महाराष्ट्र
पंढरपुर येथे आषाढी वारीत वाट चुकलेल्या ज्येष्ठ वारकऱ्याला मुस्लिम तरुणाने घरी नेऊन दिला आश्रय.केले कुटुंबाच्या स्वाधीन.
पंढरपुर येथे आषाढी वारीत वाट चुकलेल्या बाळू बाळा शेटे (रा. काठापूर बुद्रुक, ता. आंबेगाव) या ज्येष्ठ वारकऱ्याला अकलूज (जि. सोलापूर) येथील जाकीर हबीब शेख या मुस्लिम तरुणाने घरी नेऊन आश्रय दिला. तसेच, नातेवाइकांचा शोध घेऊन सुरक्षितरित्या कुटुंबाच्या स्वाधीन करून हिंदू-मुस्लिम जातीय सलोख्याचा आदर्श उभा केला.
बाळू बाळा शेटे (वय ६२) हे आषाढी वारीसाठी शनिवारी (ता. ५) गावातील ग्रामस्थांसोबत पंढरपूर येथे गेले होते. रविवारी (ता. ६) ते महाद्वार घाट पंढरपूर येथे असलेल्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीत बेपत्ता झाले. त्यांचा दोन दिवस शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. अखेर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार देण्यात आली. त्यांचे छायाचित्र, तसेच वर्णन समाज माध्यमांवर पसरले होते.
दरम्यान, पंढरपूर येथे बरोबर आलेल्या सहकाऱ्यांची चुकामुक झाल्याने बाळू शेटे काहीसे गांगरून गेले.साधा स्वभाव असल्याने त्यांना कुणाला आपण चुकलो आहोत हे ही सांगता आले नाही.ते रस्त्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सोबत चालत चालत पुण्याच्या दिशेने निघाले. दोन दिवसांत सुमारे ४५ किलोमीटर अंतर पार करत ते मंगळवारी (ता. ८) सकाळी अकलूजपर्यंत आले. सोबत पायी चालणारे वारकरी कमी झाल्याने त्यांना काही सुचेनासे झाले. त्यामुळे ते बसस्थानक परिसरात चिंताग्रस्त अवस्थेत बसून राहिले. आजूबाजूची लहान मुले त्यांच्या भोवती जमा झाली होती. जवळूनच जाणारे जाकीर हबीब शेख या तरुणाची नजर त्यांच्याकडे गेली. त्यांनी मुलांना बाजूला करून त्यांची विचारपूस केली. मात्र त्यांना जास्त काही सांगता येत नवते ते फक्त काठापूर,घोडनदी, पुणे एवढेच सांगत होते. बाकी त्यांना काही सुचत नव्हते. त्या तरुणाने त्यांना घरी नेले. जेऊ घातले व धीर दिला. तसेच, मोबाईलवर काठापूर,घोडनदी, पुणे या परिसरातील कोणाचा नंबर मिळतो का, याचा शोध घेऊ लागले.दरम्यान, दोन तासानंतर काठापूर परिसरात राहणाऱ्या गणेश काकडे यांचा नंबर जाकीर शेख यांना मिळाला. त्यांनी सापडलेल्या बाबांचे वर्णन त्यांना सांगितले. ‘ते आमच्याच गावातील हरवलेले बाळू शेटे आहेत.’ तसेच, गणेश काकडे यांनी बाळू शेटे यांचा मुलगा प्रवीण शेटे यांना फोन करून सांगितले, ‘तुमचे वडील अकलूज येथे सापडले आहेत.’ त्यांना, त्यांना जाकीर शेख यांचा नंबर
दिला. प्रवीण शेटे रात्रीच ११ वाजता अकलूजला वडिलांना आणण्यासाठी निघाले होते, परंतु जाकीर शेख यांनी सांगितले, ‘रात्र आहे अन् पाऊसही सुरु आहे. तुमचे वडील माझ्या घरात सुरक्षित आहेत. काही काळजी करू नका. आता येऊ नका उद्या सकाळी या.’
दरम्यान, बुधवारी सकाळी प्रवीण शेटे, यशवंत शेटे, नारायण जाधव हे अकलूज येथे जाऊन बाळू शेटे यांना घरी घेऊन आले.
पंढरपूर येथे तातडीने पोलिस तक्रार नोंदवण्यासाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील, पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांचे सहकार्य लाभले.
गावागावातुन
थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ, पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन.
पारगाव:
नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला आज शनिवारी (दि. ३)भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.
पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले. तर काही भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.
थापलिंग गडावर जिलेबी भजी हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने , आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकांनी लावले आहेत.
रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

नागापूर (ता.आंबेगाव)येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.
गावागावातुन
थापलिंग खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर लोकवर्गणीतून तीन कोटी रुपये खर्चून होणार मंदिर.
मंचर :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव )येथील थापलिंग खंडोबा देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकवर्गणी, देणगीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून खंडोबा देवाचे मंदिर उभे राहणार आहे.अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टने दिली.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक भाविकभक्तांची मागणी होती. देवस्थान ट्रस्टने गतवर्षापासून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. मंदिरासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे देगलूर काळा पाषाण या दगडामध्ये होणार आहे. हा दगड नांदेड येथून उपलब्ध केला आहे. जमिनीपासून सुमारे ६५ फूट उंचीचे हे मंदिर होणार आहे. थापलिंग गड हा उंचीवर आहे. त्यामुळे हे मंदिर गडाच्या चोहोबाजूंनी सहज दिसणार आहे. मंदिरासाठी नागापूर ग्रामस्थांनी मानसी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिरासाठी मोठा निधी आवश्यक आहे यासाठी भाविक भक्तांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.


फेब्रुवारी महिन्यापासून विवाहांचे बुकिंग सुरू-: श्री. क्षेत्र. थापलिंग गडावर लग्न समारंभासाठी १५० बाय ८० फूट आकाराचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १२ हजार स्क्वेअर फुट आकाराच्या सभामंडपात गोरगरिबांची लग्न होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू होणार आहे. गोरगरिब कुटुंबांना चांगला फायदा होणार आहे.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग गडावर सुरू असलेले खंडोबा देवाचे मंदिर.
गावागावातुन
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.
मंचर-
पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन4 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
