गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावकार कोंडीबा दौंड या शेतकऱ्याची दोन एकर क्षेत्रावरील केळी भुईसपाट, लाखो रुपयांचे नुकसान. नुकसान भरपाईची मागणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगाव ,काठापूर बुद्रुक, पोंदेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावकार कोंडीबा दौंड या शेतकऱ्याची दोन एकर क्षेत्रावरील केळी भुईसपाट झाली असुन दोन लाख रुपये भांडवली खर्च व एक महिन्यानंतर सुरू होणारे उत्पन्न हे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शेतकरी सावकार कोंडीबा दौंड यांनी दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती.यासाठी मल्चींग पेपर व ठीबक सिंचन चा वापर केला होता.दोन एकर क्षेत्रावरील केळी ची काढणी एक महीन्याने सुरू होनार होती. परंतु अवकाळी आलेल्या वादळी वारा व पावसाने संपूर्ण केळीची बाग भुईसपाट झाली आहे.त्याचबरोबर इतर तरकारी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सध्या तरकारी पिकांना बाजार भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी केळी पिकाकडे वळला आहे केळी पिकाला एकरी एक लाख रुपये खर्च येतो मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून शेतकरी केळी पिकाची लागवड करत असतात परंतु अशा आसमानी संकटामध्ये केळी भुईसपाट झाल्याने करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यापुडे उभा आहे.


अनेक तरकारी पिके या वादळ व पावसाने भुईसपाट झाली आहे.प्रशासनाने पंचनामे सुरू केले असले तरी.पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई साठी होणारी दिरंगाई व अल्प प्रमाणात मिळणारे नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचा शासनावर विश्वास नाही. त्यामुळे शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना त्वरित व चांगली योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version