गावागावातुन
सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणीत म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/02/1000432126-1000x600.jpg&description=सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणीत म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/02/1000432126-1000x600.jpg&description=सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणीत म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
दिः२४/०२/२०२४. धामणी ( ता. आंबेगाव ) ” सदानंदाचा येळकोट,येळकोट येळकोट जय मल्हार ” च्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून लाखो भाविकांनी धामणी ( ता.आंबेगांव)येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.
पुणे ,नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेला शनिवार ( दिं :२४ ) रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली शनिवारी माघ शुध्द पौर्णिमेला भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या भव्य मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक परंपरागत सेवेकरी तांबे व भगत यांंनी केल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाची सर्वांगसुंदर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन खंडोबाच्या मुखवट्याला आणि पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा ,म्हाळसाई-बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात येऊन त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांना देवाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
देवस्थानांच्या तांबे,भगत सेवेकरी मंडळीनी आणलेल्या पुरणपोळी,साजूक तूप,दूध व खसखशीची खीर,सार,भात,कुरडई व पापडी या पंचपक्वानांचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला.यावेळी देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे मंडळी उपस्थित होती.पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
देवस्थानातील पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली.सकाळी नऊ वाजता गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकीने देवाचे हारतुरे व मांडवडहाळे मंदिरात आणण्यात येऊन ते देवाला अर्पण करण्यात आले.शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे ,भोसरी ,पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते .पेठेतून नवसाच्या बैलगाड्याची व गाडी बगाडाची डफडे,ढोलकी ,ताशा ,संबळ ,सनई तुतारीच्या पारंपारिक वाद्यात व बँजो व डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आल्या त्यानंतर बैलगाड्याच्या घाटामध्ये नवसाच्या बैलगाड्याच्या शर्यती सुरु झाल्या.
घाटात नवसाचे बैलगाडे पळण्यासाठी पडवळ ,सैद ,आवटे.(महाळूंगे पडवळ)जाधव ,ढगे.(नांदूर)थोरात (बेल्हा पाडळी)गावडे (गावडेवाडी) याशिवाय गाडकवाडी ,पेठ पारगांव ,भराडी ,फाकटे ,टाकळी हाजी यांचे बैलगाडे आलेले होते.बैलगाड्याच्या शर्यती पाहाण्यासाठी बैलगाडा शौकीनानी मोठी गर्दी केलेली दिसत होती.
मंदिर परिसरात भंडारा,खोबरे व पेढे विक्रीची व फुलाची दुकाने दिसत होती.मंदिराच्या शिखरावर व महाद्बारावर पारनेर तालुक्यातील आळे पाडळीच्या थोरात कुटुंबियाच्या तर्फे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.महाळूंगे पडवळ येथील पडवळ कुटुंबियानी मंदिराची व गाभार्याची झेंडूच्या फुलांनी सजावट केली होती.मंदिराच्या आवारात भाविकांची पांचनामाची जागरणे सुरु होती.वाघेमंडळी वीर मंडळी जागरणाचे घटापुढे खंडोबाचा पांचनामाचा गजर करताना दिसत होती. पंचक्रोशीच्या गावांमधील भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव ताम्हणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे उधळून ‘ सदानंदाचा येळकोट ‘ करुन तळीभंडार करत होती.
यात्रेनिमित्त निरनिराळ्या ठिकाणाहून हाँटेल,आईस्क्रीम पार्लर,जनरल कटलरी , खेळणीची दुकाने , सौदर्य प्रसाधने ,गृहोपयोगी वस्तू कृषी उपयोगी लाकडी व लोंखडी अवजारे निरनिराळे फॅशनेबल कपडे,बेडशीटची दुकाने थाटलेली होती.दुपारी बारा नंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या.दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्याची संख्या मोठी होती.माही पुनवेच्या पालखी ढोललेझीमच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत काढण्यात आली.पालखीला भाविकांनी गर्दी केलेली होती.यात्रेची व्यवस्था देवस्थान,यात्रा उत्सव समिती ,ग्रामपंचायत आणि गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

गावागावातुन
घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
मंचर –
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
