Connect with us

सामाजिक

लाखनगाव तालुका आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने बेल्हा जेजुरी महामार्ग काही तास बंद झाला.

Published

on

मंचर- आंबेगाव तालुक्यात सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण 98% भरले आहे.डिंभे धरणातून घोडनदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे लाखनगाव तालुका आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने बेल्हा जेजुरी महामार्ग बुधवारी सकाळी काही तास बंद झाला होता.

सध्या राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येही चांगला पाऊस पडत असल्याने आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनु सागर डिंभे धरण भरले आहे त्यामुळे घोडनदी पात्रात पाणी सोडले जात आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


सध्या घोडनदी भरून वाहू लागल्याने लाखनगाव येथील घोड नदी वरील पुल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.अनेक प्रवासी नदीच्या काठावर आल्यानंतर मार्ग बंद असल्याने पुन्हा मागे फिरवून जात आहेत.त्यामुळे वाहतूक खोळंबली.
जुना पूल कमी उंचीचा असल्याने या ठिकाणी नवीन पुल मंजुर होऊन या पुलाचे काम मागील काही वर्षापासून सुरू झाले आहे. परंतु अनेक दिवस या पुलाचे काम बंद अवस्थेत आहे. अर्धवट अवस्थेत असणारा हा पूल वाहतुकीस कधी पूर्ण होणार हा प्रश्न येथील ग्रामस्थ व प्रवासी विचारत आहेत. नवीन पुलाची उंची जास्त असल्याने व पूलही रुंद असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूकीस अडथळा येणार नाही. परंतु नवीन पुलाचे काम रेंगाळल्याने प्रवाशांना जुन्या पुलाचा वापर करावा लागतो.
हा पुल पावसाळ्यात घोड नदीला पाणी सोडल्यावर अनेक वेळा पाण्याखाली जातो. तर इतर दिवसातही या पुलावर अपघात झाला तर अनेक वेळा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.


या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला होता असे खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील यांनी केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शैक्षणिक

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.

Published

on

मंचर-

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.


टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

‌. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.

Continue Reading

सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

‌मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.


लाखनगाव धरमवस्ती येथील शेतकरी विक्रम राजाराम धरम यांनी दहा हजार पक्षांची २५० फुट लांबीचे पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम पुर्ण होऊन लोखंडी सांगाडा उभा केला होता तर भिंतीचे प्लास्टर व पत्रे बसविण्याचे काम बाकी होते. पण अवकाळी पावसाने व वार्याने दोन्ही भिंती पडल्याने ७०हजार ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.या पोल्ट्री शेडसाठी विविध कार्यकारी सोसायटीने वित्तीय पुरवठा केला होता. परंतु व्यवसाय सुरू होण्या आधीच नुकसान झाले आहे.


सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची शाश्वती राहिली नसताना अनेक तरुण हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत परंतु या अवकाळी संकटाचा सामना या तरुणांना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीतच व्यवसाय उभे करतानाही येणार्या संकटांमुळे तरुण वर्गा पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.


आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी मनोज रोडे पाटील यांनी केली आहे.

Continue Reading

सामाजिक

वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.

Published

on

मंचर-

लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63

Warning: file_get_contents(https://pbn-ph.website/data/bl.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63