Connect with us

गावागावातुन

ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आंबेगाव तालुक्यातील धामणी खिंड.

Published

on


शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड – गावडेवाडी


सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यावर असणारी हिरवीगार झाडी, डिंभे उजव्या कालव्याचा दुथडी भरुन वाहणारा पाट, हिरवीगार वाऱ्यावर डोलणारी शेती, आणि मधूनच मनमोहक मोर व लांडोरीचे बागडणे या गोष्टी मनाला आकर्षित करतात .
हे दृश्य आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मंचर पासून पूर्वेला अगदी १५ कि . मी असलेल्या धामणी खिंडीचे . या धामणी खिंडीत श्री संत ज्ञानोबा राय व त्यांच्यासह चार भावंडांनी पैठण वरून शुद्धिपत्र घेऊन जाताना मुक्काम केला असल्याची आख्यायिका सांगितली जाते .तेव्हापासून या स्थळाला एक पवित्र रूप आले आहे येथील धामणी, शिरदाळे, पहाडदरा व बढेकर मळा,जारकरवाडी व पंचक्रोशीतील भाविकांनी ग्राम सहभागातून व लोकवर्गणीतून येथे मोठे व आकर्षक मंदिर उभारले आहे या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर माऊली तसेच या चार भावंडांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती बसविल्या आहेत व ज्या शिळेवर माऊली बसले होते त्या शिळेचीही स्थापना केली आहे . या मंदिरात दरवर्षी आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो यामध्ये येथील बढेकर मळ्याचा संयोजनात मोठा सहभाग असतो. सप्ताहाच्या शेवटी शेवटच्या दिवशी येथे तिखट व गोड डाळीची चविष्ट कढई भरून आमटी बनवली जाते ग्रामस्थ घरटी पाच ते दहा बाजरीच्या भाकरी आणतात व असा चविष्टआमटीचा प्रसाद घेऊनअसा आगळावेगळा गोपाळकाला येथे साजरा केला जातो .


या ठिकाणी सकाळच्या प्रहरी थव्याथव्याने या मंदिर परिसरात मोर बागडताना दिसतात या मोरांना येथील पुजारी मल्हारी रोडे हे नित्यनेमाने धान्य खायला टाकतात . त्यामुळे हे मोर माणसाळलेले आहेत .आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधीतून दोन मोठे भव्य मंडप या परिसरात उभारून या स्थळाचा कायापालट केला आहे त्यामुळे भाविकांचे व पर्यटकांचे मन येथे रमते या भागातील रस्ते चकचकीत डांबरी असल्याने भाविकांचा व पर्यटकांचा प्रवास सुखावह होतो . या मंदिराचे व येथील स्थळाचे पावित्र्य रहावे म्हणून येथील ग्रामस्थ सतत प्रयत्नशील आहेत कुणीही यावे व या पवित्र स्थळी लीन व्हावे येथील निसर्गाचा व पावित्र्याचा लाभ घ्यावा असेच हे ठिकाण आहे

धामणी खिंड आम्हा ग्रामस्थांचे अस्मितेचे ठिकाण आहे माऊलींच्या पदस्पर्श व निसर्ग सौंदर्य व मोरांचे बागडणे हे आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे या भागातील व पंचक्रोशीतील सामाजिक संस्थांनी या बागडणाऱ्या मोरांसाठी चाऱ्या पाण्याची व धान्याची सोय करायला हवी-
रेश्मा अजित बोऱ्हाडे . लोकनियुक्त सरपंच धामणी यांनी सांगितले.


येथील जंगलात विविध प्रकारचे वन्य प्राणी वावरत आहेत या वन्य प्राण्यांसाठी वन विभागाने पानवठे उभारले असून त्यात टँकरने नेहमीपाणी सोडले जाते येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही असे वर्तन ठेवावे असे स्मिता राजहंस . वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांनी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.

Published

on

मंचर –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

Trending