सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

‌मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.


लाखनगाव धरमवस्ती येथील शेतकरी विक्रम राजाराम धरम यांनी दहा हजार पक्षांची २५० फुट लांबीचे पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम पुर्ण होऊन लोखंडी सांगाडा उभा केला होता तर भिंतीचे प्लास्टर व पत्रे बसविण्याचे काम बाकी होते. पण अवकाळी पावसाने व वार्याने दोन्ही भिंती पडल्याने ७०हजार ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.या पोल्ट्री शेडसाठी विविध कार्यकारी सोसायटीने वित्तीय पुरवठा केला होता. परंतु व्यवसाय सुरू होण्या आधीच नुकसान झाले आहे.


सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची शाश्वती राहिली नसताना अनेक तरुण हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत परंतु या अवकाळी संकटाचा सामना या तरुणांना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीतच व्यवसाय उभे करतानाही येणार्या संकटांमुळे तरुण वर्गा पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.


आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी मनोज रोडे पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version