गावागावातुन
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/07/1000737569-1000x600.jpg&description=जारकरवाडी येथे कांद्याची चोरी', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/07/1000737569-1000x600.jpg&description=जारकरवाडी येथे कांद्याची चोरी', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
सध्या कांद्याच्या बाजारभावाने चांगलीच उसळी घेतली आहे. याच कारणातून बराकीत साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथे झाली.
धामणी येथील शेतकरी बाळासाहेब बढेकर यांची कांद्याची वखार जारकरवाडी हद्दीत बढेकरवस्ती नजीक कॅनोल जवळ आहे. ( दि. १४ ) रोजी रात्रीच्या सुमारास कांद्याच्या साधारण ४० ते ५० पिशव्या चोरीला गेल्या असून चालु बाजार प्रमाणे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बढेकर यांनी सांगितले. मागील काळात कांद्याला बाजारभाव नव्हता त्यावेळी शेतकरी उत्पादकांना बाजारात आपला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत होता. त्यावेळी उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. आता कांद्याला चांगला बाजारभाव आहे. मात्र, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
पूर्व आंबेगावात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उद्योजक संजय बढेकर, ग्रा. पं. सदस्य शामराव बढेकर, सुरेश बढेकर, दिपक विधाटे यांनी केली आहे.
गावागावातुन
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू होणार.माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.
मंचर-
- आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार आहे. या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, याबाबतचे पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे. अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बाजार समितीमध्ये नियमित शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या तरतुदीनुसार पूर्वमान्यता देण्यात आली आहे.
सर्व अटी व शर्तींची पूर्तता झाल्यानंतर योजनेला अंतिम मान्यता देण्याबाबतचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 135 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप.
मंचर-
पोंदेवाडी ता आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात व पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले, यावेळी दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,आनंदा पोंदे,निलेश मांजरे,अशोक दुगड,शिवराम पोखरकर,शिक्षक अनिल गावडे,आप्पासाहेब इखे,अर्जुन महाराज वाळुंज यांसह ग्रामस्थ तसेच दोन्हीही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन3 years agoविठू माऊली
