गावागावातुन
आंबेगाव तालुक्यात गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात.कारखान्यामध्ये रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न; आगाऊ नोदणीही सुरू.
मंचर–
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आदर्श गाव गावडेवाडी येथील परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्यांमध्ये गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्नअसल्याचे जिल्ह्याला मूर्ती पुरवणारे आदर्श ग्राम गावडेवाडी येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.
कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी पुणे, अहिल्यानगर, मुंबई, नाशिक पनवेलआदी शहरात पाठविण्यासाठी कारखानदारांची लगबग सुरू आहे. यावयों येत्या ३१ ऑगस्टला गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक सण असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा
उत्साह पाहावयास मिळतो. यावर्षीच्या उत्सवात एक ते १० फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या आकर्षक मूर्ती प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. बहुतांश मूर्ती पूर्णत्वास आल्या असून, उवरित मूतों वर अंतिम रंगकाम आणि सजावटीचे काम सुरू आहे.
तालुक्यात यंदा सुमारे १५ ते २० गणेश मूर्तीचे कारखाने कार्यरत आहेत मंडळे तसेच, चरगुती गणेश मूर्तीसाठी येथील कारागिरांकडे आगाऊ नोंदणी करत असतात. यामुळे सर्व कारागीर दिवस-रात्र काम करून मूर्ती परिपूर्ण करण्यासाठी झटत आहेत. आकर्षक रंगसंगती, नवनवीन डिझाईन्स आणि आधुनिक डेकोरेशन यामुळे यंदाच्या

मूताँची शैली वेगळी ठरत आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेश भक्त शाडूच्या मूर्तीची चौकशी करत असल्याने यावर्षी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती देखील बनविण्यात आल्या आहेत. त्यांना देखील चांगली मागणी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना मे-जून महिन्यात परवानगी मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांना जास्त मजुरी देऊन कमी वेळात जास्तीत जास्त गणेशमूर्ती बनविण्याचे आव्हान प्रत्येक कारखानदारास होते. यासाठी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम रात्र दिवस सुरू होते.
पेणच्या शाडूच्या मूर्ती, पुणेरी पॅरिसच्या फेटाधारी जय मल्हार, हनुमान, बाल गणेश, तांडव अवतार, घरगुती उत्सवासाठी विशेष मागणी असते. आकर्षक रंगसंगतीच्या मूर्तीला विशेष पसंती देण्यात येते. गणपती मूर्ती बनविण्याचे काम नियमित सुरू आहे .
किमतीत वाढ आणि साहित्याचा तुटवडा
यावर्षी रंग, सजावटीचे साहित्य आणि मूर्ती बनविण्याचे कच्चे साहित्य आदींचे दर प्रबंड वाढले आहेत. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. किमतीत वाढ झाली असली तरी भाविकांचा उत्साह पूर्वीइतकाच आहे. आपल्या आवडत्या बाप्पाच्या मूर्तीची आगाऊ नोंदणी तसेच, खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
. परिसरातील नागरिक दोन ते तीन महिन्यांपासून ऑर्डर देत असतात. यात सार्वजनिक पीओपीच्या आकर्षक मूर्तीना मोठी मागणी आहे. कार्टून पॅटर्न डिझाईन्स, बालगणपती, डिझाईन्स तसेच, विविध प्राण्यांवर बसलेल्या मूर्ती यांचीही विक्री वाढली आह गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर, मग्न आहेत
आपल्या आवडत्या गणपती बाप्पाची मूर्ती निश्चित करण्यासाठी गर्दी करत आहेत. आपली गणेशमूर्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कारागिरांना आपल्या कलेचे कौतुक झाल्याचा आनंद मिळतो.तसेच यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मूर्तींच्या किमती १५ते २०टक्क्यांनी वाढ करावी लागणार आहे.
प्रथमेश श्रीधर राजगुरू .मूर्ती कारखानदारआदर्श ग्राम गावडेवाडी ‘
फोटो ओळी

प्र
आदर्श ग्राम गाडेवाडी ता आंबेगाव येथील प्रथमेश श्रीधर राजगुरू आपल्या गणेश मूर्तीच्या कारखान्यात मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत.
गावागावातुन
भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.
मंचर-
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.
मंचर-
भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.
उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.
भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.
मंचर-
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन6 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
