Connect with us

शेतीशिवार

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले अनेक गावांंतील शेतीपिकांना होनार फायदा.

Published

on

मंचर प्रतिनिधी


डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु जलाशयातून) उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे आंबेगाव-शिरूर तालुक्‍यातील सुमारे ६० गावातील शेतीपिकांना फायदा होणार आहे. पाण्याचे आवर्तन अंदाजे एक महिना चालणार आहे. आंबेगाव, शिरूर, तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेटसावू लागला होता.याबाबत उजव्या कालव्या लगत असलेल्या शेतकऱ्यांकडून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत होती.तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते. या संदर्भात आज पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डिंभे धरण तसेच घोड व मीना शाखा कालव्यात उन्हाळी हंगामातील पिकाच्या सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सद्या डिंभे धरणात ६४.६४ टक्के पाणीसाठा असुन उजव्या कालव्याला शनिवारी (ता. २४ ) रोजी १२ वाजता पाणी सोडण्यात आलेअसल्याचे शासकीय उपविभागीय अभियंता दत्ता कोकणे यांनी सांगितले.या पाण्यामुळे आंबेगाव तालुक्यातील नारोडी, लांडेवाडी, मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी व शिरूर तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, सोनसांगवी इत्यादी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे.पाण्याचे आवर्तन अंदाजे जवळपास ३० दिवसांहून अधिक चालणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. तीव्र उन्हामुळे विहीर आणि पाझर तलावातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले होते. त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळात पाणी सोडल्याने शेतीपिकांना दिलासा मिळणार आहे. कालव्यात पाणी नसल्याने अनेक शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती मात्र आता पाणी आल्याने शेती पिकाचा जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक, लाखनगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी,व परिसरातील रस्ते व इतर समस्या लवकर दुर होतील.विवेक पाटील यांची माहिती.

Published

on

मंचर- आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक, लाखनगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी,व परिसरातील रस्ते व इतर समस्यांबाबत जुन्नर (ता. जुन्नर) या ठिकाणी नुकतीच बैठक पार पडली यावेळी या बैठकीत सदर रस्त्यांच्या बाबतीत विषयांवर वनविभागचे पूर्ण सहकार्य करेल व या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला जाईल असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सांगितले.

माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (अध्यक्ष, म्हाडा, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग हद्दीतील काही रहदारीच्या रस्त्यांबाबत आलेल्या अडी-अडचणीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत खाडे (उपवनसंरक्षक, जुन्नर उपविभाग, जुन्नर) यांसमवेत विविध विषयांवर बैठक पार पडली.


यामध्ये काठापूर बु. येथील वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा कार रस्ता, लाखणगाव रोड ते काकडे-भुमकर वस्ती रस्ता वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा (पीरसाहेब मंदिर मार्गे) रस्ता करणे,लाखणगाव येथे कवठे रोड ते पाटील-तागडवस्ती रस्ता करणे, धामणी येथे मधलामळा ते स्मशानभूमी (बायपास मार्ग) रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाईप लाईन बाबत मार्ग काढणे,निरगुडसर, बेलसरवाडी येथे स्थानिक शेतकऱ्यांना वनविभाग हद्द निश्चित करणे. तसेच आदिवासी भागातील वनविभाग बाबत विविध अडचणी, लोणी येथून वडगावपीर, मांदळेवाडी गावासाठी वनविभाग परवानगीने विद्युत वाहक पोल उभे करणे, महाळुंगे पडवळ येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाईप लाईन ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करुन आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन पुर्ण केले जाईल, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती संजय गवारी, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, सार्व. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.मोरे, मंचर महावितरण विभागाचे अधिकारी तसेच लाखणगाव येथील माऊली पाटील,धामणीचे सरपंच अक्षय विधाटे,काठापूर बु. गावचे मा.उपसरपंच विशाल करंडे, सुधीर भुमकर, बाळासाहेब करंडे, महीपत टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.

Published

on

मंचर-

पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.

Continue Reading

गावागावातुन

पिंपरखेड ता. शिरूर येथे बिबट्याच्या हल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी केला रोडेवाडी फाटा येथे बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्गावर रास्ता रोको.

Published

on

निरगुडसर-

पिंपरखेड तालुका शिरूर या ठिकाणी बिबट्याने केलेले हल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रोडेवाडी फाटा पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्ग रोखुन धरला.

रात्री सात वाजता या परिसरातील अनेक गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले व रास्तारोको आंदोलन केले.या परिसरात वाढलेल्या बिबट्याचा उपद्रव आणि त्यामुळे होणारे नागरिकांवरील हल्ले. जनावरंवरील हल्ले याचा उद्रेक झाला.


रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड या तालुक्यांमध्ये सध्या एक हजार पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती वन विभागाच्या काही अधिकार्यांनी नाव खाजगीत दिली आहे. त्यामुळे या परिसरात प्रत्येक गावात चार ते पाच बिबट्यांची संख्या आहे.बिबट्यांचा वावर वाढला असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


रोजच कुठे ना कुठे जनावरण तसेच माणसे यांवर हल्ले होत आहेत.पिंपरखेड जांबुत या ठिकाणी मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू झाल्याने परिसरात भिती आहे.त्यामुळे संतप्त नागरिकांनी रोडेवाडीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम,दामुआण्णा घोडे, शिवसेना (उबाठा)चे सुरेश भोर, सुभाष पोकळे, शेतकरी संघटनेचे माऊली बोंबे,यांसह परीसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Trending