Connect with us

सामाजिक

क्रांतिवीर मंडळाचे समाजोपयोगी कार्य आदर्शवत- एपीआय महादेव शेलार

Published

on

नारायणगाव-संकेत गांजवे

भोरवाडी तालुका जुन्नर येथील समाजोपयोगी उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित मातोश्री स्व.श्रीमती शैला शामशेठ दहितुले यांच्या स्मरणार्थ “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व गावातील महिलांना फळझाडे रोपे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गणपतीची महाआरती संतोष भालेराव व निलेश शिंदे यांच्या हनुमान सेवा मंडळ, बोरी खुर्द साळवाडी च्या ढोल पथकाच्या वादनात एपीआय महादेव शेलार, जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे, वनविभागाचे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे, बाजार समिती संचालक माऊली खंडागळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका महिला अध्यक्षा शोभा पाचपुते यांच्या शुभ हस्ते पार पडली.

तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले; मंडळाचे अध्यक्ष महेश भोर, उपाध्यक्ष कृष्णा भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला; मंडळाच्या कार्याचा आणि गणेशोत्सव काळात राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करून एपीआय महादेव शेलार यांनी डॉल्बी व गुलाल मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचे आव्हान करताच सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्याचे जाहीर केले; जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे यांनी भोरवाडीमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मंडळाच्या स्थापना काळापासूनच्या राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे यांनी एक पेड माँ के नाम संकल्पनेची प्रशंसा करून सामाजिक कार्यकर्ते सागर दहितुले यांनी मंडळामार्फत राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेवून झाडे लावण्याचे आव्हान करून त्याचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा आणि निरोगी आयुष्य जगा असे आव्हान उपस्थितांना केले,


शिवसेना (उबाठागट) तालुकाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक माऊली खंडागळे यांनीही मातोश्री स्व. शैला दहितुले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून, महिलांना दिलेल्या रोपांचे जतन करावे व प्रत्येकाने किमान एक तरी झाड आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ लावावे जेणेकरून ते त्या रूपाने त्यांच्या आठवणी आपल्याजवळ राहतील असे भावनिक आव्हान केले, बिरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या कार्याची माहिती विशद करून मंडळाच्या कार्याच्या जोरावर यावर्षी देण्यात येणारा आदर्श गणपती मंडळ पुरस्कार क्रांतिवीर मंडळाला देण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाला केले, याप्रसंगी नारायणगाव आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी, उद्योजक वैभव काळे, सचिन निलख, सुनील पवार, दत्तात्रय भोर, माऊली निलख, सुनीता भोर, खंडू भोर, रोहिदास भोर, मामावडे भोर, क्रांतिवीर महिला ग्रुपच्या अपर्णा दहितुले, वैशाली शिंदे, पुनम पाचपुते, छाया पाचपुते, अंकिता भोर, अनिता भोर, पल्लवी भोर, रुपाली पाचपुते, रेश्मा भोर, उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पटाडे सर आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरोबा महाराज पतसंस्था उपाध्यक्ष देविदास भोर तर आभार मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Published

on

‌‌मंचर-

      देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
    गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Continue Reading

सामाजिक

अजामेळा दिंडीचे गावडेवाडी येथून प्रस्थान

Published

on


मंचर-
‌‌संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी कृ २६ चे .आदर्श गाव गावडेवाडी (ता आंबेगाव ) येथून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यात आले अशी माहीही दिंडी क २६ चे प्रमुख ह .भ .प. मधुकर महाराज गायकवाड व दिंडीचे चोपदार मधुकर महाराज साळवे यांनी दिली.


आळंदी प्रशासनाने दिंड्यांनी आळंदीत येऊ नये अशी आवाहन केल्याने अजामेळा दिंडीने या सूचनेला प्रतिसाद देऊन गावडेवाडी येथून गुरुवारी (ता .९ ) वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले .यावेळी दिंडीचे संस्थापक वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड व सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ . पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र रामदास गावडे,कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी गावडेवाडीचे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते पुंडलिक वर देव हरी विठ्ठल च्या गजरात दिंडीने प्रस्थान ठेवले यावेळी मच्छिंद्र शेठ गावडे, ऋषिकेश गावडे, संतोष गावडे, ह भ प सुरेश महाराज गावडे, ह भ प बाळू बुवा शेळके ,ह भ प ज्ञानेश्वर गावडे, ह भ प लहू महाराज गावडे ,मंदाताई गावडे ,सविता मधुकर गायकवाड ,त्याचप्रमाणे कमलादेवी मळ्यातील बहुसंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ प्रतिक गायकवाड प्रा.शीलाताई पांडुरंग गायकवाड तसेच महिला चांगुणाबाई शेळके, कौसाबाई टाव्हरे, हरणाबाई टाव्हरे, सुनील महाराज राजगुरू, बाळू महादू राजगुरू ,वाहन चालक कैलास पडवळ,चालक बाबाजी गव्हाणे आदींनी दिंडीला सहाय्य केले.

यावेळी गावडेवाडी ग्रामस्थांनी सर्वांना दिंडी ला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये भिवाजी उमाजी गावडे ,अनाजी मारुती गावडे ,नरेंद्र गावडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गावडे ,माजी सरपंच देवराम गावडे, संतोष गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या वतीने दिंडीला शुभेच्छा दिल्या

आदर्श गाव गावडेवाडी (ता . आंबेगाव ) येथून माऊलींच्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजमेळा दिंडी क्रमांक २६ ने प्रस्थान ठेवले

Continue Reading

सामाजिक

काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठे नुकस घरे,गोठे,यांचे पत्रे उडाले.नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.

Published

on

मंचर –

काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव या ठिकाणी साडे चार ते पाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरे,गोठे, यांचे पत्रे उडाले आहेत.अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने नुकसान झाले आहे. अनेक झाडेझुडपे ही रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आलेल्या वादळाने काठापुर बुद्रुक मधे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे शासनाने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वादळ आल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांची कौले पत्रे उडून गेली आहेत कांदा चाळीचे ही पत्रे कवले उडून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने घरे व गोठे यांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळींवर विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर पडली असून त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काठापुर बुद्रुक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आलेल्या वादळाने झालेल्या नुकसानीची शासनाने या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.


ओढ्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. एकंदरीतच परिस्थिती पाहता काठापुर बुद्रुक या ठिकाणी झालेला पाऊस व वादळ याचा मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62