गावागावातुन
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/04/1001879895-1000x600.jpg&description=वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/04/1001879895-1000x600.jpg&description=वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर-
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासुन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातही पाऊस हुलकावणी देत होता.परंतु आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

गावागावातुन
पारगाव,दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा
मंचर –
पारगाव ता.आंबेगाव तालुक्यातील पारगाव,दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या पूर्वेला राहणाऱ्या संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मुक्कामासाठी असलेल्या बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याच्या या हल्यात दीड वर्षीय घोडीचा मृत्यू झाला होता.
या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली होती.या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत घटनास्थळी पिंजरा लावला आहे.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, संतोष ढोबळे, वन विभाग कर्मचारी अशोक जाधव, रामदास वळसे उपस्थित होते.
मागणीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल वनविभागाच्या वन मंडळ अधिकारी नीलम चव्हाण यांचे ग्रामस्थानी आभार मानले आहेत.
गावागावातुन
घोडीवर बिबट्याचा हल्ला हल्यात घोडीचा मृत्यू .मेंढपाळ शिंदे त्यांचे आर्थिक नुकसान.
मंचर-
पारगाव (ता.आंबेगाव) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पुर्व बाजूलाच संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मेंढपाळ हे मुक्कामी साठी होते.रात्री ठीक २.३० च्या सुमारास बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या दीड वर्षाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात घोडीचा जागीच मृत झाला आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली आहे.
यावेळी शेतकरी संतोष ढोबळे,बापु शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.मोरगाव सुपा (बारामती) येथील बापू शिंदे आणि बबन शिंदे हे दोघे बंधू असून हे गेल्या अनेक वर्षांपासून पारगाव परिसरात मेंढ्या पालन कररत असुन येथे वास्तव्यास आहेत.सदर ठिकाणी वनरक्षक पुजा कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केला असुन मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.
गावागावातुन
भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
मंचर –
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, (दादा) यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर स्मारकस्थळी व भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका प्रिया बाणखेले, जनरल मॅनेजर शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, किशोर तिजारे, दिलीप कुरकुटे, प्रतापसिंह सावंत, सुरेश शिंदे, अमीर पठाण, ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले, कैलास गाढवे, बी.डी.चव्हाण, नाथा मोकाटे, वसंत जाधव, कामगार व शिक्षक वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्याबाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दादांनी आयुष्यभर जनसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. दुष्काळी परीस्थितीशी झुंजणा-या आंबेगाव तालुक्यात शिक्षण, सहकार, सिंचन आणि पायाभूत सुविधांची जी विकासदृष्टी त्यांनी रुजवली त्याच विचारामधून आजचा प्रगत तालुका घडताना दिसतो. दादांची कार्यपद्धती, लोकांशी जोडलेली नाळ आणि समाजकारणाकडे पाहण्याची सर्वसमावेशक भूमिका हे आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांनी जपलेली विकासाची आणि जनसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

स्मारकस्थळी अभिवादन करताना व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, मा. संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन8 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
