Connect with us

महाराष्ट्र

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग लवकरच रद्दची अधिसुचना निघेल.बाधित शेतकर्यांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.

Published

on

मंचर प्रतिनिधी

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा व रद्द झाल्याची अधिसुचना राज्य सरकारने काढावी.या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन पुकारले होते.बाधित शेतकर्यांचा विरोध लक्षात घेता.राज्य सरकारच्या वतीने हा महामार्ग रद्द करण्यात आला असुन या अधिसुचनेवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सही झाली असून,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहीसाठी ठेवण्यात आले आहे. अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली.

मंचर (ता.आंबेगाव) या ठिकाणी पुणे -नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने हा महामार्ग रद्द व्हावा याबाबत चर्चा केली.यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी,समन्वयक वल्लभ शेळके, जी.के.औटी,एम.डी घंगाळे,मोहन नायकोडी,प्रतिक जावळे,काठापूर चे सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, कान्हु करंडे,संपर्क प्रमुख दिलीप जाधव,सुरेश बोरचटे,निवृत्ती करंडे ,हेमंत करंडे,अविनाश हाडवळे,गोविंद हाडवळे उपस्थित होते.

पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाबाबद मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग नाराज होता. बागायती क्षेत्रातुन हा महामार्ग जात असल्याने, मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले होते.त्यामुळे राजुरी या ठिकाणी उपोषण करण्यात आले होते.या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित शेतकर्यांमध्ये नाराजी होती.

सध्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग असताना.व नवीन महामार्गाची काही आवश्यकता नसताना.हा महामार्ग आखण्यात आला होता.परंतु सध्याच्या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे व समांतर रस्ता करण्यात येऊ नये.त्याचप्रमाणे 2013 च्या केंद्र सरकारच्या भुसंपादण कायद्याची जशीच्या तशी अंमलबजावणी करावी. आधी मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने तोडगा न काढल्यास. बाधित शेतकऱ्यांच्या वतीने बाधित गावांमध्ये, तहसील कचेरी ,तालुक्याचे लोकप्रतिनिधी ,संबंधित मंत्री, यांच्या कार्यालय,व घरांपुढे सविनय पद्धतीने आंदोलन,उपोषण, मुंबई मंत्रालय येथे बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा. आधी उग्र आंदोलन करण्यात येईल.असा ईशारा देण्यात आला होता.

परंतु सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.पुढील आठ दिवसात राज्य सरकारची आधीसूचना निघाली नाही तर आंदोलन अधिक तीव्रतेने पुढे नेले जाईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी दिला.


प्रस्तावीत पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी याआधी राजुरी ता.जुन्नर या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांचे नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील नऊ गावांच्या वतीने राजुरी या ठिकाणी उपोषण करण्यात आले होते.यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी. सदर विषय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावला जाईल. असे आश्वासन दिले होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ, पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन.

Published

on

पारगाव:

नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला आज शनिवारी (दि. ३)भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.
पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले. तर काही भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.
थापलिंग गडावर जिलेबी भजी हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने , आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकांनी लावले आहेत.
रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

नागापूर (ता.आंबेगाव)येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

Continue Reading

गावागावातुन

थापलिंग खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर लोकवर्गणीतून तीन कोटी रुपये खर्चून होणार मंदिर.

Published

on

मंचर :

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव )येथील थापलिंग खंडोबा देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकवर्गणी, देणगीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून खंडोबा देवाचे मंदिर उभे राहणार आहे.अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टने दिली.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक भाविकभक्तांची मागणी होती. देवस्थान ट्रस्टने गतवर्षापासून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. मंदिरासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे देगलूर काळा पाषाण या दगडामध्ये होणार आहे. हा दगड नांदेड येथून उपलब्ध केला आहे. जमिनीपासून सुमारे ६५ फूट उंचीचे हे मंदिर होणार आहे. थापलिंग गड हा उंचीवर आहे. त्यामुळे हे मंदिर गडाच्या चोहोबाजूंनी सहज दिसणार आहे. मंदिरासाठी नागापूर ग्रामस्थांनी मानसी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिरासाठी मोठा निधी आवश्यक आहे यासाठी भाविक भक्तांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून विवाहांचे बुकिंग सुरू-: श्री. क्षेत्र. थापलिंग गडावर लग्न समारंभासाठी १५० बाय ८० फूट आकाराचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १२ हजार स्क्वेअर फुट आकाराच्या सभामंडपात गोरगरिबांची लग्न होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू होणार आहे. गोरगरिब कुटुंबांना चांगला फायदा होणार आहे.

 नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग गडावर सुरू असलेले खंडोबा देवाचे मंदिर.
Continue Reading

गावागावातुन

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.

Published

on

मंचर-

पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending