देशविदेश
सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुडले.उपोषण सोडण्यात केंद्र सरकार यशस्वी.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/07/FB_IMG_17848439335252.jpg&description=सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुडले.उपोषण सोडण्यात केंद्र सरकार यशस्वी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/07/FB_IMG_17848439335252.jpg&description=सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुडले.उपोषण सोडण्यात केंद्र सरकार यशस्वी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
नवी दिल्लीः
मागील काही दिवसांपासून देशभरात NEET पेपर लीक आंदोलन सुरू झाले आहे .या आंदोलनादरम्यान माघील 26 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण अखेर सुटले असुन. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर कायद्याची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवत असल्याची घोषणा केली. या घटनेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
वांगचूक यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मोठा पाठिंबा दिला होता.
उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले कि आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह, तसेच लेह-लडाखच्या एपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी अखेर 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडत आहे.
देशभरातील अनेक खासदारांनी मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.विविध अटींवर चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन. हा निर्णय घेण्यात आला आहे.माझी नम्र विनंती आहे की, देशात कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ देऊ नका. सर्वांनी सतर्क राहा आणि शांतता कायम राखा.
वांगचूक यांचे उपोषणान सुटल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.
निरगुडसर-
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर,लाखनगाव, पोंदेवाडी,देवगाव, जारकरवाडी आदी गावांमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय,दुध संस्था कार्यालय, सरकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. अनेक जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये विविध संस्कृती कार्यक्रम पार पडले. देशभक्तीपर गीते,भाषणे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक विद्यार्थी व ग्रामस्थांची भाषणे ही झाली. अनेक ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आले होती. अशा विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला.यावेळी काठापुर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर या ठिकाणी महिलांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर असून या महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हौसाबाई जाधव, प्रियांका जाधव, अरुणा करंडे, वर्षा जाधव,सारीका करंडे,रुपाली नर्हे,मा.उपसरपंच विशाल करंडे,अनिल जाधव, विलास जाधव,सागर जाधव,तानाजी जाधव,सचिन नर्हे,बबन जाधव,सोमनाथ जाधव,हौशीराम जाधव, विनायक जाधव मुख्याध्यापक राजु जाधव, शिक्षण ग्रामस्थ उपस्थित होते.
देशविदेश
भीमाशंकर कारखान्यास देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर.

मंचर- दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

“देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार” जाहीर झाल्याबाबत माहिती देताना बेंडे म्हणाले की, मूल्यमापनाच्या आधारे पुरस्कार निवड समितीने श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १५ असे एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
देशविदेश
सातासमुद्रापार बाप्पाची आराधना महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे. यावर्षी हा उत्सव 9 दिवस चालला असुण यामध्ये दररोज हरिपाठ,आरती, लकी ड्रॉ, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव याहीवर्षी मागील वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्व तरुण मंडळी
महाराष्ट्रमधून असून यामध्ये
गौरव पुरुषोत्तम कापसे(बुलढाणा), निखिल बोऱ्हाडे(पुणे), योगेश जाधव(पुणे),अभिजित भड (पुणे), गजानन रिठे (बीड), प्रथमेश हिंगे (पुणे) केतन सोनार(जळगाव), प्रशांत भाटे, प्रशांत कोरडे, प्रद्युम्न देशमुख, जयेश शेलार(चाकण), ऋषिकेश चव्हाण(सातारा), तन्मयी सुतार (पुणे), आदी उपस्थित व यांच्या पुढाकाराने उत्सव पार पडला.
गणेश मूर्तीचे सौजन्य पुणे (खेड)येथील प्रशांत कोरडे या युवकाने भारता मधून येतानाच श्रींची मूर्ती सोबत आणली होती.
हीच गणरायाची मूर्ती श्री गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात स्थानापन्न करण्यात आली. या वर्षी हा गणेशोत्सव 9 दिवस सुरु होता. दररोज सकाळ संध्याकाळ आरती तसेच बाप्पासाठी नैवेद्य तसेच वेगवेगळे प्रसाद बनवून नैव्यद्य दाखविला गेला. तर या कार्यक्रमाची सांगता रविवार दिनांक 15सप्टेंबर2024 रोजी झाली….
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
