Connect with us

सामाजिक

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर संपन्न

Published

on

मंचर -दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव व शिरूर तालुक्यात जनविश्वास सप्ताह (दि. २२ जुलै ते ३१ जुलै) असा साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाअंतर्गत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार (दि. २५) रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, पोपटराव थिटे, नितीन वाव्हळ, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, चीफ अकौटट राजेश वाकचौरे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे, शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. बी.डी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक वसंत जाधव, आंबेगाव तालुक्याचे युवक अध्यक्ष वैभव उंडे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले, शरद बँक संचालक दौलतभाई लोखंडे, अशोक आदक, निलेश पडवळ, पिंटू पडवळ, दिलीप लोखंडे, कारखान्याचे कर्मचारी, महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.

Published

on

मंचर-

लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते

Continue Reading

सामाजिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

Published

on

  मंचर-
     राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. 

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending