Connect with us

गावागावातुन

आदर्शगाव गावडेवाडीचे दक्षिण मुखी हनुमान मंदिर

Published

on

शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड पत्रकार गावडेवाडी.

गावडेवाडी फाट्यावर आल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन डेरेदार भाविकांचे स्वागत करणारे वटवृक्ष, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी, गावात पोहोचल्यावर कोकणातील जांभ्या दगडाने उभारलेले प्रवेशद्वार, डाव्या बाजूला आकर्षित हिरकणी माध्यमिक विद्यालय ,उजव्या बाजूला येणारा जाणाऱ्यांचे स्वागत करणारी गावची ग्रामपंचायत ,त्याचप्रमाणे जि .प .ची मराठी शाळा शेतात डोलणाऱ्या फळांच्या बागा व गावच्या सीमेवर असणारे हनुमानाचे टुमदार मंदिर हे सुंदर दृश्य आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्श गाव गावडेवाडीचे.

पुण्यापासून अवघ्या ६५ कि .मी . अंतरावर व मंचर पासून अवघ्या पाच ते सात किमी अंतरावर पूर्वेला आदर्शगाव गावडेवाडी हे टुमदार खेडे वसलेले आहे याच गावात सीमेवर दक्षिण मुखी हनुमंताचे जागृत देवस्थान आहे दक्षिण मुखी असल्याने हे अतिशय जागृत देवस्थान आहे त्यामुळे गावकऱ्यांची त्याच्यावर अपार श्रद्धा आहे गावडेवाडीच्या पूर्वजांनी गावच्या सिमेवर हे चौपाखी मंदिर कौलारू मंदिर उभारले मात्र काळाच्या ओघात ते मंदिर जुने झाले होते गावातील साई युवक क्रीडा मंडळाचे व साई युवा फंडाचे तरुण एकत्र येऊन त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले गावचे प्रवेशद्वार जसे कोकणातील जांभ्या दगडाचे आहे तसेच आपल्या दक्षिणमुखी हनुमंत रायांचे मंदिरही कोकणातील लाल जांभ्या दगडांचे असावे असा विचार सर्वांनी मांडला. पुणे मुंबईत असलेले व गावच्या पंचक्रोशीतून ग्रामस्थांची संमती मिळाली व अल्पावधीतच हे हनुमंत रायांचे आकर्षक चौपाखी जुने स्वरूप जराही न बदलता मनमोहक मंदिर उभे राहिले या मंदिरासाठी साई युवक क्रीडा मंडळाने तनाने मनाने धनाने अहोरात्र कष्ट घेतले. हा हनुमंत राया दक्षिणमुखी असल्याने तो संकटात धावतो व पावतो अशी श्रद्धा असल्याने राज्यभरातून भाविकांची येथे सतत वर्दळ असते. आलेल्या प्रत्येक भाविकाला आपण कोकणात आलो आहोत असा भास होतो. या जागृत हनुमंत राया पुढे नतमस्तक होतो. इकडे येणारे रस्ते अतिशय गडबडीत आहेत हे रस्ते चकचकीत डांबरी व्हावेत व एसटी महामंडळाच्या मंचर आगाराने प्रत्येक तासाला येथे एसटी बस सुरू करावी एवढी माफक अपेक्षा येतील ग्रामस्थांची आहे.

आदर्श गाव गावडेवाडीतील दक्षिण मुखी जागृत हनुमान ही आमची अस्मिता आहे हनुमान व मंदिर हे आमच्या गावाचे वैभव आहे या मंदिराचे पावित्र्य व जाग्रुकता टिकावी म्हणून आमच्या गावातील अबाल वृद्ध सदैव प्रयत्नशील असतात .या हनुमंतरायांची नित्यनेमाने पूजाअर्चा होते असे
विजय धोंडीबा गावडे.सरपंच आदर्शगाव गावडेवाडी
.

मी एका साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे मात्र या हनुमंतावर अपार श्रद्धा . चिकाटी जिद्द नियमित पूजा आरती यामुळे मला बळ मिळाले आहे हनुमंतांच्या श्रद्धेमुळे मी व माझी मुले उद्योजक म्हणून नावारुपास आलो आहोत ही सर्व या दक्षिणमुखी हनुमंतरायाची कृपा आहे असे
दिलीप दत्तात्रय शिंदे ग्रामस्थ व भाविक आदर्शगाव गावडेवाडी
.


आदर्श गाव गावडेवाडी येथील नवयुवक क्रीडा मंडळ व साई युवक क्रीडा मंडळ व साई युवा फंड मुंबई यांच्या अथक प्रयत्नाने व अतिशय कष्टाने हे हनुमान रायाचे मंदिर आम्ही उभारले आहे यासाठी मोठा खर्च झाला आहे परंतु गावडेवाडी ग्रामस्थ पुणे मुंबई ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे होऊ शकले आहे हनुमंत राया वरची अपार श्रद्धा व दक्षिण मुख असलेले मंदिर यामुळे सर्व हे सिद्धीला गेलेले आहे
जयंत नामदेव गावडे
अध्यक्ष साई युवक क्रीडा मंडळ
व मुख्य प्रवर्तक दक्षिण मुखी हनुमान मंदिर आदर्श ग्राम गावडेवाडी

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.

Published

on

मंचर –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

Trending