सामाजिक
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/08/IMG_20250822_165433507_HDR_PORTRAIT-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/08/IMG_20250822_165433507_HDR_PORTRAIT-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर-
आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. बैलपोळ्याच्या निमित्त बैलांना धुवून त्यांच्या शिंगाना रंग लावून सजवुन मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर महिलांनी औक्षण करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावांमध्ये श्रावणी बैलपोळा साजरा केला जातो. तालुक्याचे पुर्व भागातील काठापूर ,शिंगवे या गावांमध्ये श्रावण बैलपोळा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा बैलपोळा महाळुंगे पडवळ या ठिकाणी साजरा होतो. आज तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बैलांना सकाळी स्वच्छ धुवून त्यांच्या शेंगांना रंग लावून गावातुन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकिनंतर महिलांची औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.

बैल हा शेतकर्याचा मित्र सहकारी म्हणून सर्वत्र बैलपोळा सण हा परंपरेने वर्षानुवर्षे साजरा केला जातो.सध्या शेतीमध्ये बैलांचा वापर कमी झाला आहे त्यामुळे बैलाचे प्रमाण कमी झाले आहे.तरीही बैलगाड्याच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये बैल चांगल्या पद्धतीने सांभाळले जातात. शेती कामासाठी असणार्या बैलांची संख्या गावोगावी कमी झाली आहे. परंतु बैलगाड्याच्या शर्यतीसाठी बैल मोठ्या प्रमाणावर सांभाळले जात असल्याने बैलांची संख्या वाढली आहे.
मध्यंतरी बैलगाडा शर्यत बंदिच्या काळात बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. परंतु मागील तीन ते चार वर्षात बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर पुन्हा बैलांची संख्या चांगल्या पद्धतीने वाढली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात बैलगाडा प्रेमींची संस्था मोठी असल्याने अनेक गावांमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा केला जातो.काठापुर बुद्रुक या ठिकाणीही बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला.
शैक्षणिक
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.

मंचर-
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.

टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.
सामाजिक
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.
मंचर-
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

लाखनगाव धरमवस्ती येथील शेतकरी विक्रम राजाराम धरम यांनी दहा हजार पक्षांची २५० फुट लांबीचे पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम पुर्ण होऊन लोखंडी सांगाडा उभा केला होता तर भिंतीचे प्लास्टर व पत्रे बसविण्याचे काम बाकी होते. पण अवकाळी पावसाने व वार्याने दोन्ही भिंती पडल्याने ७०हजार ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.या पोल्ट्री शेडसाठी विविध कार्यकारी सोसायटीने वित्तीय पुरवठा केला होता. परंतु व्यवसाय सुरू होण्या आधीच नुकसान झाले आहे.

सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची शाश्वती राहिली नसताना अनेक तरुण हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत परंतु या अवकाळी संकटाचा सामना या तरुणांना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीतच व्यवसाय उभे करतानाही येणार्या संकटांमुळे तरुण वर्गा पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी मनोज रोडे पाटील यांनी केली आहे.
सामाजिक
वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.
मंचर-
लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन7 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
