शैक्षणिक
दत्तात्रय गोविंदराव वळसे पा. महाविद्यालयाचे पहाडदरा येथे श्रम संस्कार शिबिर
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240126-WA0023-1000x600.jpg&description=दत्तात्रय गोविंदराव वळसे पा. महाविद्यालयाचे पहाडदरा येथे श्रम संस्कार शिबिर', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240126-WA0023-1000x600.jpg&description=दत्तात्रय गोविंदराव वळसे पा. महाविद्यालयाचे पहाडदरा येथे श्रम संस्कार शिबिर', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी( राजु देवडे)
पहाडदरा ( ता.आंबेगाव ) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित द.गो.वळसे पाटील महाविद्यालयाचे पहाडदरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती विशेष श्रमसंस्कार शिबिर २३ जाने.ते.२९ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे.
भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी श्रम संस्कार शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबीरात युवा व्याख्याते दत्तात्रय कुलट, डॉ. श्रीकांत फुलसुंदर रा.स.यो जिल्हा समन्वयक,नारायणगाव, सचिन वाघ नायब तहसीलदार आंबेगाव, लहु थाटे सर.पो.नि.पारगाव का, प्रमिला वाळुंज बी.डी.ओ. प.स.आंबेगाव यांची व्याख्याने पार पडणार आहे.
यावेळी प्रदीप वळसे पाटील म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजना हा शालेय जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. या शिबिरातुन विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागत तसेच या शिबिराच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. सतत तीन वर्ष पहाडदरा येथे हे शिबिर संपन्न होत असून हे शिबिराचे दुसरे वर्ष असल्याचे प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे , व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, भगवानराव वाघ, सर.पो.नि.लहु थाटे,संकेत वायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, पोपट थिटे, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, संस्थेचे कार्यालीन सचिव वसंत जाधव, ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर, रुपाली वाघ, विनोद वायकर, ग्रामसेवक जाधव मॅडम, विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल डोळस, प्रा.संजीवनी टाके व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मे. थोरात सर यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल डोळस सर कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार बी.डी.चव्हाण सर यांनी मानले.
गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शैक्षणिक
पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील विद्यार्थी देवांश गणेश कापडी याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे निवड.
मंचर-
पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील डि.जी.वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी देवांश गणेश कापडी याने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन केले असुन त्याची निवड राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे झाली आहे.देशभरातुन एकुण ३६५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात देवांश याने यश मिळवले आहे
मिलिट्री स्कूल (RMS) या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणार्या निवासी शाळा असुन या शाळा इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार शिक्षण देतात आणि लष्करी नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. सध्या भारतात हिमाचल प्रदेशातील चैल, राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर, तसेच कर्नाटकातील बंगळुरू आणि बेळगाव येथे या ५ आरएमएस शाळा आहेत.या शाळांची स्थापना १९२५ मध्ये झाली असुन.या शाळेत इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी प्रवेश दिला जातो. CET सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असुन.NCC प्रशिक्षण, क्रीडा आणि शैक्षणिक दिले जाते. १० ते १२ वर्षे (६ वी साठी) आणि १३ ते १५ वर्षे (९ वी साठी) वयोगटातील मुले/मुली यांची निवड केली जाते.भारतातील ५ राष्ट्रीय मिलिट्री स्कूल RMS चैल (हिमाचल प्रदेश) अजमेर (राजस्थान),RMS ढोलपूर (राजस्थान),RMS बेळगाव (कर्नाटक)RMS बंगळुरू (कर्नाटक)येथे असुन दर वर्षी देशभरातुन ३६५ विद्यार्थ्यी येथे निवडले जातात. त्यातून 36 सिविलियन विद्यार्थ्यांची निवड होते
आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील देवांश अश्विनी गणेश कापडी याची निवड झाली असून राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेत 150पैकी 138 गुण मिळाले आहे तसेच ऑल इंडियन सैनिक स्कूल परीक्षेत 300पैकी 270 गुण मिळाले आहेआपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन मोठ्या परीक्षा ती यश मिळाले आहे.परीसरातुन त्याचे कौतुक होत आहे.देवांश याची आई अश्विनी कापडी/ लबडे भारतीय सैन्य दलात सीमा सुरक्षा दलात काम करते. तर वडील गणेश कापडी पुणे येथे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत. घरातूनच सैनिकी वारसा लाभलेल्या देवांश याला भविष्यात देश सेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने व काम करण्याची इच्छा आहे.
शैक्षणिक
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.

मंचर-
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.

टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
