Connect with us

गावागावातुन

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाला काठापूर ग्रामस्थांचा विरोध, गावातून महामार्ग न होण्यासाठी ग्रामसभेत ठराव.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

काठापुर बुद्रुक ( ता. आंबेगाव ) येथे आयोजित ग्रामसभेत काठापुर बुद्रुक गावातून जाणाऱ्या पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गास कडाडून विरोध करत. गावातून हा महामार्ग होऊ नये या याबाबत शासनाला कळवावे असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग जात आहे हा महामार्ग तालुक्यातील लोणी धामणी खडकवाडी पोंदेवाडी काठापुर बुद्रुक भागडी शिंगवे या गावांमधुन जात आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती बाधीत होत असून, या महामार्गाला विरोध होत आहे. या महामार्गाची रुंदी ही 90 ते 110 मीटर असणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे. काठापुर बुद्रुक हे गाव घोड नदीच्या काठावर वसले असल्याने गाव बारमाही बागायती आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेजारीच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची उपलब्धता आहे.

त्याचप्रमाणे दुग्धव्यवसाय ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो.सध्या नोकऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने काठापुर मधील मोठ्या प्रमाणावर लोक व तरुण शेती व दुग्धव्यवसाय करत आहे. या आदी ही डिंभे धरण बांधल्यानंतर डिंभे धरणातून बुडीत झालेला शेतकऱ्यांसाठी काठापुर बुद्रुक गावातील मोठ्या प्रमाणावर जमीन शासनाने संपादित केली. त्यामुळे याआधीही काठापुर बुद्रुक गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपत्ती झालेले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी अत्यंत अल्पभूधारक झाला आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा औद्योगिक महामार्गासाठी काठापुर बुद्रुक येथील शेती संपादित होणार आहे. त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसत आहे. त्यामुळे हा औद्योगिक महामार्ग काठापूर बुद्रुक गावातून न होता पर्यायी ठिकाणावरून व्हावा.या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे काठापुर बुद्रुक या ठिकाणी पार पडलेल्या ग्रामसभेत बाधित होणारे शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला विरोध नोंदवून औद्योगिक महामार्ग दुसरीकडून व्हावा ही भूमिका घेतली आहे
यावेळी सरपंच अशोक करंडे, उपसरपंच पप्पु खुडे,विशाल करंडे,दादाभाऊ गायकवाड,शोभा जोरी,विमल करंडे,पोलीस पाटील अमोल करंडे,ग्रामसेवक सुवर्णा गोसावी,सुनिल करंडे, संतोष करंडे,बजरंग करंडे,विनायक करंडे,शिवाजी करंडे,बजरंग करंडे,कान्हु करंडे, संतोष करंडे,नवनाथ करंडे,व ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.

Published

on

मंचर –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

Trending