गावागावातुन
पुणे नाशिक औद्योगिक महार्गाला शेतकऱ्यांचा विरोध,योग्य मोबदला मिळाला तरच भुसंपादन – अनिल वाळुंज
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/05/1000553856.jpg&description=पुणे नाशिक औद्योगिक महार्गाला शेतकऱ्यांचा विरोध,योग्य मोबदला मिळाला तरच भुसंपादन – अनिल वाळुंज', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/05/1000553856.jpg&description=पुणे नाशिक औद्योगिक महार्गाला शेतकऱ्यांचा विरोध,योग्य मोबदला मिळाला तरच भुसंपादन – अनिल वाळुंज', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, शिंगवे, भागडी आदी गावातुन प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग आंबेगाव तालुक्यातील सदर गावांमधून जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित गावातील शेतकऱ्यांना जमीन भुसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. भुसंपादनाची प्रक्रिया चालू झाली असून शासनाच्या नियमाप्रमाणे मिळत असलेली रक्कम कमी प्रमाणात असल्याचे ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.
याबाबत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली असून जि.प.माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व मंत्री वळसे पाटील यांचें स्विय सहायक रामदास वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव जुन्नर प्रांत गोविंद शिंदे यांच्या सोबत ( दि. ६ जुन ) रोजी भीमाशंकर कारखान्याच्या कार्यस्थळावर बाधीत गावातील शेतकऱ्यांची बैठक होणार आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित होणार आहे. अशा शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनिल वाळुंज यांनी केले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात घोडनदी,व डिंभे धरण उजवा कालवा गेल्याने या भागातील शेती बारमाही पिकत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीतून चांगले उत्पन्न काढत आहे. या भागातील अनेक जमिनी पुनर्वसनासाठी गेलेल्या आहेत . त्यात कुटुंब विभक्त झाल्याने जमीन कमी झाली आहे. बेल्हा जेजुरी, अष्टविनायक हे दोन्ही महामार्ग या परिसरातून गेले आहे. त्यामुळे या भागातील जमिनींचे दर चाळीस ते पन्नास लाखावर जाऊन पोहचले आहे. या भागातील रेडीरेकनर दर हा अत्यल्प आहे रेडीरेकनरचा दर वाढवल्यास मिळणाऱ्या पैशातून संबंधित शेतकरी दुसरीकडे जमीन घेऊन उदरनिर्वाह करु शकतो त्यामुळे शासनाने रेडीरेकनरचा दर वाढवावा अन्यथा बाधित शेतकऱ्यां समवेत आंदोलन करणार आहे.
अनिल वाळुंज – माजी सरपंच पोंदेवाडी ता.आंबेगाव जि.पुणे.
गावागावातुन
भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.

मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
क्षक्षक्षकारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरु केले आहेत. ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणा-या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच येणारा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

– दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथील आकांक्षा अरगडे (ढमाले) यांची ठाणे शहर पोलीस पदी निवड, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार.
मंचर-
काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील आकांक्षा बाबाजी अरगडे (ढमाले) यांची ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली असून. त्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या पोलीस भरती परीक्षेत काठापूर गावची कन्या अकांक्षा बाबाजी अरगडे( ढमाले)यांनी ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली.
पोलीस भरती साठी कठोर मेहनत करून त्यांनी हे यश मिळवले.गेली सात वर्षांपासुन या साठी ती सराव करत होती अनेक वेळा अपयश आले.यावेळी झालेल्या भरती प्रक्रियेत त्यांनी ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली.मध्यंतरी लग्न झाले एक मुलगी झाली परंतु त्यानंतर ही त्यांनी आपले पोलीस होण्याचे स्वप्न सुरू ठेवले.सरावात सातत्य ठेवले कुटुंब व मुलीची जबाबदारी पार पाडत त्यांनी हे यश मिळाले.त्यात त्यांचे वडील एकनाथ ढमाले आई,पती,सासु,सासरे यांचा पाठिंबा मिळाला.

पोलीस पदी निवड झाल्या निमित्ताने काठापूर ग्रामस्थांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, संदीप पोखरकर,पोलिस पाटील,अमोल करंडे, संतोष करंडे, रामदास करंडे,मंगेश करंडे, बाबाजी करंडे, शिवव्याख्यात्या अर्चना करंडे लाखनगाव व काठापूर बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये साजरी करण्यात आली.पोंदेवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर ग्रामपंचायत अधिकारी मनिषा वळसे,अमोल वाळुंज, आनंदराव पोंदे, चंद्रकांत विरकर, गणेश हारके, शंकर हारके,सचिन हारके, राजू वारे, निलेश मांजरे ,नवनाथ हारके. यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन7 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
