शेतीशिवार
आंबेगाव तालुक्यात भुईमूग काढणी सुरू,उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये किलो असा बाजार भाव.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/06/1000164722-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुक्यात भुईमूग काढणी सुरू,उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये किलो असा बाजार भाव.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/06/1000164722-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुक्यात भुईमूग काढणी सुरू,उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये किलो असा बाजार भाव.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली असून उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये किलो असा बाजार भाव मिळत असल्याने भुईमुगाच्या शेंगांना चांगला बाजार भाव आहे.परंतु माघील दिड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भुईमुगाच्या शेंग खराब झाल्या व काही शेंगांना मोड आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव काठापुर जारकरवाडी लाखनगाव देवगाव पोंदेवाडी आधी गावांमध्ये उन्हाळ्यात अनेक तरकारी पिके घेतली जातात या ठिकाणी शेतकरी उन्हाळ्यामध्ये भुईमूग पिकाची लागवड करत असतो .या भुईमुगाची काढणी जुन महिन्यात सुरू होते. आषाढी एकादशीमुळे त्याच प्रमाणे पावसामुळे भुईमुगाच्या शेंगांना चांगल्या प्रकारची मागणी या महिन्यात असते. परिणामी यावेळेस हमखास भुईमूगाच्या शेंगांना बाजारभाव मिळत असतो.त्यामुळे उन्हाळ्यात शेतकरी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ठिकाणी भुईमूग पिकाची लागवड करत असतात.तसेच उन्हाळ्यात लागवड केलेल्या भुईमुगाचे उत्पन्नही चांगले होत असल्याने व चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे.
याही वर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात भुईमूग पिकाची लागवड केली होती या भुईमुगाची काढणी सध्या सुरू झाली असून. चांगला बाजार भाव मिळत आहे सध्या भुईमूगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत आहे.परंतु यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून सुरू च आहे त्याचा फटका या भुईमुगाच्या शेंगांनाही झाला. कारण भुईमुगाच्या शेंगा या पावसामुळे सडून गेल्या आहेत.भुईमूग उपटताना या शेंगा शेतातच राहतात. परिणामी या भुईमूगापासून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होणार आहे. त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे वावरात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने अनेक भुईमुगाच्या शेंगांना मोड आले आहेत. सध्या ओल असल्याने काढणीसही त्रास होत आहे. त्यामुळे मजुरीचा खर्चही वाढला आहे.परंतु अशाही परिस्थितीत भुईमुगाच्या शेंगांना अजुन मोड येऊ नयेत म्हणून शेतकरी भुईमुग काढूनी करत आहे. सध्या भुईमूगाच्या शेंगांना चांगला बाजारभाव मिळत असला तरीही. पावसामुळे बसलेला फटका व सध्या मोठ्या प्रमाणावर लागणारे मजूर यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हातात म्हणावा तेवढा नफा येत नसल्याचे शेतकरी पांडुरंग करंडे म्हनाले.
पावसामुळे बसलेला फटका व सध्या मोठ्या प्रमाणावर लागणारे मजूर यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हातात म्हणावा तेवढा नफा येत नाही. पांडुरंग करंडे शेतकरी.
काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील शेतकरी नवनाथ करंडे यांची भुईमूग काढणी सुरू असुन जास्त प्रमाणावर मुजुर लागत असल्याने मजुरी खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे सध्या भुईमुगाच्या शेंगांना चांगला बाजार भाव मिळत असला तरी निघणारे उत्पन्न होणारा खर्च पाहता शेतकर्यांच्या हातात काहीही लागत नसल्याचे दिसून येत आहे.
गावागावातुन
भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.

मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
क्षक्षक्षकारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरु केले आहेत. ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणा-या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच येणारा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

– दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ,नुकसानग्रस्त गावांना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांची भेट, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन.
मंचर-
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल पावसाने झोडपले अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,स.पो.नी.सचिन कांडगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बाजार समिती सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.
शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
गावागावातुन
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.
निरगुडसर-
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासुन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातही पाऊस हुलकावणी देत होता.परंतु आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन7 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
