गावागावातुन

ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आंबेगाव तालुक्यातील धामणी खिंड.

Published

on


शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड – गावडेवाडी


सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यावर असणारी हिरवीगार झाडी, डिंभे उजव्या कालव्याचा दुथडी भरुन वाहणारा पाट, हिरवीगार वाऱ्यावर डोलणारी शेती, आणि मधूनच मनमोहक मोर व लांडोरीचे बागडणे या गोष्टी मनाला आकर्षित करतात .
हे दृश्य आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मंचर पासून पूर्वेला अगदी १५ कि . मी असलेल्या धामणी खिंडीचे . या धामणी खिंडीत श्री संत ज्ञानोबा राय व त्यांच्यासह चार भावंडांनी पैठण वरून शुद्धिपत्र घेऊन जाताना मुक्काम केला असल्याची आख्यायिका सांगितली जाते .तेव्हापासून या स्थळाला एक पवित्र रूप आले आहे येथील धामणी, शिरदाळे, पहाडदरा व बढेकर मळा,जारकरवाडी व पंचक्रोशीतील भाविकांनी ग्राम सहभागातून व लोकवर्गणीतून येथे मोठे व आकर्षक मंदिर उभारले आहे या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर माऊली तसेच या चार भावंडांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती बसविल्या आहेत व ज्या शिळेवर माऊली बसले होते त्या शिळेचीही स्थापना केली आहे . या मंदिरात दरवर्षी आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो यामध्ये येथील बढेकर मळ्याचा संयोजनात मोठा सहभाग असतो. सप्ताहाच्या शेवटी शेवटच्या दिवशी येथे तिखट व गोड डाळीची चविष्ट कढई भरून आमटी बनवली जाते ग्रामस्थ घरटी पाच ते दहा बाजरीच्या भाकरी आणतात व असा चविष्टआमटीचा प्रसाद घेऊनअसा आगळावेगळा गोपाळकाला येथे साजरा केला जातो .


या ठिकाणी सकाळच्या प्रहरी थव्याथव्याने या मंदिर परिसरात मोर बागडताना दिसतात या मोरांना येथील पुजारी मल्हारी रोडे हे नित्यनेमाने धान्य खायला टाकतात . त्यामुळे हे मोर माणसाळलेले आहेत .आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधीतून दोन मोठे भव्य मंडप या परिसरात उभारून या स्थळाचा कायापालट केला आहे त्यामुळे भाविकांचे व पर्यटकांचे मन येथे रमते या भागातील रस्ते चकचकीत डांबरी असल्याने भाविकांचा व पर्यटकांचा प्रवास सुखावह होतो . या मंदिराचे व येथील स्थळाचे पावित्र्य रहावे म्हणून येथील ग्रामस्थ सतत प्रयत्नशील आहेत कुणीही यावे व या पवित्र स्थळी लीन व्हावे येथील निसर्गाचा व पावित्र्याचा लाभ घ्यावा असेच हे ठिकाण आहे

धामणी खिंड आम्हा ग्रामस्थांचे अस्मितेचे ठिकाण आहे माऊलींच्या पदस्पर्श व निसर्ग सौंदर्य व मोरांचे बागडणे हे आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे या भागातील व पंचक्रोशीतील सामाजिक संस्थांनी या बागडणाऱ्या मोरांसाठी चाऱ्या पाण्याची व धान्याची सोय करायला हवी-
रेश्मा अजित बोऱ्हाडे . लोकनियुक्त सरपंच धामणी यांनी सांगितले.


येथील जंगलात विविध प्रकारचे वन्य प्राणी वावरत आहेत या वन्य प्राण्यांसाठी वन विभागाने पानवठे उभारले असून त्यात टँकरने नेहमीपाणी सोडले जाते येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही असे वर्तन ठेवावे असे स्मिता राजहंस . वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version