Connect with us

गावागावातुन

पोंदेवाडीचा विकास कौतुकास्पद – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-( राजु देवडे)

पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामस्थांनी केलेली विकास कामे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
शनिवार ( दि.२० ) रोजी पोंदेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील,बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, शिवाजी ढोबळे, मनोज रोडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश थोरात, सहाय्यक बि.डी.ओ.अर्चना कोल्हे,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर,ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, थोरांदाळे़ सरपंच जे.डी. टेमगिरे पारगावचे सरपंच श्वेता ढोबळे, मांदळेवाडी सरपंच उज्वला आदक,काठापुर सरपंच अशोक करंडे, लाखणगाव सरपंच प्राजक्ताताई रोडे पाटील,पोंदेवाडी सरपंच निलम वाळुंज, सोसायटी चेअरमन विठ्ठल मखर, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, निलेश पडवळ,अमोल वाळुंज, सचिन टाव्हरे, राजु सिनलकर, मयूर सरडे, संकेत वायकर ,प्रतिक जाधव,शिराम वाळूंज महेंद्र वाळुंज पोंदेवाडी ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सर्व सदस्य व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वळसे पाटील आपल्या भाषणात म्हटले की, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची काम केले पाहिजे. गेली तीस ते पस्तीस वर्षे या परिसरात विकासाची कामे केल्याने तुम्ही मला या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. यापूर्व काळात अनेक काळात अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थेवर काम करण्याची संधी दिली. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला शेतीविषयक धोरण ठरवावे लागणार आहे. पोंदेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पोंदेवाडी बैलगाडा घाटासाठी वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. वळसे पाटील यांनी बैलगाडा घाटासाठी निधी उपलब्ध करून देत असताना शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे असून पालकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. असे यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात राजकारणात उलटा पालट घडण्याची शक्यता वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.सर्व उपस्थितीतांचे स्वागत व केलेल्या कामाची माहिती यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.

Published

on

मंचर –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

Trending