Connect with us

गावागावातुन

प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध.योग्य मोबदला देणार प्रशासनाची भुमिका.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गासाठी आंबेगाव,जुन्नर, शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असून. या महामार्गाबाबत येथील शेतकऱ्यांना योग्य माहिती नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना या संदर्भात माहिती मिळावी म्हणून संपर्क साधला होता. आणि त्यामुळे नामदार वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार सदर बैठकीचे आयोजन भीमाशंकर कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आले होते. या महामार्गाबाबत येथील शेतकऱ्यांना चांगल्या स्वरूपाचा मोबदला द्यावा .शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी असे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले.

पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन भिमाशंकर कारखाना येथे करण्यात आले होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी (एम.एस. आर.डी.सी.) ए.आर.अरगुंडे, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे,एम.एस.आर.डी.सी.च्या वर्षा पवार, मंचर प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक, जुन्नर चे तहसीलदार रविंद्र सबनीस, त्याचप्रमाणे भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील,रामदास वळसे पाटील,अनिल वाळुंज, बाळासाहेब घुले,बाळशीराम वाळूंज,गुरूदेव पोखरकर, अशोक वाळूंज,संदिप पोखरकर ,अशोक करंडे,विशाल करंडे ,कान्हु करंडे,बिपीन थिटे,बाळासाहेब औटी,प्रतिक जाधव,अशोक आदक,सुशांत रोडे, यांसह शिरुर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

यावेळी एम एस आर डी सी चे अप्पर जिल्हाधिकारी ए.आर.अरगुंडे यांनी या महामार्गाविषयी माहिती दिली. पुणे नाशिक या ठिकाणी वाढत असलेल्या डेव्हलपमेंट मुळे शासनाने सदर मार्ग प्रस्तावित केला असून. शेतकऱ्यांना योग्य स्वरूपाचा मोबदला देण्यात येणार आहे .हा महामार्ग शंभर मीटर रुंदीचा असून येथील शेती व औद्योगिक मालाची वाहतूक करण्यासाठी या महामार्गाचा उपयोग होणार आहे. या महामार्गामुळे येथील शेतकऱ्यांचा विकास होणारा आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांसाठी सर्विस रोड ठेवण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असणाऱ्या वाटा,पायवाटा या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येणार आहे.

यामध्ये सहा ठिकाणी या मार्गावर जाण्यासाठी रस्ते ठेवण्यात आले आहेत. 2013 च्या कायद्यानुसार चारपट मोबदला शासन देणार आहे. तसेच महाराष्ट्र हायवे कायद्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य केले तर 25% अधिकचा मोबदला मिळणार आहे. त्यामुळे योग्य मोबदला येथील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.तसेच झाडे, विहिरी, बोर, मंदिरे ,गोठे ,घरे, पाईपलाईन या सर्वच गोष्टीसाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच पट मोबदलाही शासन देणार आहे.जिरायती साठी पाच पट, हंगामी बागायतीसाठी साडेसात पट,बारमाही बागायतीसाठी दहापट मोबदलाही शेतकऱ्यांना मिळणार आहे.प्रत्येक गटाचा मोबदला त्या गटाच्या आकारणीनुसार ठरेल.असेही यावेळी अरगुंडे यांनी सांगितले.

यावेळी या महामार्गाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, यांनीही शेतीमालाला या मार्गाचा उपयोग होणार असून या महामार्गामुळे परिसराचा विकास होणार आहे असे म्हणाले.यावेळी विवेक वळसे पाटील म्हणाले की महामार्गाच्या परिसरात लघु उद्योगांसाठी शासनाने प्रकल्प उभा केला पाहिजे त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात या महामार्गावर जाण्यासाठी सोय करावी येथील शेतकऱ्यांच्या पाठीमागे नामदार वळसे पाटील कायमच उभे राहतील असे या वेळी विवेक वळसे पाटील म्हणाले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.

Published

on

मंचर –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

Trending