गावागावातुन
पोंदेवाडी(ता.आंबेगाव)गावासाठी असणाऱ्या तलाठी कार्यालयात केलेला बदल रद्द करुन. खडकवाडी ऐवजी लाखणगाव येथेच तलाठी कार्यालय ठेवावे अशी सरपंच निलम वाळुंज व पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/01/IMG_20240105_102825.jpg&description=पोंदेवाडी(ता.आंबेगाव)गावासाठी असणाऱ्या तलाठी कार्यालयात केलेला बदल रद्द करुन. खडकवाडी ऐवजी लाखणगाव येथेच तलाठी कार्यालय ठेवावे अशी सरपंच निलम वाळुंज व पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/01/IMG_20240105_102825.jpg&description=पोंदेवाडी(ता.आंबेगाव)गावासाठी असणाऱ्या तलाठी कार्यालयात केलेला बदल रद्द करुन. खडकवाडी ऐवजी लाखणगाव येथेच तलाठी कार्यालय ठेवावे अशी सरपंच निलम वाळुंज व पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर( राजु देवडे)
पोंदेवाडी (ता. आंबेगाव)या गावाला नवीन नियमानुसार.महसूल विभागाने तलाठी कार्यालयाच्या ठिकाणात बदल केले असून.पोंदेवाडी गावाला पूर्वी असणारा लाखणगाव सजा तलाठी कार्यालय या ऐवजी खडकवाडी सजा तलाठी कार्यालय देण्यात आलेले आहे. परंतु दळणवळणाच्या दृष्टीने खडकवाडी गाव अडचणीचे ठरत असल्याने. महसूल विभागाने केलेला बदल रद्द करुन .जुन्याच पद्धतीने लाखनगाव सजा तलाठी कार्यालय ठेवावे अशी मागणी पोंदेवाडीच्या सरपंच निलम वाळुंज यांनी उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी या गावाचे तलाठी महसुली कार्यालय बदलण्यात आले असून पोंदेवाडी गावासाठी पुर्वी लाखनगाव येथे तलाठी कार्यालय होते व पारगाव या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय होते.परंतु नवीन बदलानुसार पोंदेवाडी गावाला खडकवाडी या ठिकाणी तलाठी सजा कार्यालय देण्यात आले असुन पारगाव मंडल कार्यालय ठेवण्यात आले आहे. परंतु खडकवाडी गाव हे पोंदेवाडी ग्रामस्थांच्या दृष्टीने दळणवळणाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लाखनगाव तलाठी कार्यालय पोंदेवाडीसाठी असावे.अशी माघणी पोंदेवाडी ग्रामस्थांची आहे.

पुर्वी लाखनगाव व पोंदेवाडी एकच गाव होते नंतर ग्रामपंचायत वेगळी झाल्याने पोंदेवाडी स्वतंत्र झाले. परंतु पोंदेवाडेचा सबंध दळणवळण व सर्व गोष्टींनी लाखनगावशी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पोंदेवाडी व लाखनगाव अशा दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रशासनाने केलेला बदल रद्द करून पुर्वी प्रमाणेच पोंदेवाडी गावासाठी तलाठी महसुली कार्यालय लाखनगाव येथे ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. याबाबतचे निवेदन पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच निलम अनिल वाळुंज यांनी उपविभागीय अधिकारी आंबेगाव जुन्नर व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
गावागावातुन
खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात
मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.
आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )
पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे

आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
