गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील प्रति भीमाशंकर श्री वेळेश्वर देवस्थान
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240104-WA0014-720x600.jpg&description=आंबेगाव तालुक्यातील प्रति भीमाशंकर श्री वेळेश्वर देवस्थान', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240104-WA0014-720x600.jpg&description=आंबेगाव तालुक्यातील प्रति भीमाशंकर श्री वेळेश्वर देवस्थान', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड पत्रकार गावडेवाडी
आंबेगाव तालुक्यातील प्रति भीमाशंकर श्री वेळेश्वर देवस्थान म्हणजे निसर्गाने मुक्त हाताने केलेली उधळण हिरवेगार सुंदरतेने नटलेले डोंगर नागमोडी वळणे असलेला घाट या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हे वेळेश्वराचे अतिसुंदर प्रतिभीमाशंकराचे स्थान वसलेले आहे जेवढे सुंदर तेवढेच दुर्लक्षित व पावित्र्य असलेले हे स्थान आहे.

आंबेगाव तालुक्याच्या मंचर शहराच्या दक्षिणेला साथ किलोमीटर अंतरावर पेठ गाव व तेथून पश्चिमेला ५ कि.मी. कुरवंडी गावच्या सीमेवर अगदी हाकेच्या अंतरावर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात श्रीवेळेश्वर हे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे .निसर्गाच्या कुशीत असलेले हे वेळेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर आहे शेकडो वर्षांपूर्वी कोणी स्थापन केले हे अज्ञात आहे मात्र भावडी येथील ह.भ.प.नामदेव महाराज वाळके यांनी येथे ४० वर्षा पूर्वी येऊन सातगाव पठारच्या ग्रामस्थांच्या व महाराष्ट्रातील अनेक भाविकांच्या मदतीने लोकवर्गणीतून या शिवमंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला आहे.

जवळच कमला मातेचे ही मंदिर आहे या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे या वेळेश्वराच्या डोंगरावर गेल्यावर वरून दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य दृष्टीस पडते पावसाळ्यात येथे मोठा पाऊस व धुक्याने हा परिसर धोक्यात हरवून जातो वन विभागाने येथे पशुपक्षी निरीक्षणासाठी मचान व लहान मुलांसाठी खेळणी उभारली आहेत या जंगलात मोर हरीण बिबटे हे प्राणी नजरेस पडतात येथे लोकवर्गणीतून भक्त निवासाचे काम सुरू आहे पिण्यासाठी पाण्याची विहीर व तिला स्वच्छ व सुंदर नितळ पाणी आहे.
राम मंदिर व विशेष आकर्षक असलेली लक्ष वेधून घेत असलेली दीपमाळ आहे वन विभागाने रस्त्याला दिलेल्या परवानगीमुळे व रस्ता थेट शिव मंदिराजवळ जात असल्याने पर्यटकांचा वाढता ओघ या ठिकाणी दिसून येतो.दुचाकी चार चाकी गाड्या येथे थेट येत असल्याने भाविकांची व पर्यटकांची वाढती गर्दी होत आहे .विशेष म्हणजे साधना करणाऱ्यांसाठी येथे दोन डोंगरात कोरलेली ध्यान मंदिरे (गुहा ) आहेत भाविकांना या गुहेत बसून साधना अनुभवता येते व ध्यान करता येते पर्यटकांनी या क्षेत्राचे पावित्र्य राखावे अशी आवाहन वेळोवेळी कोल्हारवाडी येथील वाळके बाबांचे शिष्य हभप दत्तात्रय महाराज रुकारी हे करतात व तसे अवाहन व प्रयत्नही ते सदोदीत करतात.
श्रीवेळेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर व कमला मातेचे मंदिर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेले या ठिकाणी हे ठिकाण लोकवर्गणीतून व ग्राम सहभागातून सुशोभित केले आहे येथे दररोज सकाळी संध्याकाळी नित्य पूजाअर्चा होते
ह भ प नामदेव महाराज वाळके मठाधिपती वेळेश्वर संस्थान.
शब्दांकन ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी.
गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

गावागावातुन
घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
मंचर –
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
