सामाजिक
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील अष्टविनायक महामार्गावर पोंदेवाडी फाटा चौकात अपघाताचे प्रमाण वाढले.चौक विस्तारीकरणाची होतेय माघणी.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/09/IMG_20250927_100447814_HDR-1000x600.jpg&description=काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील अष्टविनायक महामार्गावर पोंदेवाडी फाटा चौकात अपघाताचे प्रमाण वाढले.चौक विस्तारीकरणाची होतेय माघणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/09/IMG_20250927_100447814_HDR-1000x600.jpg&description=काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील अष्टविनायक महामार्गावर पोंदेवाडी फाटा चौकात अपघाताचे प्रमाण वाढले.चौक विस्तारीकरणाची होतेय माघणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">

निरगुडसर-
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील अष्टविनायक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असून.या महामार्गाला काठापुर पोंदेवाडी रस्ता छेदुन जातो त्या पोंदेवाडी फाटा चौकामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असुन.आजपर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे.त्यामुळे या चौकातील रस्ता रुंदीकरण करून चौकात विस्तारीकरण करावे अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व काठापूर चे सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.

काठापूर बुद्रुक गावातुन अष्टविनायक महामार्ग गैला आहे.हा महामार्ग गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाढली आहे. काल या ठिकाणी या चौकात अपघात होऊन एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. या आधीही या ठिकाणी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अष्टविनायक महामार्गाला काठापूर बुद्रुक गावचे हद्दीत.काठापुर पोंदेवाडी रस्त्या छेदुन जातो त्या पोंदेवाडी फाटा हनुमान चौकाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे.शिरुर बाजू कडून येणाऱ्या गाड्या पोंदेवाडी मंचर च्या बाजूला वळत असताना अतिशय कमी जागा या ठिकाणी आहे.त्यामुळे अनेक वेळा वाहन चालकांना गाडी पाठीमागे घेऊन हे वळण घ्यावी लागते. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.आत्तापर्यंत तीन लोकांचे मृत्यू या चौकात झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे या महामार्गावर असणाऱ्या चौकाचे विस्तारीकरण करून येथील 100 मीटर अंतराचे रस्त्याचे रुंदीकरण करून या ठिकाणी अपघात कमी होतील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी काठापुरचे माजी उपसरपंच विशाल करंडे व पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सामाजिक
अजामेळा दिंडीचे गावडेवाडी येथून प्रस्थान
मंचर-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी कृ २६ चे .आदर्श गाव गावडेवाडी (ता आंबेगाव ) येथून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यात आले अशी माहीही दिंडी क २६ चे प्रमुख ह .भ .प. मधुकर महाराज गायकवाड व दिंडीचे चोपदार मधुकर महाराज साळवे यांनी दिली.
आळंदी प्रशासनाने दिंड्यांनी आळंदीत येऊ नये अशी आवाहन केल्याने अजामेळा दिंडीने या सूचनेला प्रतिसाद देऊन गावडेवाडी येथून गुरुवारी (ता .९ ) वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले .यावेळी दिंडीचे संस्थापक वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड व सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ . पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र रामदास गावडे,कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी गावडेवाडीचे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते पुंडलिक वर देव हरी विठ्ठल च्या गजरात दिंडीने प्रस्थान ठेवले यावेळी मच्छिंद्र शेठ गावडे, ऋषिकेश गावडे, संतोष गावडे, ह भ प सुरेश महाराज गावडे, ह भ प बाळू बुवा शेळके ,ह भ प ज्ञानेश्वर गावडे, ह भ प लहू महाराज गावडे ,मंदाताई गावडे ,सविता मधुकर गायकवाड ,त्याचप्रमाणे कमलादेवी मळ्यातील बहुसंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ प्रतिक गायकवाड प्रा.शीलाताई पांडुरंग गायकवाड तसेच महिला चांगुणाबाई शेळके, कौसाबाई टाव्हरे, हरणाबाई टाव्हरे, सुनील महाराज राजगुरू, बाळू महादू राजगुरू ,वाहन चालक कैलास पडवळ,चालक बाबाजी गव्हाणे आदींनी दिंडीला सहाय्य केले.
यावेळी गावडेवाडी ग्रामस्थांनी सर्वांना दिंडी ला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये भिवाजी उमाजी गावडे ,अनाजी मारुती गावडे ,नरेंद्र गावडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गावडे ,माजी सरपंच देवराम गावडे, संतोष गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या वतीने दिंडीला शुभेच्छा दिल्या
आदर्श गाव गावडेवाडी (ता . आंबेगाव ) येथून माऊलींच्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजमेळा दिंडी क्रमांक २६ ने प्रस्थान ठेवले
सामाजिक
काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठे नुकस घरे,गोठे,यांचे पत्रे उडाले.नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.

मंचर –
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव या ठिकाणी साडे चार ते पाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरे,गोठे, यांचे पत्रे उडाले आहेत.अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने नुकसान झाले आहे. अनेक झाडेझुडपे ही रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आलेल्या वादळाने काठापुर बुद्रुक मधे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे शासनाने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वादळ आल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांची कौले पत्रे उडून गेली आहेत कांदा चाळीचे ही पत्रे कवले उडून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने घरे व गोठे यांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळींवर विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर पडली असून त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काठापुर बुद्रुक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आलेल्या वादळाने झालेल्या नुकसानीची शासनाने या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.

ओढ्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. एकंदरीतच परिस्थिती पाहता काठापुर बुद्रुक या ठिकाणी झालेला पाऊस व वादळ याचा मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
