गावागावातुन
राजकीय नेत्यांनी कंत्राटदारांच्या हिताचे प्रकल्प शेतकऱ्यांवर लादू नये अन्यथा महामार्ग संघर्ष समिती काढणार मोर्चा
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
राज्य सरकारने कोणाचीही मागणी नसताना पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग बनविण्याचा घाट घातला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पर्यायी रस्ता असून नव्याने औद्योगिक महामार्ग अनावश्यक असून त्यात पिकाऊ, बागायत क्षेत्रातून जात असून या महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असून शासनाने महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिलेले आहे परंतु येत्या आठ दिवसात महामार्ग कायमस्वरूपी रद्द केल्याचे शासनाने परिपत्रक काढावे. अन्यथा बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मंत्रालयावरती प्रचंड मोर्चा तसेच सर्व संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाईल. असा इशारा महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी व्यक्त केले

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी पुणे- नाशिक महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांचा विरोध हा शासन दरबारा पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त काठापूर बुद्रुक या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला औद्योगिक महामार्गात जमिन जाणारे बाधित शेतकरी उपस्थित होते.यावेळी माझी उपसरपंच विशाल करंडे,कान्हु करंडे, संतोष करंडे, नवनाथ करंडे, पंढरीनाथ करंडे,धनंजय करंडे,फकीर करंडे,शिवाजी करंडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काठापूर बुद्रुक हे गाव पूर्णपणे 100% बागायती आहे. परंतु या गावच्या सातबारा उतारा वर हंगामी बागायती चा शेर आहे. त्याचप्रमाणे शासनाचा रेडी रेकनरचा दर हा अत्यल्प आहे. आणि त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत बागायती जमीन ही महामार्गासाठी जाऊ देणार नाही. असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.2013 च्या कायद्यानुसार बागायती जमीन कोणत्याही महामार्गासाठी घेऊ नये.अशा सूचना असतानाही शासनाने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून काठापूर बुद्रुक गावातील क्षेत्र या महामार्गासाठी घेतले आहे. त्यामुळे या रस्त्याला काठापूर बुद्रुक मधील बाधीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा मार्ग गावातुन नेऊ देणार नाही.शासनाने हा महामार्ग अधिसूचना काढून रद्द करावा. अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हट्टाग्र आंदोलन करण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांनी कंत्राटदारांच्या हिताचे प्रकल्प जनतेवर लादू नयेत.लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प पुढे रेटु नये. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सदर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी 21 सप्टेंबर पासून काठापूर येथील बाधित शेतकऱ्यांकडुन उपोषण करण्यात येणार आहे.
सोपान करंडे बाधित शेतकरी
गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.
मंचर –
छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.
मंचर-
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.
गावागावातुन
जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.
मंचर-
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत.
निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन5 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
