गावागावातुन
सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला ; श्रीराम प्रतिष्ठान व निरगुडसर गावाने काढली जंगी मिरवणूक
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/08/1000932565-1000x600.jpg&description=सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला ; श्रीराम प्रतिष्ठान व निरगुडसर गावाने काढली जंगी मिरवणूक', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/08/1000932565-1000x600.jpg&description=सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला ; श्रीराम प्रतिष्ठान व निरगुडसर गावाने काढली जंगी मिरवणूक', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
निरगुडसर ता. आंबेगाव येथील बबनराव नामदेव दांगट, संगीता/ अनुराधा बबन दांगट यांचा मुलगा प्रशांत बबन दांगट यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत राज्यात सहावा क्रमांक पटकावला. त्याने मिळवलेल्या यशाबाबत त्याचे गावात सर्वत्र कौतुक होत असून. दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्याचा मित्रपरिवार, श्रीराम प्रतिष्ठान निरगुडसर व गावकऱ्यांनी एकत्र येत त्याची गावातून जंगी मिरवणूक काढली.

प्रशांत दांगट हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आई वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करुण कुटुंब चालवतात तर प्रशांत हा पुणे येथे शिक्षण घेत असताना त्याला स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण झाली. कुटुंबाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याने पुण्यात मिळेल ते काम करत शिक्षणाचा खर्च भागवला व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तब्बल चार ते पाच वर्षे अभ्यास करून तो पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाला व राज्यात सहावा क्रमांक पटकावला. कुठलाही क्लास न लावता त्याने मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याने निरगुडसर ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती निरगुडसर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय, श्री गणेश देवस्थान मेंगडेवाडी, पारगाव पोलीस ठाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडसर यासह विविध ठिकाणी प्रशांत दांगट यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

त्यानंतर प्रशांत दांगट सदस्य असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान व गावकऱ्यांनी दिनांक १५ ऑगस्ट रोजी जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे नियोजन श्रीराम प्रतिष्ठान निरगुडसर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी गावातील एसटी स्टँड, विविध मुख्य चौकात जेसीपी द्वारे गुलाल भंडार याची उधळण करत प्रशांत दांगट याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निरगुडसर, मेंगडेवाडी गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक पार पडल्यानंतर श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रशांत दांगट याचा सत्कार व सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी गावातून जे युवक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना काही मार्गदर्शन लागल्यास ते मी नक्कीच देईल असे आश्वासन प्रशांत दांगट यांनी दिले.
गावागावातुन
खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात
मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.
आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )
पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे

आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
