Connect with us

गावागावातुन

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाला काठापूर ग्रामस्थांचा विरोध, गावातून महामार्ग न होण्यासाठी ग्रामसभेत ठराव.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

काठापुर बुद्रुक ( ता. आंबेगाव ) येथे आयोजित ग्रामसभेत काठापुर बुद्रुक गावातून जाणाऱ्या पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गास कडाडून विरोध करत. गावातून हा महामार्ग होऊ नये या याबाबत शासनाला कळवावे असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग जात आहे हा महामार्ग तालुक्यातील लोणी धामणी खडकवाडी पोंदेवाडी काठापुर बुद्रुक भागडी शिंगवे या गावांमधुन जात आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती बाधीत होत असून, या महामार्गाला विरोध होत आहे. या महामार्गाची रुंदी ही 90 ते 110 मीटर असणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे. काठापुर बुद्रुक हे गाव घोड नदीच्या काठावर वसले असल्याने गाव बारमाही बागायती आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेजारीच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची उपलब्धता आहे.

त्याचप्रमाणे दुग्धव्यवसाय ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो.सध्या नोकऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने काठापुर मधील मोठ्या प्रमाणावर लोक व तरुण शेती व दुग्धव्यवसाय करत आहे. या आदी ही डिंभे धरण बांधल्यानंतर डिंभे धरणातून बुडीत झालेला शेतकऱ्यांसाठी काठापुर बुद्रुक गावातील मोठ्या प्रमाणावर जमीन शासनाने संपादित केली. त्यामुळे याआधीही काठापुर बुद्रुक गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपत्ती झालेले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी अत्यंत अल्पभूधारक झाला आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा औद्योगिक महामार्गासाठी काठापुर बुद्रुक येथील शेती संपादित होणार आहे. त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसत आहे. त्यामुळे हा औद्योगिक महामार्ग काठापूर बुद्रुक गावातून न होता पर्यायी ठिकाणावरून व्हावा.या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे काठापुर बुद्रुक या ठिकाणी पार पडलेल्या ग्रामसभेत बाधित होणारे शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला विरोध नोंदवून औद्योगिक महामार्ग दुसरीकडून व्हावा ही भूमिका घेतली आहे
यावेळी सरपंच अशोक करंडे, उपसरपंच पप्पु खुडे,विशाल करंडे,दादाभाऊ गायकवाड,शोभा जोरी,विमल करंडे,पोलीस पाटील अमोल करंडे,ग्रामसेवक सुवर्णा गोसावी,सुनिल करंडे, संतोष करंडे,बजरंग करंडे,विनायक करंडे,शिवाजी करंडे,बजरंग करंडे,कान्हु करंडे, संतोष करंडे,नवनाथ करंडे,व ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Published

on

‌‌मंचर-

      देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
    गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Continue Reading

गावागावातुन

आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Published

on

मंचर-

आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.

या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Continue Reading

गावागावातुन

घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

Published

on

मंचर –

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62