राजकीय
भेसळप्रकरणात संबंध आढळल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन’ – दिलीप वळसे पाटील यांचा विरोधकांना थेट इशारा.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/09/1000759518-3-1000x600.jpg&description=भेसळप्रकरणात संबंध आढळल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन’ – दिलीप वळसे पाटील यांचा विरोधकांना थेट इशारा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/09/1000759518-3-1000x600.jpg&description=भेसळप्रकरणात संबंध आढळल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन’ – दिलीप वळसे पाटील यांचा विरोधकांना थेट इशारा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर:
अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असे खुले आव्हान त्यांनी राजकीय विरोधकांना दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे विरोधकांच्या खोट्या आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या माध्यमातून राज्यात आणि अंबेगाव तालुक्यात दूध व्यावसायिकांवर तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई अजूनही सुरूच आहे. मात्र, ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही, त्या गोष्टींशी आपले नाव जोडून आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ करणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कधीही कोणाच्याही पाठीशी उभा राहणार नाही, असे सांगत एफडीए आणि पोलीस प्रशासन अशा लोकांवर कडक कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्यावर खोटे-नाटे आरोप करून राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. विरोधकांनी ही खोडसाळ बदनामी त्वरित थांबवली नाही, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) फौजदारी (Criminal) आणि मोठ्या आर्थिक अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला. आपण नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण केले असून जनता, समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी या राजकीय षड्यंत्राची नोंद घ्यावी, असे आवाहन करत शेवटी सत्याचाच विजय होईल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
गावागावातुन
जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.
मंचर-
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत.
निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
गावागावातुन
आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.
मंचर प्रतिनिधी
मला येथील जनतेने 1990 साली वयाच्या 34 व्या वर्षी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली .त्यावेळी परिस्थिती अवघड होती. तालुक्यातील अनेक लोक तालुक्याबाहेर रोजगार मिळवण्यासाठी जात होते. आज परिस्थिती बदलली आहे शिरूर तालुक्याला सगळ्या नद्यांवरील धरणांचे पाणी येत आहे .शिरूर तालुका बागायती झाला त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका बागायती झाला आंबेगाव शिरूर तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर येथे झालेली प्रगती लक्षात येते.येथे झालेला बदल दिसून येतो पाण्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यात सुबत्ता आली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या.असे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.
मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी शिरूर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे निरीक्षक अतुल ब्रह्मभट्ट ,पोपटराव गावडे,पुर्वाताई वळसे पाटील,देवेंद्र शहा,बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील,जयसिंग एरंडे उपस्थित होते.

निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेले पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल.
डिंभे धरणाचे भूमिपूजन 1978 साली झाले परंतु 2000 सालापर्यंत पाणी मिळाले नव्हते. 90 साली आमदार झाल्यानंतर अधीकचा निधी आणून डिंभे धरणाचे काम पूर्ण केले. त्याचप्रमाणे कुकडी प्रकल्पा अंतर्गत 65 बंधारे आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यात उभे केले. अजूनही सातगाव पठार, आदिवासी भाग व शिरूर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी पोहचवायचे आहे.ही गावे बागायती करायची आहेत. कुकडीची तिसरी मान्यता झाली तेव्हा 65 बंधारे एकदाच भरायचे नियोजन होते.परंतु आपण या निर्णयात बदल केला आणि 65 बंधारे या प्रकल्पांतर्गत आणले.डिंभे धरणाला बोगदा पाडून धरणातील पाणी पलीकडच्या बाजूला न्यायचे होते असे झाले असते तर तीन महिन्यात धरण रिकामे झाले असते. आणि पुन्हा एकदा आंबेगाव शिरूर तालुका हा दुष्काळी झाला असता. माळीनची दुर्घटना झाली त्यानंतर नवीन गाव वसवले तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आसाणे या ठिकाणी तलाव बांधुन त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.थिटेवाडी बंदरातील गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. कळमोडी चे काम लवकर पूर्णत्वास येईल आणि त्या माध्यमातून शिरूर खेड आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बागायती होतील मोठ्या प्रमाणावर इमारती आपण तालुक्यात बांधल्या.आपला भीमाशंकर कारखाना उत्तम सुरू आहे .शेजारील कारखाना बंद पडला पण त्यावर कोणी बोलत नाही आपण 3200 रुपये बाजार भाव दिला.आपण अनेक सरकारी शाळा वसतिगृह इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केला त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातून आपण शिक्षणाचे काम करत आहोत इंजिनिअरिंग महाविद्याल सुरु केले.
आरोग्य सेवेसाठी पहिले तीस बेडचे मंचर या ठिकाणी हॉस्पिटल सुरु केली त्यानंतर 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय केले त्यासाठी देवेंद्र शहा अध्यक्ष असलेल्या पांजरपोळ ट्रस्टची जागा त्यांनी सरकारला दिली. तांबडेमळा या ठिकाणी 100 बेडच्या नवीन हॉस्पिटलचे काम सुरू आहे .त्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आपण देत आहोत .
भीमाशंकर तिर्थक्षेत्रासाठी 148 कोटीचा आराखडा मंजूर आहे. परंतु तेथे वनविभाग व इतर कायदे अडचणीमुळे थोडी अडचण आहे .पण यावरही मार्ग काढून हा विकासाचा आराखडा पुर्ण करु.अनेक देवस्थानांना आपण चांगल्या प्रकारे निधी दिला आहे. मंचर येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधली घोडेगाव तहसील कार्यालय इमारत बांधली ,कोर्टाची इमारत बांधली. पंचायत समिती कार्यालयाची इमारत बांधली. मंचर व घोडेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस वसाहत बांधली .भोरवाडी या ठिकाणी एसटी डेपो सुरू केला नवीन बस स्थानक मंचर या ठिकाणी आपल्याला करावयाचे आहे. मंचर ग्रामपंचायत ची नगरपंचायत केली.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणला मी अजित दादा पवार यांच्याकडून निधी आणला व मंचरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. तालुक्यात अष्टविनायक महामार्ग व बेल्हा जेजुरी महामार्ग उभे केले. तसेच नवीन अवसरी फाटा पारगाव ,टाकळी हाजी ,मलठण गणेगाव खालसा, शिक्रापूर असा नवीन रस्ता मंजूर आहे त्यासाठी 416 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
विजेच्या बाबतीत अनेक कामे केली पाण्यासाठी आपण 135 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 63069 महिलांना व शिरूर तालुक्यातील 37390 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. बळीराजा योजनेतून 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज देण्याचे काम आपण केल.असे वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणाव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश स्वामी थोरात यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार अंकीत जाधव यांनी मानले
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
