शैक्षणिक
लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/07/IMG-20260713-WA0019-1000x600.jpg&description=लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/07/IMG-20260713-WA0019-1000x600.jpg&description=लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर-
लाखनगाव ता.आंबेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे चार्जेबल साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले

यावेळी मुख्याध्यापक अनिल देसले, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, उपाध्यक्ष प्रदीप रोडे, विजय कानसकर उपस्थित होते.
यावेळी लाखनगाव येथील माध्यमिक विद्यालयास भविष्यकाळातही भरीव मदत करणार असल्याचे उद्योजक सागर दांगट यांनी सांगितले.

उद्योजक सागर दांगट यांजकडून साउंड सिस्टीम भेट.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शैक्षणिक
पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील विद्यार्थी देवांश गणेश कापडी याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे निवड.
मंचर-
पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील डि.जी.वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी देवांश गणेश कापडी याने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन केले असुन त्याची निवड राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे झाली आहे.देशभरातुन एकुण ३६५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात देवांश याने यश मिळवले आहे
मिलिट्री स्कूल (RMS) या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणार्या निवासी शाळा असुन या शाळा इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार शिक्षण देतात आणि लष्करी नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. सध्या भारतात हिमाचल प्रदेशातील चैल, राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर, तसेच कर्नाटकातील बंगळुरू आणि बेळगाव येथे या ५ आरएमएस शाळा आहेत.या शाळांची स्थापना १९२५ मध्ये झाली असुन.या शाळेत इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी प्रवेश दिला जातो. CET सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असुन.NCC प्रशिक्षण, क्रीडा आणि शैक्षणिक दिले जाते. १० ते १२ वर्षे (६ वी साठी) आणि १३ ते १५ वर्षे (९ वी साठी) वयोगटातील मुले/मुली यांची निवड केली जाते.भारतातील ५ राष्ट्रीय मिलिट्री स्कूल RMS चैल (हिमाचल प्रदेश) अजमेर (राजस्थान),RMS ढोलपूर (राजस्थान),RMS बेळगाव (कर्नाटक)RMS बंगळुरू (कर्नाटक)येथे असुन दर वर्षी देशभरातुन ३६५ विद्यार्थ्यी येथे निवडले जातात. त्यातून 36 सिविलियन विद्यार्थ्यांची निवड होते
आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील देवांश अश्विनी गणेश कापडी याची निवड झाली असून राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेत 150पैकी 138 गुण मिळाले आहे तसेच ऑल इंडियन सैनिक स्कूल परीक्षेत 300पैकी 270 गुण मिळाले आहेआपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन मोठ्या परीक्षा ती यश मिळाले आहे.परीसरातुन त्याचे कौतुक होत आहे.देवांश याची आई अश्विनी कापडी/ लबडे भारतीय सैन्य दलात सीमा सुरक्षा दलात काम करते. तर वडील गणेश कापडी पुणे येथे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत. घरातूनच सैनिकी वारसा लाभलेल्या देवांश याला भविष्यात देश सेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने व काम करण्याची इच्छा आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
