Connect with us

सामाजिक

डिंभे धरणातून घोड नदीपात्रात ३२००० क्युसेसने पाणी. मीना नदीच्या पात्रातही पाणी सोडल्याने पारगाव,देवगाव,लाखनगाव परिसरात नदीपात्र दुथडी भरून वाहत असून.काठापुर येथील स्मशानभूमी पाण्याखाली.तर शिव मंदिराला पाण्याचा वेढा.

Published

on

निरगुडसर-

हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातून घोड नदीपात्रात ३२००० क्युसेसने पाणी सोडले जात असल्याने घोडनदी दुथडी भरून वाहत आहे.त्याचप्रमाणे मीना नदीच्या पात्रातही पाणी सोडल्याने पारगाव शिंगवे ता.आंबेगाव या ठिकाणी होणाऱ्या संगमाच्या पुढे काठापुर,देवगाव,लाखनगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नदीपात्र दुथडी भरून वाहत असून.काठापुर येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.तर नदीतील शिव मंदिराला पाण्याने वेडले आहे.

आंबेगाव तालुक्यात असणारे हुतात्मा बाबू गेनु सागर डिंभे धरण शंभर टक्के भरले आहे. त्याचप्रमाणे या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत असल्याने धरणातून घोठनदीपात्रात पाण्याचा विसर्ग २५७०० क्युसेसने सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीवरून दुथडी भरून वाहत आहे.त्यातच मीना नदीलाही वडज ता.जुन्नर धरणातून पाणी सोडल्याने मीना नदीची दुथडी भरून वाहत आहे.

पारगाव ता. आंबेगाव या ठिकाणी घोड व मीना या दोन नद्यांचा संगम होऊन त्या पुढील गावांमध्ये या दोन्ही नद्यांचे पाणी एकत्र येते.पारगाव या ठिकाणी संगम झाल्याच्या नंतर काठापुर,देवगाव, लाखनगाव या आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये पाण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.नदीपात्रातील पाणी वाढल्याने काठापुर बुद्रुक येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. नदीतील शिवमंदिरालाही या पाण्याने वेडा घातला आहे.त्याचप्रमाणे लाखनगाव या ठिकाणचा जुनापुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.एकंदरीतच घोड आणि मीना नद्यांचे पाणी एकत्र झाल्यानंतर तेथून पुढील गावांमध्ये मात्र या पाण्याचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात सध्या जलसंकट आले असून याचा फटका संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीला बसला आहे.एकंदरीत आंबेगाव तालुक्यातही या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतातील पिके खराब झाली आहेत.त्यामुळे शासनाने या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

Published

on

  मंचर-
     राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. 

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी बसवले गतिरोधक

Published

on

मंचर


अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवला आहे.

पोंदेवाडी ग्रामस्थांनी रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवणे बाबत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, माऊली रोडे, राजु रोडे, अक्षय रोडे, सुनिल रोडे यांनी सांगितले. रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक नसल्याने काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अष्टविनायक महामार्ग आंबेगाव तालुक्यातुन कारफाटा, नागापूर, पारगाव काठापूर, पोंदेवाडी इत्यादी गावातून जातो हा महामार्ग पुढे रांजणगाव गणपती रांजणगाव औद्योगिक वसाहतीला मिळत असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे सदर रस्त्यावर चारचाकी वहाने भरधाव वेगाने जातात.अशा वेळी सदरील रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या गावातील नागरीकांना या रस्त्यावरुन ये-जा करत असताना वाहनांच्या वेगाचा सामना करावा लागतो.

अवजड वाहनांच्या वेगामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली जावून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्याच प्रमाणे अनेक अपघात झालेअसून अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. सातत्याने अपघाताची मालिका सुरु होती सदर रस्त्यावर गतिरोधक बसल्याने पोंदेवाडी रोडेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending