागावातुन
जल जीवन मिशन योजने अंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण पारगाव येथे संपन्न.

निरगुडसर :- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस 55 लिटर याप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मुख्य उद्दिष्ट असून योजना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत यशदाचे प्रशिक्षक कुंडलिक कोहीनकर यांनी व्यक्त केले.
पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव)या ठिकाणी जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती आंबेगाव,साईप्रेम ग्रामीण विकास संस्था यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण नुकतेच पार पडलेले यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रशिक्षक माधवी देशपांडे,कुंडलीक कोहीनकर पारगाव च्या सरपंच श्वेता ढोबळे,मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे,काठापुर चे सरपंचअशोक करंडे,वाळुंज नगरच्या सरपंच त्रुप्ती वाळुंज भागडीच्या उपसरपंच लता उंडे पारगावचे उपसरपंच नितीन ढोबळे,विरेंद्र ढोबळे विशाल करंडे उपस्थित होते माधवी देशपांडे व कुंडलिक कोहीनकर यांनी मार्गदर्शक व माहिती दिली.जल जिवन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण यावेळी पार पडले.या योजने अंतर्गत जल जीवन मिशन योजना अंतर्गत उभ्या राहिलेल्या योजनेचे हस्तांतरण,देखभाल, दुरुस्ती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
संपूर्ण भारतभर जल जिवन योजने अंतर्गत हर घर नल से जल ही योजना राबवली जात असून यावर मोठ प्रमाणावर खर्च केला जात आहे.ही योजना सुरू असताना स्थानिक ग्रामपंचायतीची महत्त्वाची भुमिका असली पाहिजे. या योजनेचे पाणी नियोजन कसे केले पाहिजे योजना चालवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात,पाणी पट्टी वसली कशी करावी,गावातील शाश्वत विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पारगाव परिसरातील 20 ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली