राजकीय
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मयूर सरडे
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/07/1000738042-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मयूर सरडे', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/07/1000738042-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मयूर सरडे', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) तालुका उपाध्यक्षपदी शिरदाळे येथील मा.उपसरपंच मयूर संभाजी सरडे यांची नुकतीच निवड झाली आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आल्याचे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित जाधव यांनी सांगितले यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला बळ देण्याचे काम युवकांच्या मार्फत करणार असल्याचे मयूर सरडे यांनी सांगितले.मयूर सरडे यांनी शिरदाळे ग्रामपंचायत मधे उपसरपंच म्हणून काम केले असुन सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते काम करत आहेत. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे चांगले काम असुन तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
राजकीय
डिंभे-माणिकडोह बोगद्यास विरोध कायम; आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही! माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्ट मत; मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडली भूमिका
मंचर –
मुंबई येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या रु. ५७०४.५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) देण्यात आल्याचे समजते. या सुधारित मान्यतेमध्ये मूळ कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेल्या डिंभे-माणिकडोह या बोगद्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाची तातडीने दखल घेत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी लागलीच मुख्यमंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बोगद्याबाबत आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील जनतेचा व शेतकऱ्यांचा असणारा तीव्र विरोध मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
या भेटीदरम्यान मा. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, सदर बोगद्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच दिनांक १८ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै. अजितदादा पवार) यांच्या समवेत व मा. वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगदा न करण्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन या प्रसंगी निर्दर्शनास आणुन दिले. या सर्व बाबी लक्षात आणून देत मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन/पत्र मा. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले.
वळसे पाटील यांच्या भूमिकेची दखल घेत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये बदल करण्याचे आणि आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन दिले आहे.
राजकीय
भेसळप्रकरणात संबंध आढळल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन’ – दिलीप वळसे पाटील यांचा विरोधकांना थेट इशारा.
मंचर:
अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असे खुले आव्हान त्यांनी राजकीय विरोधकांना दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे विरोधकांच्या खोट्या आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या माध्यमातून राज्यात आणि अंबेगाव तालुक्यात दूध व्यावसायिकांवर तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई अजूनही सुरूच आहे. मात्र, ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही, त्या गोष्टींशी आपले नाव जोडून आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ करणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कधीही कोणाच्याही पाठीशी उभा राहणार नाही, असे सांगत एफडीए आणि पोलीस प्रशासन अशा लोकांवर कडक कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्यावर खोटे-नाटे आरोप करून राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. विरोधकांनी ही खोडसाळ बदनामी त्वरित थांबवली नाही, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) फौजदारी (Criminal) आणि मोठ्या आर्थिक अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला. आपण नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण केले असून जनता, समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी या राजकीय षड्यंत्राची नोंद घ्यावी, असे आवाहन करत शेवटी सत्याचाच विजय होईल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
