Connect with us

सामाजिक

क्रांतिवीर मंडळाचे समाजोपयोगी कार्य आदर्शवत- एपीआय महादेव शेलार

Published

on

नारायणगाव-संकेत गांजवे

भोरवाडी तालुका जुन्नर येथील समाजोपयोगी उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या क्रांतिवीर मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित मातोश्री स्व.श्रीमती शैला शामशेठ दहितुले यांच्या स्मरणार्थ “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व गावातील महिलांना फळझाडे रोपे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गणपतीची महाआरती संतोष भालेराव व निलेश शिंदे यांच्या हनुमान सेवा मंडळ, बोरी खुर्द साळवाडी च्या ढोल पथकाच्या वादनात एपीआय महादेव शेलार, जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे, वनविभागाचे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे, बाजार समिती संचालक माऊली खंडागळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका महिला अध्यक्षा शोभा पाचपुते यांच्या शुभ हस्ते पार पडली.

तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले; मंडळाचे अध्यक्ष महेश भोर, उपाध्यक्ष कृष्णा भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला; मंडळाच्या कार्याचा आणि गणेशोत्सव काळात राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करून एपीआय महादेव शेलार यांनी डॉल्बी व गुलाल मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचे आव्हान करताच सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्याचे जाहीर केले; जुन्नर पोलीस स्टेशनचे पीएसआय रघुनाथ शिंदे यांनी भोरवाडीमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मंडळाच्या स्थापना काळापासूनच्या राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे यांनी एक पेड माँ के नाम संकल्पनेची प्रशंसा करून सामाजिक कार्यकर्ते सागर दहितुले यांनी मंडळामार्फत राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेवून झाडे लावण्याचे आव्हान करून त्याचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा आणि निरोगी आयुष्य जगा असे आव्हान उपस्थितांना केले,


शिवसेना (उबाठागट) तालुकाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक माऊली खंडागळे यांनीही मातोश्री स्व. शैला दहितुले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून, महिलांना दिलेल्या रोपांचे जतन करावे व प्रत्येकाने किमान एक तरी झाड आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ लावावे जेणेकरून ते त्या रूपाने त्यांच्या आठवणी आपल्याजवळ राहतील असे भावनिक आव्हान केले, बिरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या कार्याची माहिती विशद करून मंडळाच्या कार्याच्या जोरावर यावर्षी देण्यात येणारा आदर्श गणपती मंडळ पुरस्कार क्रांतिवीर मंडळाला देण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाला केले, याप्रसंगी नारायणगाव आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी, उद्योजक वैभव काळे, सचिन निलख, सुनील पवार, दत्तात्रय भोर, माऊली निलख, सुनीता भोर, खंडू भोर, रोहिदास भोर, मामावडे भोर, क्रांतिवीर महिला ग्रुपच्या अपर्णा दहितुले, वैशाली शिंदे, पुनम पाचपुते, छाया पाचपुते, अंकिता भोर, अनिता भोर, पल्लवी भोर, रुपाली पाचपुते, रेश्मा भोर, उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पटाडे सर आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरोबा महाराज पतसंस्था उपाध्यक्ष देविदास भोर तर आभार मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

Published

on

  मंचर-
     राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. 

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी बसवले गतिरोधक

Published

on

मंचर


अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवला आहे.

पोंदेवाडी ग्रामस्थांनी रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवणे बाबत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, माऊली रोडे, राजु रोडे, अक्षय रोडे, सुनिल रोडे यांनी सांगितले. रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक नसल्याने काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अष्टविनायक महामार्ग आंबेगाव तालुक्यातुन कारफाटा, नागापूर, पारगाव काठापूर, पोंदेवाडी इत्यादी गावातून जातो हा महामार्ग पुढे रांजणगाव गणपती रांजणगाव औद्योगिक वसाहतीला मिळत असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे सदर रस्त्यावर चारचाकी वहाने भरधाव वेगाने जातात.अशा वेळी सदरील रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या गावातील नागरीकांना या रस्त्यावरुन ये-जा करत असताना वाहनांच्या वेगाचा सामना करावा लागतो.

अवजड वाहनांच्या वेगामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली जावून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्याच प्रमाणे अनेक अपघात झालेअसून अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. सातत्याने अपघाताची मालिका सुरु होती सदर रस्त्यावर गतिरोधक बसल्याने पोंदेवाडी रोडेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending