Connect with us

सामाजिक

लाखनगाव तालुका आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने बेल्हा जेजुरी महामार्ग काही तास बंद झाला.

Published

on

मंचर- आंबेगाव तालुक्यात सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण 98% भरले आहे.डिंभे धरणातून घोडनदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे लाखनगाव तालुका आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने बेल्हा जेजुरी महामार्ग बुधवारी सकाळी काही तास बंद झाला होता.

सध्या राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येही चांगला पाऊस पडत असल्याने आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनु सागर डिंभे धरण भरले आहे त्यामुळे घोडनदी पात्रात पाणी सोडले जात आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


सध्या घोडनदी भरून वाहू लागल्याने लाखनगाव येथील घोड नदी वरील पुल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.अनेक प्रवासी नदीच्या काठावर आल्यानंतर मार्ग बंद असल्याने पुन्हा मागे फिरवून जात आहेत.त्यामुळे वाहतूक खोळंबली.
जुना पूल कमी उंचीचा असल्याने या ठिकाणी नवीन पुल मंजुर होऊन या पुलाचे काम मागील काही वर्षापासून सुरू झाले आहे. परंतु अनेक दिवस या पुलाचे काम बंद अवस्थेत आहे. अर्धवट अवस्थेत असणारा हा पूल वाहतुकीस कधी पूर्ण होणार हा प्रश्न येथील ग्रामस्थ व प्रवासी विचारत आहेत. नवीन पुलाची उंची जास्त असल्याने व पूलही रुंद असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूकीस अडथळा येणार नाही. परंतु नवीन पुलाचे काम रेंगाळल्याने प्रवाशांना जुन्या पुलाचा वापर करावा लागतो.
हा पुल पावसाळ्यात घोड नदीला पाणी सोडल्यावर अनेक वेळा पाण्याखाली जातो. तर इतर दिवसातही या पुलावर अपघात झाला तर अनेक वेळा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.


या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला होता असे खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील यांनी केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.

Published

on

मंचर-

लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते

Continue Reading

सामाजिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

Published

on

  मंचर-
     राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. 

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending