गावागावातुन
नवजात वासरांचा प्रश्न गंभीर अनेक ठिकाणी सोडलेल्या या वासरांचा अन्नपाण्याविना मृत्यू.
मंचर-आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील गावांमध्ये सध्या जर्शी गायींचे वासरे गोर्हे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला ओढ्याच्या कडेला वनविभागाच्या जागेत सार्वजनिक गायरान जागेत अशा अनेक ठिकाणी सोडले ले पहावयास मिळत असून या वासरांना नविन प्रश्न उभा राहिला असुन अन्नपाण्याशिवाय ओरडणारी ही वासरे मन सुन्न करत असुन याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
तालुक्याच्या पुर्व भागातील काठापूर बुद्रुक लाखनगाव जारकरवाडी देवगाव पोंदेवाडी या परिसरात वनविभागाच्या हद्दीत, ओढ्यानाल्यांच्या कडेल रस्त्यावर तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक क्षेत्रात लहान वासरे मोकाट स्वरूपात सोडली जात आहेत. खायला पुरेसे अन्न न मिळाल्याने या वासरांचा मृत्यू होत असून काही वासरे कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत. ही वासरे मेल्यानंतर त्यांचा दुर्गंध वास येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराला नक्की जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहिला आहे.
मोकाट सोडलेली वासरे मोकाट कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत.मात्र शिल्लक राहिलेले वासरू कुत्र्यांनी न खाल्ल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे.ज्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावरती होतो आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना खायला काहीही न मिळाल्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांच्या वासरांवरती, शेळ्यांवरती हल्ला चढवत आहेत. आधीच या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य व वावर आहे. त्यात आलेले हे नवीन संकट या परिसरातील शेतकरी व स्थानिक रहिवासी यांच्या पुढे उभे आहे.
याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक शेतकरी व रहिवासी यांच्या पुढे आहे.महाराष्ट्र शासनाने गोहत्त्या बंदी कायदा लागू केल्यापासून मोठ्या प्रमाणावर लहान वासरे भाकड गाई यांचा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकर्यांपुढे उभा राहिला आहे.कायदा लागू झाल्यापासून भाकड जनावरांची मागणी पूर्णपणे थांबली आहे.यामुळे दुध न देणाऱ्या गाई त्याचप्रमाणे नवीन जन्माला आलेली वासरे गोर्हे यांचं करायचं काय हा प्रश्न उभा राहिला आहे.सध्या अनेक शेतकरी नवीन जन्माला आलेले गोर्हे आडमार्गी रस्त्याच्या कडेला,जंगलात सोडून देत आहेत.परंतु ही वासरे अन्न पाण्याशिवाय ओरडून ओरडून आपला जीव सोडत आहेत.त्यामुळे माणूस किती स्वार्थी झाला आहे हे दिसून येते. शासनाने गोहत्या बंदी कायदा केला परंतु यावर उपाययोजना कुठल्याही प्रकारची केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उत्पादन न देणारी ही जनावर सांभाळण्यासाठी शासनाने पांजरपोळ गोशाळा सुरू केल्या पाहिजे व शेतकऱ्यांनी सांभाळण्यासाठी अवघड झालेली गाई गोरे यांची स्वतंत्र व्यवस्था उभी केली पाहिजे.
सध्या दुधाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकरी आधीच वैतागला आहे. एकंदरीतच दुधाचे होणारे उत्पन्न यातून मिळणारे पैसे व या जनावरांवर येणारा खर्च पाहतात शेतकऱ्यांचे हाती काही लागत नसून.अशा परिस्थितीत ही भाकड जनावरे सांभाळताना आधीक खर्च होत असल्याने. अनेक शेतकऱ्यांनी गोठे बंद करून गाय विकल्या आहेत.सध्या गायी विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चांगली गायी सुद्धा अल्प किमतीला विकली जात आहे. शेतकरी गोठे मोकळे करत असल्याचे प्रमाण वाढले आहे.शासनाने गोहत्याबंदी कायदा करून नक्कीच गोवंशाचे संरक्षणाचे काम केले की गोवंश नष्ट करण्याकडे पाऊल उचलले हा प्रश्न उभा आहे.
शासनाने केलेला हा कायदा नक्कीच कुठेतरी फसला असल्याचेही काही शेतकरी सांगत आहेत. एकंदरीतच शासनाने कायदा करत असताना हा कायदा केल्यावर निर्माण होणार्या प्रश्नांचा विचार करुन उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु असला कुठलाही मार्गा न काढता कायदा केला आणि त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये असनारी लहान वासरांची परिस्थिती पाहता भयानक स्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.
मंचर –
छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.
मंचर-
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.
गावागावातुन
जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.
मंचर-
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत.
निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन5 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
